शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

कैलास पगारे यांच्या ‘माणूसनामा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

By admin | Updated: February 2, 2015 00:49 IST

कैलास पगारे यांच्या ‘माणूसनामा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

नाशिक : पूर्वीची कविता ही कशिदा काढणारी होती. साहित्यही माणसाला आनंद देणारे होते. याउलट दलित साहित्याने माणसाला अस्वस्थ केले आणि दलित कवितेने मराठी साहित्याचा चेहरामोहराच बदलून टाकला, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक व विचारवंत प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे यांनी केले. कवी कैलास पगारे यांचा नागरी सत्कार व त्यांच्या ‘माणूसनामा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झाले, त्यावेळी ते बोलत होते. कवी पगारे व त्यांच्या पत्नी यशोदा पगारे यांचा मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील, महापौर अशोक मुर्तडक उपस्थित होते. पानतावणे म्हणाले की, माणुसकीचे अवमूल्यन करणारी प्रस्थापित मूल्ये विद्रोहाद्वारे नाकारली जातात. डॉ. आंबेडकरांनी दलितांना विद्रोहाची ताकद दिली. ज्यांचे सांस्कृतिक दमन झाले, त्यांना परिवर्तनाचे बोट धरून पुढे जाण्याची जाणीव दलित कवितेतून मिळते. आपली भाषा, प्रतिके, प्रतिमा या आंबेडकरी तत्त्वज्ञानातून आल्या आहेत. त्यामुळे त्यांची मुद्रा स्वतंत्र आहे. आपली भाषा कोणताही परिवेश चढवून आलेली नाही. ती दु:खातून आली आहे. त्यामुळे या भाषेतील साहित्य माणसाला अस्वस्थ करते. अध्यक्षीय भाषणात कसबे म्हणाले की, माणूस या प्राण्याने संस्कृती बनवली म्हणून तो माणूस बनला. काव्य, कला, क्रीडा हा संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. कविता ज्याच्या जगण्याची गरज बनते, तोच खरा माणूस बनतो. उत्तम कलावंत हाच उत्तम माणूस बनू शकतो. महापौर मुर्तडक यांनीही मनोगत व्यक्त केले. कवी पगारे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, राज्य घटनेने आपल्याला लिहिण्याचा, बोलण्याचा हक्क दिला आहे. बोलण्याने व्यवस्था बदलू शकते. तेव्हा प्रत्येकाने बोलायला हवे. विनायकदादा पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मनीषा जगताप यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रा. महादेव कांबळे यांनी मानपत्राचे वाचन केले. प्रा. विवेक खरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विशाल जाधव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)