शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

अतिक्रमणांमुळे कोंडला श्वास

By admin | Updated: January 20, 2016 22:29 IST

सटाणा : नगरपालिका प्रशासनाची भूमिका तळ्यात-मळ्यात

सटाणा : शहरातील साठफुटी रस्त्यावरील अतिक्र मणांमुळे अक्षरश: शहराचा श्वास दाबून धरला आहे. बायपास रखडल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाल्याने ज्येष्ठ नगरसेवकांनी या रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे नगररचना विभाग आणि पालिका प्रशासनाने अतिक्रमणधारकांना मोबदला घेऊन गाशा गुंडाळा अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशी भूमिका घेत एक महिन्याचा अल्टीमेटम दिला होता. मात्र तीन महिने उलटूनही पालिका प्रशासनाने अद्याप कारवाई न केल्याने शहरवासीयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.शहरामधून जाणाऱ्या विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर वाढत्या अपघातांमुळे अनेक निष्पापांचे बळी गेल्याने बायपासचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या मागणीसाठी सटाणा वकील संघाने आंदोलनाचे हत्त्यार उपसले आहे. त्याला तात्पुरता पर्याय म्हणून आता पालिका प्रशासन आणि नगररचना विभागाने साठफुटीचा मार्ग अवलंबला आहे. वकील संघाच्या इशाऱ्यामुळे पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, अभियंता शालिमार कोर, नगररचना विभागाचे सोमनाथ केकांग यांनी अतिक्र मणधारकांसह ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब सोनवणे, माजी आमदार संजय चव्हाण, गटनेते काका रौंदळ, नगरसेवक सुमनताई सोनवणे, कौश्यल्याबाई सोनवणे यांची तातडीची बैठक घेतली होती. यावेळी सर्वच अतिक्रमणधारकांशी चर्चा करून वाढीव चटईक्षेत्र, विकास हस्तांतरण हक्क, आर्थिक मोबदला असे तीन पर्याय अतिक्रमणधारकांपुढे ठेवले. या तिन्ही पर्यायांपैकी एक पर्याय निवडून एक महिन्याच्या आत अतिक्रमण काढून शहर विकासास हातभार लावा, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. बांगर यांनी केले. अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. दरम्यान, पालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे साठफुटी रस्त्याचे काम रखडले आहे. येत्या महिनाभराच्या आत हा रस्ता मोकळा न केल्यास पालिका प्रशासनाविरुद्ध आंदोलन पुकारू, असा इशारा माजी आमदार संजय चव्हाण यांनीदेखील दिला होता. मात्र ना कोणाला आंदोलनाची आठवण राहिली, ना पालिका प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याची हिंमत दाखवली. पालिका प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून साठफुटीचा विकास रखडला आहे. परिणामी मार्ग रोखून नागरिकांना वेठीस धरण्याचे काम केले जात आहे.शहरातील ताहाराबादरोड या मुख्य रस्त्यावरील वर्दळीचा ताण कमी करण्यासाठी नगररचना विभागाने समांतर रस्ता म्हणून साठफुटी रस्ता तयार करण्यात आला. मात्र हा रस्ता सुरु वातीपासूनच अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. पं. ध. पाटील नगरात काही बंगल्यांच्या बांधकामांना पालिकेने परवानगी दिल्यामुळे या रस्त्याचा विकास कोर्टकचेरीतच अडकला. कोर्टातही पालिका प्रशासनावर नामुष्कीची वेळ आली. ते प्रकरण मिटत नाही तोच या रस्त्यावर चौगाव रोडनजीक तेरा जणांनी पक्की बांधकामे करून पूर्णपणे रस्ता अडवला आहे. हा रस्ता नामपूररोड ते शिवाजीनगरपर्यंत विकसित करण्यात आला आहे. मात्र या तेरा जणांच्या अतिक्रमणांमुळे हा समांतर रस्ता अद्यापही मालेगावरोडला जोडता आलेला नाही याबाबत अनेक वेळा विविध संघटना तसेच नगरसेवकांनी देखील आवाज उठवून साठफुटी रस्त्याचा श्वास मोकळा करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती; मात्र राजकीय दबावापुढे पालिका प्रशासनाने वेळोवेळी गुडघे टेकण्याचे काम केल्याचे दिसून येते. (वार्ताहर)