शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

किसान रेल्वेने केली साडेबारा हजार टन मालाची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 01:10 IST

दोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांचा शेतमालाची वाहतूक करण्यासाठी देवळालीतून सुरू झालेल्या किसान रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळत असून, आत्तापर्यंत १२ हजार ४०० टन विविध वस्तूंची वाहतूक या माध्यमातून करण्यात आली आहे.

नाशिकरोड : दोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांचा शेतमालाची वाहतूक करण्यासाठी देवळालीतून सुरू झालेल्या किसान रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळत असून, आत्तापर्यंत १२ हजार ४०० टन विविध वस्तूंची वाहतूक या माध्यमातून करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेने देशात सर्वप्रथम देवळाली ते मुझफ्फरपूर ही किसान रेल सुरू करून लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना दिलासा दिला. आता ही गाडी आठवड्यातून तीन वेळेस धावू लागली आहे. तसेच नागपूर ते आदर्शनगर, दिल्ली (साप्ताहिक), सांगोला ते मनमाड (त्रि-साप्ताहिक) आणि सांगोला ते सिकंदराबाद (साप्ताहिक) या आणखी किसान रेल सुरू केल्या आहेत. बर्फात ठेवलेले मासे, डाळिंब, कॅप्सिकम, हिरवी मिरची, आले, भाजीपाला व नाशवंत वस्तूंची किसान रेल्वे वाहतूक करत आहे.

 

 

लॉकडाऊन व अनलॉक कालावधीदरम्यान रेल्वेने प्राधान्याने अत्यावश्यक वस्तू व मालाची वाहतूक केली. फळ आणि भाजीपाला यासारख्या नाशवंत वस्तूंच्या वाहतुकीसाठी किसान रेलची सुरुवात करून शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विक्रीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

 

मागील ७ महिन्यांत मध्य रेल्वेने सुमारे १३,४०० मालवाहतूक गाड्या चालवल्या. दररोज सरासरी २,७७६ वॅगनप्रमाणे एकूण ६.४४ लाख वॅगन्समधून विविध वस्तूंची वाहतूक केली आहे. मध्य रेल्वेने २.५० लाख वॅगन्समधून कोळसा, १.९५ लाख वॅगन्समधून कंटेनर्स, ४२,९८५ वॅगन्समधून सिमेंट, ५,१२७ वॅगन्समधून अन्नधान्य, ३०,२२२ वॅगन्समधून खते, ६०,५४१ वॅगन्समधून पेट्रोल, तेल व वंगण, १६,९७३ वॅगन्समधून पोलाद, ३३०३ वॅगन्समधून साखर, ७,८०५ वॅगन्समधून कांदा, २,३२७ वॅगन्समधून कडबा तर संकीर्ण मालाची २८,७२७ वॅगन्समधून वाहतूक केली आहे.

 

 

 

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेतीrailwayरेल्वे