शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

भरपूर निधी असूनही कामगार रुग्णालये दुर्लक्षित : कराड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 00:30 IST

अंधेरी येथील ईएसआयसी हॉस्पिटलला आग लागून मृत्युमुखी पडलेल्या १० रुग्णांना प्रत्येकी २५ लाख, तर उर्वरित जखमींना अर्थसहाय्य करावे, अशी मागणी सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी केली आहे.

सातपूर : अंधेरी येथील ईएसआयसी हॉस्पिटलला आग लागून मृत्युमुखी पडलेल्या १० रुग्णांना प्रत्येकी २५ लाख, तर उर्वरित जखमींना अर्थसहाय्य करावे, अशी मागणी सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी केली आहे. सीटूचे नारायण, डॉ. रवि मदने व गंगाधर वरड यांनी रुग्णालयाला भेट देऊन माहिती घेतल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.  अंधेरीच्या ईएसआयसी रुग्णालयाची इमारत १९७७ मध्ये बांधण्यात आली आहे. नव्या बिल्डिंगचे काम २००९ पासून सुरू आहे व अध्यापही पूर्ण झालेले नाही. याला केंद्रीय कामगारमंत्री, ईएसआयसीचे वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत. हे बांधकाम वेळेत पूर्ण झाले असते तर जीवितहानी झाली नसती. २०१० मध्ये व नंतरही या हॉस्पिटलमध्ये स्लॅब पडणे, आग लागणे असे अपघात झाले आहेत, परंतु प्रशासनाने लक्ष दिले नाही.या हॉस्पिटलमध्ये आग आटोक्यात आणण्याची यंत्रणा का नव्हती? बीएमसीने रजिस्ट्रेशन कसे केले. याबाबतही चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक आहे. अशीच अवस्था नाशिक, औरंगाबाद व इतर हॉस्पिटलची आहे. त्याचा त्रास कामगार व जनतेला सहन करावा लागत आहे.सध्या ईएसआयसीकडे ७० हजार कोटीपेक्षा जास्त राखीव निधी पडून आहे. २०१७ मध्ये ईएसआयसीकडे १४ हजार कोटी रुपये जमा झालेत. त्यापैकी ७ हजार कोटीपेक्षा कमी रुपये वैद्यकीय सुविधांवर खर्च झाले. यावरून कामगारांचे उपचार व इतर लाभासाठी प्रचंड निधी असूनही सरकारला सक्षम यंत्रणा उभारता आली नाही. याला केंद्रीय मंत्री, राज्याचे मंत्री जबाबदार आहेत, असा आरोप डॉ. कराड यांनी केला आहे.गुन्हा दाखल करावाआगीची घटना व दहा रुग्णांचा मृत्यू का झाला याची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी. ईएसआयसीच्या सर्व रुग्णालयांचे फायर आॅडिट करण्यात यावे. ईएसआयसी रुग्णालयात डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची भरती करावी व सर्व रोगांवरील उपचाराची अद्ययावत यंत्रणा सुविधांसह उपलब्ध करण्यात यावी, या मागण्या करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Employeeकर्मचारीhospitalहॉस्पिटलNashikनाशिक