शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
4
"तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
5
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
6
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
7
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
8
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
9
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
10
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
11
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
12
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
13
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
14
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
15
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
16
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
17
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
18
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
19
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
20
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती

कश्यपी प्रकल्पग्रस्तांचा प्रस्ताव अखेर स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 00:47 IST

कश्यपी धरणातील अवघ्या पाच कोटी रुपयांच्या सहभागानंतर तेथील सर्व प्रकल्पग्रस्त महापालिकेच्या सेवेत घेण्यावरून महासभेत वादळी चर्चा झाली. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश धाब्यावर बसवून प्रकल्पग्रस्तांना थेट मनपा सेवेत घेता येणार नाही, अशी भूमिका काही नगरसेवकांनी तर घेतलीच, परंतु प्रशासन उपआयुक्त मनोज घोडे पाटील यांनी अर्धवट आणि अपुरी माहिती दिल्याने महापौर त्यांच्यावर संतप्त झाले. अखेरीस कायदेशीर बाबींच्या माहितीसाठी हा प्रस्ताव तहकूब करण्यात आला. त्यामुळे ३६ प्रकल्पग्रस्तांचे भविष्य टांगणीला लागले आहे.

ठळक मुद्देकायदेशीर अडचण : प्रशासनाच्या अर्धवट माहितीमुळे नगरसेवक संतप्त

नाशिक : कश्यपी धरणातील अवघ्या पाच कोटी रुपयांच्या सहभागानंतर तेथील सर्व प्रकल्पग्रस्त महापालिकेच्या सेवेत घेण्यावरून महासभेत वादळी चर्चा झाली. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश धाब्यावर बसवून प्रकल्पग्रस्तांना थेट मनपा सेवेत घेता येणार नाही, अशी भूमिका काही नगरसेवकांनी तर घेतलीच, परंतु प्रशासन उपआयुक्त मनोज घोडे पाटील यांनी अर्धवट आणि अपुरी माहिती दिल्याने महापौर त्यांच्यावर संतप्त झाले. अखेरीस कायदेशीर बाबींच्या माहितीसाठी हा प्रस्ताव तहकूब करण्यात आला. त्यामुळे ३६ प्रकल्पग्रस्तांचे भविष्य टांगणीला लागले आहे.महापालिकेत वारंवार भरतीसाठी नगरसेवक प्रयत्न करीत असताना त्यांना रिक्त पदांची कायदेशीर अडचण सांगितली जाते, मात्र गेल्या वीस वर्षांत ठेकदारांकडील कर्मचारी मागील दाराने महापालिकेत भरले जातात आणि आताही अशाप्रकारे कायदेशीर बाजू तपासून न बघता प्रस्ताव सादर केल्याबद्दल महापौर कुलकर्णी यांनी घोडे पाटील यांची चांगली कानउघडणी केली.कश्यपी प्रकल्पग्रस्तांना घेण्याचा प्रस्ताव शासनाकडील बैठकीचा संदर्भ घेऊन प्रशासनाने मांडला होता, मात्र त्यात अनेक त्रुटी होत्या. प्रकल्पग्रस्तांची थेट भरती करता येत नाही, त्यासाठी जाहिरात देऊन आणि पात्रतेनुसारच भरती करावी असा निर्णय औरंगाबाद येथील पूर्ण खंडपीठाने दिला आहे. त्याचा संदर्भ जिल्हा प्रशासनाच्या पत्रात असताना ही माहिती मनपा अधिकाऱ्यांनी प्रस्तावात दडवली. कश्यपी धरण बांधताना महापालिकेने पाच कोटी रुपये भरल्यानंतरदेखील जलसंपदा विभागाने महापालिकेशी कोणताही करार केला नाही, असे असताना प्रस्तावात मात्र कराराचा संदर्भ देण्यात आल्याने गुरुमितसिंग बग्गा आणि गजानन शेलार यांनी उपआयुक्तांना धारेवर धरले.जलसंपदा विभागाने कोणतेही दायित्व न स्वीकारता सर्व जबाबदारी महापालिकेवर लोटल्यानेदेखील नगरसेवकांनी जाब विचारला, तर सुदाम डेमसे यांनी पाथर्डी येथील प्रकल्पग्रस्तांनादेखील समावून घेण्याची मागणी केली. चंद्रकात खाडे यांनी कश्यपी प्रकल्पग्रस्तांची बाजू मांडली. तथापि, न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणे शक्य असल्याने प्रशासाने काळजीपूर्वक प्रस्ताव पुढील महासभेत सादर करण्याचे आदेश महापौरांनी यावेळी दिले आहेत.पगार-डहाळे यांचे प्रस्ताव फेटाळलेमहापालिकेच्या सेवेत अधिकारी वर्ग अपुरा असल्याच्या नावाखाल िरिक्त पदांपेक्षा अधिक अधिकाऱ्यांची मागणी करण्याचे प्रकरण प्रशासनाच्या अंगाशी आले. उपआयुक्तपदाच्या चार जागा रिक्त असून, त्यातून दोन जागा स्थानिक अधिकाºयांच्या पदोन्नतीने भरण्याऐवजी एकूण शासकीय सेवेतील सहा अधिकारी प्रतिनियुक्तीवर मागविण्यात आले. सदरचा प्रकार उघड झाल्याने नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि त्यानंतर उपआयुक्तपदासाठी शासनाकडून पाठविण्यात आलेले विजय पगार आणि करुणा डहाळे यांना मूळ सेवेत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. सभागृह नेते सतीश सोनवणे यांनी पदोन्नती समितीची बैठक बोलविण्याऐवजी अडवणूक केली जात असल्याचा आरोप यावेळी केला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाDamधरण