शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

काश्मीरप्रश्नी केंद्राची विशेष रणनीती

By admin | Updated: April 30, 2017 01:52 IST

नाशिक : काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने होणाऱ्या दगडफेकीच्या घटना व त्यामुळे उफाळून येणाऱ्या हिंसाचारात राष्ट्रविरोधी शक्तींचा हात आहे

नाशिक : काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने होणाऱ्या दगडफेकीच्या घटना व त्यामुळे उफाळून येणाऱ्या हिंसाचारात राष्ट्रविरोधी शक्तींचा हात आहे. गेल्या ६० वर्षांत त्यांना भारतीय सैन्याशी समोरासमोर लढणे शक्य होत नसल्याने अशाप्रकारे काश्मिरी तरुण-तरुणींची दिशाभूल करून माथे भडकविण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. परंतु, यात त्यांना कधीही यश प्राप्त होणार नाही, असा विश्वास व्यक्त करतानाच काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार विशेष रणनीती तयार करीत असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली. भारतीय माजी सैनिक संघाच्या नाशिक शाखेतर्फे येथील स्वामी नारायण स्कूलमध्ये आयोजित राष्ट्रस्तरीय माजी सैनिक अधिवेशनात सुभाष भामरे बोलत होते. व्यासपीठावर संघटनेचे मार्गदर्शक इंद्रेश कुमार, निवृत्त लेफ्टनंट जनरल व्ही. एन. पाटील, ग्रुप कॅप्टन पाठक आदि उपस्थित होते. भामरे म्हणाले, काश्मीरमध्ये विविध कारणांनी रस्त्यावर उतरून दगडफेक, घोषणाबाजी करणारे तरुण- तरुणी आपल्या देशाचे नागरिक आहेत. त्यांना नुकसान पोहोचवून खोऱ्यात शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही. त्यांना भडकवणाऱ्यांचे समूळ उच्चाटन आवश्यक असून, त्यासाठी सरकार विशेष रणनीती तयार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)