शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

बसस्थानकात घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2020 10:43 PM

राज्यात सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू असून, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असताना बसस्थानकात प्रवाशांची वर्दळ सुरू झाली आहे. मात्र येथील बसस्थानकात निर्माण झालेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी रिपाइंच्या वतीने निवेदनाद्वारे आगार व्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमनमाड : रिपाइंकडून आगार व्यवस्थापकांना निवेदन

मनमाड : राज्यात सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू असून, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असताना बसस्थानकात प्रवाशांची वर्दळ सुरू झाली आहे. मात्र येथील बसस्थानकात निर्माण झालेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी रिपाइंच्या वतीने निवेदनाद्वारे आगार व्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे.कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी बससेवा बंद होती. काही महिन्यांपूर्वी जिल्हांतर्गत बससेवा सुरू करण्यात आली होती. त्यास प्रवाशांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी नुकतेच आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाल्याने बसस्थानकावर प्रवाशांची वर्दळ दिसून येत आहे. आगारात सर्वत्र निर्माण झालेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून, कचराकुंड्या ओसंडून वाहत आहेत. प्रवाशांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार बसस्थानकात सुरू असून, याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी रिपाइंच्या वतीने आगार व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर रिपाइं युवक तालुकाध्यक्ष गुरुकुमार निकाळे, विशाल पाटील, मनीष चाबुकस्वार, अमोल लंकेश्वर, बाळासाहेब खरे, आनंद अंकु श आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षºया आहे.

टॅग्स :Bus DriverबसचालकGovernmentसरकार