शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

करवाढ रद्द निर्णयावरून भाजपातच द्वंद्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 01:05 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करवाढीसंदर्भात निर्गमित केलेला आदेश रद्द करण्यावरून भाजपाअंतर्गतच जुंपली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे परस्पर विरोधी माहिती देण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सभागृह नेत्यांनी हात झटकले असून, हा पालकमंत्र्यांना अंधारात ठेवल्याप्रकरणी शहराध्यक्षांवर जबाबदारी लोटली आहे. दुसरीकडे करवाढ रद्द करण्याचा निर्णय आपण दिनकर पाटील यांना कधीही दिला नव्हता.

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करवाढीसंदर्भात निर्गमित केलेला आदेश रद्द करण्यावरून भाजपाअंतर्गतच जुंपली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे परस्पर विरोधी माहिती देण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सभागृह नेत्यांनी हात झटकले असून, हा पालकमंत्र्यांना अंधारात ठेवल्याप्रकरणी शहराध्यक्षांवर जबाबदारी लोटली आहे. दुसरीकडे करवाढ रद्द करण्याचा निर्णय आपण दिनकर पाटील यांना कधीही दिला नव्हता. आपण महापौर आणि गटनेत्यांशी चर्चा केली होती, असा दावा शहराध्यक्ष सानप यांनी मंगळवारी (दि.२४) केला आहे.  स्थानिक भाजपातील गटबाजीमुळे त्रस्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुकाराम मुंढे यांच्यासारखा आयुक्त पाठविला. मुंढे यांच्या कार्यपद्धतीवरून भाजपाअंतर्गत विरोधी गट एकत्र आल्याचे दिल्याचे चित्र निर्माण झाले असताना करवाढीचा निर्णय पालकमंत्र्यांना अंधारात ठेवून घेण्यात आल्याचे उघड होताच पुन्हा कुरघोडीचे राजकारण सुरू झाल्याचे वृत्त आहे.  गेल्या १९ जुलैस करवाढ रद्द करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला. यावेळी सात ते आठ तास चाललेल्या महासभेत आयुक्तांच्या आदेशाच्या विरोधात १०५ नगरसेवकांनी भूमिका घेतली असली तरी तत्पूर्वी म्हणजे १४ जुलै रोजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मनपातील भाजपा पदाधिकारी आणि आयुक्तांची बैठक घेतली व त्यात भाजपा पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आठ दिवसांत निर्णय घेऊ, असे जाहीर केले होते. परंतु तत्पूर्वीच महासभा झाल्याने अखेरीस भाजपाने करवाढविरोधी निर्णय  घेतला होता. मात्र पालकमंत्र्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा न करता हा निर्णय झाल्यानंतर त्यांनी शहराध्यक्षांना याबाबत विचारणा केली असता  त्यांनी सभागृहनेता दिनकर पाटील व गटनेता संभाजी मोरुस्कर यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितल्याचे वृत्त आहे.  त्यामुळे पाटील यांनी नाराजी व्यक्त करून पालकमंत्री गिरीश महाजन, संघटनमंत्री किशोर काळकर यांना निवेदन पाठविले असून, त्यात म्हटल्यानुसार करवाढ रद्द करण्याचा निर्णय भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप आणि महापौर रंजना भानसी यांचा आहे. आपण केवळ त्याचे पालन केले. महापालिकेतील सर्व निर्णय तेच घेत असतात, असेही त्यांनी म्हटले आहे. करवाढ रद्दच्या विषयावर सभागृह नेतेच भूमिका बदलत असल्याने गोंधळाचे वातावरण आहे.  शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी मात्र हा निर्णय आपण घेतला. यात दुमत नाही. सभागृहात १०५ सदस्यांनी करवाढीच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे मी सभागृहाबरोबर रहात असल्याचे सांगितले, असे सानप म्हणाले.पालकमंत्र्यांशी बोलणारकरवाढीच्या विषयावर मी पहिल्यापासून शेतकºयांबरोबर आहे. पालकमंत्र्यांनी आठ दिवसांत निर्णय देऊ, असे सांगितले असतानाही मध्येच महासभा घेण्यात आली. त्यामुळे करवाढीबाबत निर्णय घेणे भाग होते. महासभेत काय निर्णय घ्यायचा? असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा १०५ नगरसेवक विरोधात बोलल्याने निर्णय घेणे भाग होते. त्यानुसार मी, महापौर रंजना भानसी आणि गटनेता संभाजी मोरुस्कर यांच्याशी चर्चा केली. पाटील यांच्याशी चर्चा केली नव्हती. पालकमंत्र्यांशी करवाढ रद्दच्या निर्णयाबाबत अद्याप बोलणे झालेले नाही. त्यांच्याशी मी चर्चा करेल.- बाळासाहेब सानप, आमदार

टॅग्स :BJPभाजपाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका