शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

जलसाठा कमी ; तर शहरात एकवेळ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 01:07 IST

गंगापूर धरण आता तळ गाठत असून, जलसाठा कमी कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात गरज भासल्यास ज्या ठिकाणी दोनवेळ पाणीपुरवठा होत आहे त्याठिकाणी एकवेळच पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती महापौर रंजना भानसी यांनी शनिवारी (दि. २२) दिली.

नाशिक : गंगापूर धरण आता तळ गाठत असून, जलसाठा कमी कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात गरज भासल्यास ज्या ठिकाणी दोनवेळ पाणीपुरवठा होत आहे त्याठिकाणी एकवेळच पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती महापौर रंजना भानसी यांनी शनिवारी (दि. २२) दिली. याठिकाणी चर खोदण्याचे काम सुरू असून, तेदेखील तातडीने पूर्ण करावे तसेच या ठिकाणी असलेला खडकाचा अडथळादेखील आताच काढावा अशाप्रकारची सूचना पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.गंगापूर धरणातील जलसाठा कमी होत असून, पाऊसदेखील पडत नसल्याने सध्या शहरावर पाणीकपातीचे संकट घोंगावत आहे. नाशिक शहराला ३० जुलैपर्यंत पुरेल इतके पाणी असले तरी पावसाची एकंदरच स्थिती बघता कोणत्याही क्षणी पाणी कपात होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने गंगापूर धरणात सध्या असलेले पाणी हे जलविहिरीपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. त्याचे काम सुरू असून, त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (दि.२२) पाहणी दौरा केला आणि परिस्थितीची पाहणी केली.गंगापूर धरणात सध्या ९०० दशलक्षघनफूट पाणी शिल्लक असून, त्यातील साडेपाचशे दशलक्षघनफूट पाणी नाशिक महापालिकेसाठी आरक्षित आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या अखेरीसपर्यंत शहराला पाणीपुरवठा होईल अशाप्रकारचे नियोजन आहे. मात्र पावसाने ओढ दिल्यास पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. ही बाबत लक्षात घेता शहरातील ज्या भागात दोन वेळ पाणीपुरवठा होत आहे, तेथे एकवेळ पाणीपुरवठा करता येईल काय, त्या भागांमध्ये एकवेळच परंतु ज्यादा दाबाने पाणीपुरवठा कसा करता येईल, त्याचे नियोजन करून आठ दिवसांत पाणीपुरवठा विभागाने अहवाल सादर करावा, असे आदेश दिल्याची माहिती महापौर रंजना भानसी यांनी दिली. तर नदीपात्रात चर खोदण्यासंदर्भात आपणच पत्र दिले होते. पाण्याचे सूयोग्य नियोजन केले पाहिजे, असे मत सभागृह नेता दिनकर पाटील यांनी केले. यावेळी उपमहापौर प्रथमेश गिते, भाजपा गटनेता संभाजी मोरुस्कर, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, मनसे गटनेता सलीम शेख, रिपाइंच्या दीक्षा लोंढे आदी उपस्थित होते. तसेच अधीक्षक अभियंता नलावडे, कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण, अविनाश धनाईत आदी उपस्थित होते.शिवसेना तयार, मात्र आपसातच गोंधळशहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात पुरेसा साठा नाही तसेच पाऊस कमी झाल्याने पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. शहर हिताचा विचार करता राजकारण न करता सर्वांनी सहकार्याची भूमिका घेण्याची गरज आहे, असे विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी सांगितले. तथापि, गटनेता विलास शिंदे यांनी दौºयाकडे पाठ फिरविली. अगोदरच पाण्याचे नियोजन करण्याची गरज असताना तसे न केल्याने ही वेळ आल्याचे त्यांनी सांगितले. गेल्यावर्षी धरणात जलपूजन करण्यास महापौरांनी वेळ दिला नाही त्यामुळे आता ही वेळ आली असून, सांगून हा एकप्रकारे गोदामातेचा प्रकोपच असल्याचे नमूद केले.आयुक्तांची दांडी आणि पाटील यांची नाराजीमहापौर रंजना भानसी तसेच अन्य सर्व पदाधिकारी गंगापूर धरणाच्या पाहणी दौºयासाठी गेले असताना आयुक्त राधाकृष्ण गमे मात्र या दौºयात सहभागी झाले नव्हते. त्यामुळे सभागृहनेता दिनकर पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. सर्व पदाधिकारी आले असतानादेखील आयुक्तउपस्थित राहत नाही हे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, कॉँग्रेस पक्षाचे गटनेते शाहू खैरे तसेच राष्टÑवादी कॉँग्रेसचे गटनेते गजानन शेलार, अपक्षांचे गटनेते गुरूमित बग्गा आदिंनीदेखील या दौºयाकडे पाठ फिरविली. महासभेतील त्यांची नाराजी कायम असल्याचे दिसून आले.

टॅग्स :gangapur damगंगापूर धरणNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी