जीवनगौरव पुरस्काराने लोणारी सन्मानित नाशिक : शाळेत, वर्गात केवळ पुस्तकी ज्ञान मिळते़ परंतु क्रिकेटच्या मैदानात उतरल्यावरच जीवनात आवश्यक असलेले बौद्धिक कौशल्य निर्माण होते, असे मत क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम यांनी येथे व्यक्त केले़ कालिदास कला मंदिर येथे जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने देण्यात येणार्या जीवनगौरव पुरस्कार वितरणप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते़ भीष्मराज बाम व उद्योजक जगूभाऊ सपट यांच्या हस्ते जिल्हा क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष विलास लोणारी व त्यांच्या पत्नी प्रतिमा लोणारी यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले़ यावेळी उपस्थितांनी उभे राहून त्यांना मानवंदना दिली़ बाम म्हणाले, आज नाशिकच्या खेळाडूंमध्ये मोठी गुणवत्ता असून, राष्ट्रीय स्पर्धात ते चमकू शकतात; परंतु यासाठी सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक आहे़ तसेच शहरात अजून खेळाची मैदाने विकसित होण्याची आवश्यकता असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली़ जगूभाऊ सपट म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन कार्य केल्यानेच कोणतीही संघटना मोठी होते हे लोणारींनी दाखवून दिले आहे़ क्रिकेट संघटनेच्या पाठीशी उद्योजक भक्कमपणे उभे असून, खेळाडूंना सर्वेतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले़ पुरस्काराला उत्तर देताना लोणारी म्हणाले, हा घरचा पुरस्कार असून, मी तो स्वत: साठी नाही तर आपल्या सोबतच्या सर्व दिवंगत व हयात सहकार्यांच्या वतीने स्वीकारत आहे़ हा जीवनगौरव पुरस्कार असला तरी मी अखेरपर्यंत संघटना सोडणार नाही़ तशी संधी आपणास द्यावी, असे मत व्यक्त केले़ याप्रसंगी राज्य क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष विनोद शहा, जिल्हा संघटनेचे सचिव समीर रकटे, गजानन अहेर, हेमंत देशपांडे आदि उपस्थित होत
क्रि केटमधून निर्माण होते बौद्धिक कौशल्य : बाम
By admin | Updated: June 7, 2014 01:42 IST