शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

गुन्हे शोध पथकातील पोलिसांच्या पाठलागामुळे गेला तरुणाचा जीव?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:55 IST

आडगाव शिवारातील ट्रक टर्मिनसजवळ संशयास्पद असलेल्या तीन युवकांचा आडगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी पाठलाग सुरू केल्याने पळ काढताना विहिरीत पडलेल्या तिघांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार शनिवारी (दि़१६) उघडकीस आला़ पवन प्रमोद पाटील (२५, राग़ुरू गंगेश्वर सोसायटी, वेद मंदिराजवळ, तिडके कॉलनी, नाशिक) असे बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे़

नाशिक : आडगाव शिवारातील ट्रक टर्मिनसजवळ संशयास्पद असलेल्या तीन युवकांचा आडगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी पाठलाग सुरू केल्याने पळ काढताना विहिरीत पडलेल्या तिघांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार शनिवारी (दि़१६) उघडकीस आला़ पवन प्रमोद पाटील (२५, राग़ुरू गंगेश्वर सोसायटी, वेद मंदिराजवळ, तिडके कॉलनी, नाशिक) असे बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे़विशेष म्हणजे तिघांपैकी दोघांना विहिरीबाहेर काढणारे पोलीस व वाचलेले दोघे यांच्यापैकी कुणीच बेपत्ता पवनचा शोध न घेतल्याने संशय निर्माण झाला असून, पोलिसांच्या पाठलागामुळे मुलाचा जीव गेल्याचा आरोप केला जातो आहे़़ आडगाव शिवारातील हॉटेलमध्ये बुधवारी (दि़१३) मध्यरात्री वाढदिवस साजरा केल्यानंतर काही जण माघारी गेले, तर पवन प्रमोद पाटील, जितेंद्र रामकुमार शर्मा (२२, राधिका सोसायटी, तपोवन) व सुनील साहेबराव जमदाडे (रा़आकृती अपार्टमेंट, अंबड लिंक रोड, नाशिक) हे तिघे ट्रक टर्मिनसजवळ उभे होते़ पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास आडगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील कर्मचारी नाजीर शेख, मिथुन गायकवाड व वैभव परदेशी हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना हे तिघे संशयास्पदरीत्या उभे असल्याचे दिसले़ पोलिसांनी या तिघांचा पाठलाग सुरू केला असता त्यांनी महामार्ग ओलांडत आडगाव ट्रक टर्मिनसमोरील जय महाराष्ट्र भोजनालयाकडे पळाले असता ते पाठीमागील विहिरीत पडले़ यापैकी जितेंद्र शर्मा व सुनील जमदाडे यांना पोलिसांनी बाहेर काढले, मात्र तिसºयाचा शोध लागला नाही़ सकाळी साडेपाच वाजता अग्निशमन दलास माहिती दिल्यानंतर त्यांनीही गळ टाकून बघितला, मात्र मृतदेह सापडला नाही़, तर शनिवारी (दि़१६) सकाळी पवन पाटील याचा मृतदेह पाण्याबाहेर तरंगताना आढळून आला़ दरम्यान, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ दरम्यान, गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी पाण्याबाहेर काढलेल्या दोघांना पळून जाण्याबाबतचा जाबजबाब घेतला नसल्याचेही कळते़ यामुळे पोलिसांनी तसेच वाचलेल्या दोघांनी पवन पाटील याची दोन दिवस साधी चौकशीही न केल्याने संशय निर्माण झाला आहे़ याबरोबरच साडेतीन वाजेची घटना असताना पोलिसांनी ५़३० वाजता अग्निशमन दलास का माहिती दिली? पोलीस पाठलाग करीत होते, तर हे तिघे ट्रक टर्मिनसकडे असताना महामार्ग ओलांडून इकडे कसे पळाले असे अनेक प्रश्न निर्माण झालेआहेत़