शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

रमाबाई आंबेडकर झोपडपट्टीत शौचालयांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:38 IST

देवळालीगाव मालधक्कारोड मातोश्री रमाबाई आंबेडकर झोपडपट्टी परिसरात अस्वच्छता, तुंबलेल्या गटारी, दुर्गंधी, सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था, बंद पथदीप अशा रहिवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक समस्या पाचवीला पुजलेल्या आहेत.

समस्यांचा फेरादेवळालीगावनाशिकरोड : देवळालीगाव मालधक्कारोड मातोश्री रमाबाई आंबेडकर झोपडपट्टी परिसरात अस्वच्छता, तुंबलेल्या गटारी, दुर्गंधी, सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था, बंद पथदीप अशा रहिवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक समस्या पाचवीला पुजलेल्या आहेत. नगरसेवक व मनपा प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याने रहिवाशांना कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.देवळालीगाव मालधक्कारोड राजवाड्याशेजारी मातोश्री रमाबाई आंबेडकरनगरमधील रहिवासी मनपाचा सर्व प्रकारचा कर भरतात. मात्र तेथील अस्वच्छता व नागरी समस्या मार्गी लावण्याबाबत कोणीच गांभीर्याने लक्ष देऊन काम न केल्याने दिवसेंदिवस अस्वच्छता वाढत आहे. त्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दाट लोकवस्ती, छोटे गल्लीबोळ, बसकी घरे यामुळे या भागातील स्वच्छतेचा मुख्य प्रश्न असून याकडे मनपाने नियोजनपूर्वक लक्ष देण्याची गरज असल्याचे कविता गायकवाड यांनी सांगितले.आंबेडकरनगर भागातील बहुतांश पथदीप बंद असल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. नवीन पोल उभे केले आहेत. मात्र त्यावर बल्बच लावलेले नसल्याचे उषा पाराशरे यांनी सांगितले. छोट्या गल्लीबोळामुळे व दाट लोकवस्तीमुळे छोटी वाहने असलेल्या घंटागाडी पाठवून केरकचरा संकलित करण्याची गरज असल्याचे हिराबाई भोसले, प्रेरणा जाधव यांनी सांगितले.शौचालयाची संख्या रहिवासी संख्येच्या मानाने अत्यंत कमी आहे. त्यात शौचालयाची दारे तुटली असून अस्वच्छ असल्याने महिलांची मोठी गैरसोय होत असल्याचे आशा घुसळे यांनी स्पष्ट केले.आंबेडकर भागात अत्यंत गोरगरीब, सर्वसामान्य राहात असल्याने या ठिकाणी विविध कार्यक्रम, उपक्रमांसाठी समाजमंदिर उभारणे गरजेचे असल्याचे अमोल चंद्रमोरे, प्रशांत गांगुर्डे यांनी सांगितले. तर रहिवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने ग्रीन जीम बसविल्यास खूप फायदा होईल, असे कुणाल साळवे यांनी स्पष्ट केले. झोपडपट्टी भागाची नियोजनपूर्वक स्वच्छता व जनजागृती करून कायापालट करण्याची गरज आहे, असे शशी धिवरे यांनी सांगितले.  (उद्यांच्या अंकात :  संतोषीमातानगर, सातपूर)आंबेडकरनगर भागात नियमित स्वच्छता होत नसल्याने केरकचरा साचत आहे. छोटी-छोटी घरे असल्याने केरकचऱ्यासाठी कचराकुंडीची सुविधा उपलब्ध करून दिल्यास परिसरातील दुर्गंधी नाहीशी होईल.- किरण गायकवाडजुना परिसर व झोपडपट्टी भाग लक्षात घेऊन मनपाने या भागाचा आतातरी कायापालट करण्यासाठी काहीतरी नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे. या भागातील नागरी समस्या जैसे थे आहेत.- जयाबाई आहिरेपरिसरातील बहुतांश पथदीप बंद पडले असून अंधाराचे साम्राज्य पसरल्याने सायंकाळनंतर महिलांची मोठी गैरसोय होत आहे. नवीन पथदीपांचे खांब बसविले असून त्याला मात्र अद्याप बल्ब बसविण्यात आले नाही.- पुष्पा चंद्रमोरेपरिसरातील रहिवासी, युवक, महिला, लहान मुले यांच्यासाठी व्यायाम, खेळणे, मनोरंजन याकरिता कुठलीही साधने नाहीत. रहिवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेसोबत ग्रीन जीम बसविल्यास सर्वांनाच त्याचा मोठा फायदा होईल.- प्रशांत रोकडेआंबेडकरनगर भागात छोटी-छोटी बैठी घरे व गल्लीबोळ असून, जुन्या गटारी आहेत. घरापुढूनच जाणाºया गटारींची नियमित स्वच्छता होत नसल्याने त्या तुंबून दुर्गंधी पसरत आहे. रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.- कमलबाई गाडेकरपरिसरातील रहिवाशांची संख्या लक्षात घेऊन सार्वजनिक शौचालय अपुरे पडत आहे. शौचालयाची दुरवस्था झाल्याने महिलांची मोठी गैरसोय होत आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे.- नीलेश कटारे

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक