शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांना चाखयला मिळाला कोकण हापूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 16:05 IST

नुसते नाव ऐकले तरी तोंडाला पाणी आणणाऱ्या कोकणच्या हापूसाचा स्वाद नाशिककरांना गेल्या आठवडाभर चाखायला मिळाला. महाराष्ट्र राज्य पणन मंडळाने आयोजित केलेल्या आंबा महोत्सवात कोकणच्या शेतकऱ्यांनी रत्नागिरी, देवगड, राजापूरच्या हापूस विक्रीसाठी ठेवला होता. थेट शेतकऱ्यांच्या आमराईतून आलेल्या या आंब्यांची नाशिककरांनाही चांगलीच भूरळ पडल्याचे पहायला मिळाले.

ठळक मुद्देनाशिककरांनी चाखला कोणच्या हापूसचा स्वादपणन मंडळाच्या आंबा महोत्सवाला उत्फूर्त प्रतिसाद आंबा महोत्सवात 20 लाख रुपयांची उलाढाल

नाशिक : नुसते नाव ऐकले तरी तोंडाला पाणी आणणाऱ्या कोकणच्या हापूसाचा स्वाद नाशिककरांना गेल्या आठवडाभर चाखायला मिळाला. महाराष्ट्र राज्य पणन मंडळाने आयोजित केलेल्या आंबा महोत्सवात कोकणच्या शेतकऱ्यांनी रत्नागिरी, देवगड, राजापूरच्या हापूस विक्रीसाठी ठेवला होता. थेट शेतकऱ्यांच्या आमराईतून आलेल्या या आंब्यांची नाशिककरांनाही चांगलीच भूरळ पडल्याचे पहायला मिळाले. कोकणची ओळख असलेल्या हापूसचा प्रामुख्याने समावेश असलेल्या आंबा महोत्सवाला नाशिककरांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला. पणन मंडळाच्या नाशिक शाखेतर्फे रावसाहेब थोरात सभागृहाच्या आवारात मंगळपारपासून सुरू असलेल्या आंबा महोत्सवाचा रविवारी (दि.20) समारोप झाला. अशाप्रकारे शासकीय यंत्रणोमार्फत नाशिकमध्ये पहिल्यांदाच आयोजित आंबा महोत्सवाला नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने कोकणातून नाशिकमध्ये आबा विक्रीसाठी आलेल्या शेतक:यांनीही समाधान व्यक्त केले असून अशाप्रकारे दरवर्षी आंबा महोत्सवाचे नियोजन होण्याची गरज कोकणच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.त्यामुळेच रविवापर्यंत चालणाऱ्या महोत्सवात बहूंतांश शेतकऱ्यांचे आंबे शनिवारपर्यंत सपल्याचे दिसून आले. या आंबा महोत्सवात रत्नागिरी, देवगड, राजापूर, चिपळूण, सिंधुदुर्ग आदी परिसरातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आंबे उपलब्ध असल्याने नाशिककरांची या आंब्याना चागलीच पसंती मिळाली. आंबा महोत्सवात 300ते 700रुपये डजनापासून आकारानुसार तीन ते पाच डझनाची लाकडी पेटी 2 हजार रुपयांपासून मिळत असल्याने अनेक ग्राहकांनी थेट पेटीच खरेदी करणो पसंत केले. त्यामुळे रविवापर्यंत चालणाऱ्या या आंबा महोत्सवात सहभागी शेतकऱ्यांचा माल शनिवारीच संपल्याची माहिती पणन मंडळातर्फे देण्यात आली. दरम्यान, ग्राहकांचा ओघ पाहून काही शेतकऱ्यांनी रविवारी काही प्रमाणात नव्याने माल मागविल्याची माहीती पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.20 लाख रुपयांंची उलाढालआंबा महोत्सवात सहभागी 14 शेतकऱ्यांचा जवळपास सर्व माल विकला गेल्याने या महोत्सवात सहभागी शेतकऱ्यांचा प्रत्येकी 1 लाख 25 हजार ते दीड लाख रुपयांपर्यत व्यावसाय झाला. त्यामुळे या आंबा महोत्सवात सुमारे 20 ते 21 लाख रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती पणन मंडळाने दिली आहे.

टॅग्स :MangoआंबाNashikनाशिकFarmerशेतकरी