शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

नाशिकच्या विसर्गाने वाढला जायकवाडीचा ‘टक्का’; आठवड्यात ६५ टक्के भरले धरण 

By अझहर शेख | Updated: July 17, 2022 15:19 IST

इगतपुरी, सुरगाणा, पेठ आणि त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यांमधील जोरदार पाऊस पडला.

नाशिक - नाशिक शहरासह जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडीचा धरणसाठा चक्क दुप्पट झाला. जायकवाडी ६५.६१ टक्के भरले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरण अर्थात नाथसागर जलाशयात सध्या १ हजार ४२४.४०८ दशलक्षघनमीटर इतका जलसाठा झाला आहे. शनिवारपर्यंत (दि.१६) ४९ हजार ९०४ क्युसेक इतकी पुरपाण्याची आवक झाली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक पाणी जायकवाडीत पोहचले.

हवामान खात्याकडून नाशिक जिल्ह्याला मागील आठवड्यात ‘रेड ॲलर्ट’ देण्यात आला होता. जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. इगतपुरी, सुरगाणा, पेठ आणि त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यांमधील जोरदार पाऊस पडला. सुरगाण्यात आतापर्यंत १ हजार २७८ मिमी. तर पेठमध्ये १ हजार ५२९ मिमी, त्र्यंबकेश्वरमध्ये ९७६ मिमी आणि इगतपुरीत ७८३ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यामुळे दारणा, गंगापुर, कडवा, आळंदी या धरणांचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात आला. हे सर्व पाणी नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यावरून पुढे थेट जायकवाडीत जात आहेत. अजुनही दारणा, गंगापुर, कडवा या धरणांमधून विसर्ग काही प्रमाणात सुरुच आहे. नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून पुढे रविवारी (दि.१७) २९ हजार ६६७ क्युसेक इतका विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू आहे.

८ जुलैपासून २ हजार १६८ क्युसेकने सुरू झालेली पुरपाण्याची आवक१ लाख ५ हजारापर्यंत जाऊन पोहचली आहे. या आवकमध्ये अजुनही भर पडतच आहे. नाशिकमधून मोठ्या प्रमाणात जायकवाडीत आवक झाली आहे. नांदुरमध्यमेश्वरमधून आतापर्यंत २६ हजार ५८१ दलघफू इतके पाणी गोदापात्रात वाहून गेले आहे. यामुळे धरणसाठ्यात वाढ होत असून मराठवाड्याची पाण्याची चिंता मिटणार आहे. जायकवाडीच्या पाणीसाठ्यात होणारी वाढ नाशिकच्या पर्जन्यमानावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. नाशिकला मुसळधार पाऊस झाल्यास जायकवाडीच्या दिशेने गोदापात्रातून पाण्याचा विसर्ग केला जातो. यामुळे मराठवाड्यातील नागरिकदेखील नाशिकला जोरदार पाऊस पडो, अशीच अपेक्षा बाळगून असतात.

१७ दिवसांत धरणांमधून सोडलेला विसर्ग (क्युसेकमध्ये)

दारणा- ७० हजार ५९२गंगापुर- ४४ हजर ७६२कडवा- २० हजार ३९२आळंदी- ३हजार ८१३नांदुरमध्यमेश्वर- ३ लाख ७ हजार ५३७

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणNashikनाशिकRainपाऊस