शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

रमाबाई आंबेडकर झोपडपट्टीत शौचालयांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:38 IST

देवळालीगाव मालधक्कारोड मातोश्री रमाबाई आंबेडकर झोपडपट्टी परिसरात अस्वच्छता, तुंबलेल्या गटारी, दुर्गंधी, सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था, बंद पथदीप अशा रहिवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक समस्या पाचवीला पुजलेल्या आहेत.

समस्यांचा फेरादेवळालीगावनाशिकरोड : देवळालीगाव मालधक्कारोड मातोश्री रमाबाई आंबेडकर झोपडपट्टी परिसरात अस्वच्छता, तुंबलेल्या गटारी, दुर्गंधी, सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था, बंद पथदीप अशा रहिवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक समस्या पाचवीला पुजलेल्या आहेत. नगरसेवक व मनपा प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याने रहिवाशांना कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.देवळालीगाव मालधक्कारोड राजवाड्याशेजारी मातोश्री रमाबाई आंबेडकरनगरमधील रहिवासी मनपाचा सर्व प्रकारचा कर भरतात. मात्र तेथील अस्वच्छता व नागरी समस्या मार्गी लावण्याबाबत कोणीच गांभीर्याने लक्ष देऊन काम न केल्याने दिवसेंदिवस अस्वच्छता वाढत आहे. त्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दाट लोकवस्ती, छोटे गल्लीबोळ, बसकी घरे यामुळे या भागातील स्वच्छतेचा मुख्य प्रश्न असून याकडे मनपाने नियोजनपूर्वक लक्ष देण्याची गरज असल्याचे कविता गायकवाड यांनी सांगितले.आंबेडकरनगर भागातील बहुतांश पथदीप बंद असल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. नवीन पोल उभे केले आहेत. मात्र त्यावर बल्बच लावलेले नसल्याचे उषा पाराशरे यांनी सांगितले. छोट्या गल्लीबोळामुळे व दाट लोकवस्तीमुळे छोटी वाहने असलेल्या घंटागाडी पाठवून केरकचरा संकलित करण्याची गरज असल्याचे हिराबाई भोसले, प्रेरणा जाधव यांनी सांगितले.शौचालयाची संख्या रहिवासी संख्येच्या मानाने अत्यंत कमी आहे. त्यात शौचालयाची दारे तुटली असून अस्वच्छ असल्याने महिलांची मोठी गैरसोय होत असल्याचे आशा घुसळे यांनी स्पष्ट केले.आंबेडकर भागात अत्यंत गोरगरीब, सर्वसामान्य राहात असल्याने या ठिकाणी विविध कार्यक्रम, उपक्रमांसाठी समाजमंदिर उभारणे गरजेचे असल्याचे अमोल चंद्रमोरे, प्रशांत गांगुर्डे यांनी सांगितले. तर रहिवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने ग्रीन जीम बसविल्यास खूप फायदा होईल, असे कुणाल साळवे यांनी स्पष्ट केले. झोपडपट्टी भागाची नियोजनपूर्वक स्वच्छता व जनजागृती करून कायापालट करण्याची गरज आहे, असे शशी धिवरे यांनी सांगितले.  (उद्यांच्या अंकात :  संतोषीमातानगर, सातपूर)आंबेडकरनगर भागात नियमित स्वच्छता होत नसल्याने केरकचरा साचत आहे. छोटी-छोटी घरे असल्याने केरकचऱ्यासाठी कचराकुंडीची सुविधा उपलब्ध करून दिल्यास परिसरातील दुर्गंधी नाहीशी होईल.- किरण गायकवाडजुना परिसर व झोपडपट्टी भाग लक्षात घेऊन मनपाने या भागाचा आतातरी कायापालट करण्यासाठी काहीतरी नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे. या भागातील नागरी समस्या जैसे थे आहेत.- जयाबाई आहिरेपरिसरातील बहुतांश पथदीप बंद पडले असून अंधाराचे साम्राज्य पसरल्याने सायंकाळनंतर महिलांची मोठी गैरसोय होत आहे. नवीन पथदीपांचे खांब बसविले असून त्याला मात्र अद्याप बल्ब बसविण्यात आले नाही.- पुष्पा चंद्रमोरेपरिसरातील रहिवासी, युवक, महिला, लहान मुले यांच्यासाठी व्यायाम, खेळणे, मनोरंजन याकरिता कुठलीही साधने नाहीत. रहिवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेसोबत ग्रीन जीम बसविल्यास सर्वांनाच त्याचा मोठा फायदा होईल.- प्रशांत रोकडेआंबेडकरनगर भागात छोटी-छोटी बैठी घरे व गल्लीबोळ असून, जुन्या गटारी आहेत. घरापुढूनच जाणाºया गटारींची नियमित स्वच्छता होत नसल्याने त्या तुंबून दुर्गंधी पसरत आहे. रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.- कमलबाई गाडेकरपरिसरातील रहिवाशांची संख्या लक्षात घेऊन सार्वजनिक शौचालय अपुरे पडत आहे. शौचालयाची दुरवस्था झाल्याने महिलांची मोठी गैरसोय होत आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे.- नीलेश कटारे

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक