शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

गुन्हे शोध पथकातील पोलिसांच्या पाठलागामुळे गेला तरुणाचा जीव?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:55 IST

आडगाव शिवारातील ट्रक टर्मिनसजवळ संशयास्पद असलेल्या तीन युवकांचा आडगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी पाठलाग सुरू केल्याने पळ काढताना विहिरीत पडलेल्या तिघांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार शनिवारी (दि़१६) उघडकीस आला़ पवन प्रमोद पाटील (२५, राग़ुरू गंगेश्वर सोसायटी, वेद मंदिराजवळ, तिडके कॉलनी, नाशिक) असे बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे़

नाशिक : आडगाव शिवारातील ट्रक टर्मिनसजवळ संशयास्पद असलेल्या तीन युवकांचा आडगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी पाठलाग सुरू केल्याने पळ काढताना विहिरीत पडलेल्या तिघांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार शनिवारी (दि़१६) उघडकीस आला़ पवन प्रमोद पाटील (२५, राग़ुरू गंगेश्वर सोसायटी, वेद मंदिराजवळ, तिडके कॉलनी, नाशिक) असे बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे़विशेष म्हणजे तिघांपैकी दोघांना विहिरीबाहेर काढणारे पोलीस व वाचलेले दोघे यांच्यापैकी कुणीच बेपत्ता पवनचा शोध न घेतल्याने संशय निर्माण झाला असून, पोलिसांच्या पाठलागामुळे मुलाचा जीव गेल्याचा आरोप केला जातो आहे़़ आडगाव शिवारातील हॉटेलमध्ये बुधवारी (दि़१३) मध्यरात्री वाढदिवस साजरा केल्यानंतर काही जण माघारी गेले, तर पवन प्रमोद पाटील, जितेंद्र रामकुमार शर्मा (२२, राधिका सोसायटी, तपोवन) व सुनील साहेबराव जमदाडे (रा़आकृती अपार्टमेंट, अंबड लिंक रोड, नाशिक) हे तिघे ट्रक टर्मिनसजवळ उभे होते़ पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास आडगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील कर्मचारी नाजीर शेख, मिथुन गायकवाड व वैभव परदेशी हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना हे तिघे संशयास्पदरीत्या उभे असल्याचे दिसले़ पोलिसांनी या तिघांचा पाठलाग सुरू केला असता त्यांनी महामार्ग ओलांडत आडगाव ट्रक टर्मिनसमोरील जय महाराष्ट्र भोजनालयाकडे पळाले असता ते पाठीमागील विहिरीत पडले़ यापैकी जितेंद्र शर्मा व सुनील जमदाडे यांना पोलिसांनी बाहेर काढले, मात्र तिसºयाचा शोध लागला नाही़ सकाळी साडेपाच वाजता अग्निशमन दलास माहिती दिल्यानंतर त्यांनीही गळ टाकून बघितला, मात्र मृतदेह सापडला नाही़, तर शनिवारी (दि़१६) सकाळी पवन पाटील याचा मृतदेह पाण्याबाहेर तरंगताना आढळून आला़ दरम्यान, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ दरम्यान, गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी पाण्याबाहेर काढलेल्या दोघांना पळून जाण्याबाबतचा जाबजबाब घेतला नसल्याचेही कळते़ यामुळे पोलिसांनी तसेच वाचलेल्या दोघांनी पवन पाटील याची दोन दिवस साधी चौकशीही न केल्याने संशय निर्माण झाला आहे़ याबरोबरच साडेतीन वाजेची घटना असताना पोलिसांनी ५़३० वाजता अग्निशमन दलास का माहिती दिली? पोलीस पाठलाग करीत होते, तर हे तिघे ट्रक टर्मिनसकडे असताना महामार्ग ओलांडून इकडे कसे पळाले असे अनेक प्रश्न निर्माण झालेआहेत़