शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

खरीपाच्या पिकांनी दिली बळीराजाला साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 3:16 PM

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील खरीप हंगामातील सर्व कामे करून पिके जोमाने वाढू लागले आहे. त्यामुळे खरीप हंगामातील सर्व पिकांनी बळीराजांला चांगली साथ दिली आहे. परंतु पिकांना आता खत टंचाई निर्माण झाल्याने बळीराजा अडचणीत आल्याने त्यांच्यावर डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देलखमापूर : खतांच्या टंचाईने शेतकरीअडचणीत

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील खरीप हंगामातील सर्व कामे करून पिके जोमाने वाढू लागले आहे. त्यामुळे खरीप हंगामातील सर्व पिकांनी बळीराजांला चांगली साथ दिली आहे. परंतु पिकांना आता खत टंचाई निर्माण झाल्याने बळीराजा अडचणीत आल्याने त्यांच्यावर डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.तालुक्यातील लखमापूर, परमोरी, करंजवण, ओझे, दहेगाव वागळुद, अवनखेड, ओझरखेड, दहिवी आदी परिसरातील सोयाबीन, मका, भुईमूग, उडीद, भात, नागली, खुरसणी, ज्वारी, बाजरी या खरीप हंगामातील पिकांनी चांगला जोमाने वाढण्यास सुरु वात केली आहे. परंतु पिकांसाठी पोषक असलेले खतांची टंचाई निर्माण झाल्याने बळीराजांच्या नियोजनावर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या युरिया टंचाई बळीराजा त्रस्त झाला आहे. बुकिंग करून ही युरिया खत मिळत नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेतआहे.सध्या शेतकरी वर्गासमोर जोमाने आलेल्या खरीप हंगामातील पिकांना जे खाद्य देणे. परंतु ते जर पिकांना वेळेवर नाही भेटले. तर पिके पिवळी पडून पिके नष्ट होतील की काय? अशी भिती व्यक्त केली जात आहे.मध्यंतरी पावसाने आपला लहरीपणा दाखवत पोबारा केला होता. परंतु आता पिकाला पोषक असा पाऊस झाल्याने बळीराजांच्या चेहऱ्यावर हसु निर्माण झाले होते. पण आता खताची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने आता पुढे काय? असा सवाल निर्माण झाला आहे.मिळेल त्या ठिकाणाहून आगाऊ खताची बुकिंग करून तसेच तारेवरची कसरत करून आपली पिके वाचविण्यासाठी शेतकरी वर्गाची त्रेधा तिरपीट उडत आहे. तरी पण आपल्या खरीप हंगामाच्या नियोजनावर पाणी फिरू नये. यासाठी शेतकरीवर्गाने मोर्चा बांधणीला सुरु वात केली आहे.चौकट......सध्या शेतकरी वर्गाला भाजीपाल्याने मायेचा हात दिल्याने, शेतकरी वर्गाला थोडेफार खेळते भांडवल उपलब्ध झाल्याने बळीराजांला मोठा आधार मिळाला आहे. त्यामुळे कठीण संकटात शेतकरी वर्गाला नगदी पिकांनी साथ दिल्याने बळीराजांची नौका थोडी फार का होईना तिराला लागली आहे. त्यामध्ये सध्या कोथिंबीर, कोबी, काकडी,भेंडी व इतर काही ठराविक भाजीपाला यांनी शेतकरी वर्गाला आधार दिला आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी