शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

मजूर-शेतकऱ्यांमधील वादाने शेतीकामावर विपरीत परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:47 AM

गिरणारे, धोंडेगाव परिसरातील शेतकरी व शेतमजूर यांनी एकमेकांच्या विरोधात पुकारलेल्या असहकाराचा फटका दोन्ही बाजूकडील शेतकरी व शेतमजुरांना होत असून, त्याचा परिणाम शेतीकामांवर होत असल्याचे पाहून गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पोलीस प्रशासन व महसूल विभागाच्या प्रयत्नामुळे मजूरवर्ग शेतीच्या कामाला वाळू लागला आहे.

गंगापूर : गिरणारे, धोंडेगाव परिसरातील शेतकरी व शेतमजूर यांनी एकमेकांच्या विरोधात पुकारलेल्या असहकाराचा फटका दोन्ही बाजूकडील शेतकरी व शेतमजुरांना होत असून, त्याचा परिणाम शेतीकामांवर होत असल्याचे पाहून गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पोलीस प्रशासन व महसूल विभागाच्या प्रयत्नामुळे मजूरवर्ग शेतीच्या कामाला वाळू लागला आहे. परंतु त्याला मिळत असलेला प्रतिसाद व दोन्ही बाजूंकडून घेतली जाणाºया ताठर भूमिकेमुळे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी स्वत:च गावोगावी जाऊन मजूर व शेतकºयांच्या मनातील गैरसमज, भीती दूर करणार आहेत.गिरणारे परिसरातील शेतकरी व धोंडेगावाकडून येणाºया एका शेतमजूर व शेतकरीमध्ये किरकोळ वाद होऊन त्याचे पर्यावसान मारहाणीत झाल्याने चिडलेल्या शेतमजुराने ही घटना आपल्या सहकाºयांना सांगून त्याचे रूपांतर वादात झाले होते. मात्र पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी, सरपंच, दोन्ही बाजूकडील ग्रामस्थ, तहसीलदार यांच्या मध्यस्थीने सर्ववातावरण शांत होत असताना काही समाजकंटक त्याला वेगळे वळण लावण्याचा अयशस्वी प्रयत्न करताना व वेगवेगळ्या मार्गाने वाद वाढवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे जाणून खुद्द तहसीलदार व त्यांच्या पथकाने सकाळी पहाटे ५ वाजता त्या भागाचा दौरा करून त्यांची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. गिरणारे पंचक्रोशीतील शेतमजूर व शेतकºयांनी आपसातील मतभेद विसरून पुन्हा कामाला लागणे गरजेचे आहे. मजुरांच्या असहकारामुळे शेतकºयांनी आपल्या घरातील सर्व मंडळींना कामावर लावून शेतातली कामे करून घेण्यास सुरुवात केली आहे. अजूनही मजुराच्या मनातील भीती गेली नसल्याने लवकरच जिल्हा प्रशासनाच्या वतीने मजुरांच्या गावो गावी जाऊन त्यांची समजूत घातली जाणार असल्याचे नाशिकचे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी सांगितले.शेतक-यांचे नुकसान टळलेविशेष करून टमाट्याचे खूड करून होणारे नुकसान टाळले आहे. ज्या शेतकºयाकडे बागाईत क्षेत्र जास्त त्याने पर्यायी व्यवस्था म्हणून शहरातील इतर भागातून मजूर आणून आपले काम उरकते केले आहे, तर दुसºया बाजूला काही मजुरांकडे घरची शेती असल्याने त्यांनी वातावरण शांत होईपर्यंत काम सुरू केले आहे. त्यामुळे पूर्वी गाड्या भरून येणाºया मजूर आता एकटे दुकटे एसटी बस अथवा दुचाकीने शेतक-याकडे कामाला येत आहेत.धोंडेगावच्या झालेल्या बैठकीत मजुरांनी दोन दिवसांनंतर कामावर येण्यास सांगितले होते मात्र दोन दिवस होऊनही मजूर कामावर आले नाही त्यामुळे आता गावोगावी जाऊन मजुरांना कामावर येण्याचे आवाहन करणार आहे.- शिवकुमार आवळकंठे, तहसीलदार

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपNashikनाशिक