शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

पूररेषा कमी करण्यासाठी किकवी धरणाचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 01:14 IST

नाशिक- शहराच्या वाढीव लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन प्रस्तावित केलेले किकवी धरण त्वरीत बांधावे, सदरचे धरण बांधल्यास नाशिक शहराची पुरपातळी तीस मिटर ...

ठळक मुद्देपालकमंत्र्यांना साकडे: शहरासाठी अतिरीक्त पाणी वाढणार

नाशिक- शहराच्या वाढीव लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन प्रस्तावित केलेले किकवी धरण त्वरीत बांधावे, सदरचे धरण बांधल्यास नाशिक शहराची पुरपातळी तीस मिटर कमी होऊ शकते असा दावा जलचिंतन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केला आहे. यासंदर्भात राष्टÑवादी कॉँग्रेसच्या जलचिंतन सेलच्या वतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांना साकडे घालण्यात आले आहे.नाशिक शहराच्या वाढीव पाणी पुरवठ्यासाठी राज्य शासनाने किकवी धरण प्रस्तावित केले होते. त्यावेळी राज्यात राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाची सत्ता होती. त्यानंतर मात्र गेल्या भाजप सरकारने धरणाचा प्रस्ताव रद्द केला आहे. आता ते धरण बांधावे यासाठी जलचिंतनने पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देऊन साकडे घातले आहे. नाशिक शहरात २००८ मध्ये महापूर आला होता. त्यामुळे महापालिकेने पाटबंधारे विभागामार्फत पूररेषा आखली आहे.ही पुररेषा आखल्याने हजारो मिळकती मातीमोल झाल्या आहेत. त्या पाश्वर्भूमीवर पूररेषा कमी करण्याची मागणी आहे. त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही. मात्र, ही पुररेषा कमी करण्यासाठी किकवी धरण उपाय होऊ शकते.या छोट्या धरणामुळे शहराला २ हजार दश लक्ष घन फुट पाणी अतिरीक्त उपलब्ध होईलच शिवाय तीस मीटरने पूररेषा कमी होईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी डी. सी. पाटील, किशोर गायकवाड, जयाताई बच्छाव आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :WaterपाणीDamधरण