शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

नाशिक जिल्ह्यातील जवानाची काश्मीरमध्ये पत्नीसह हत्या गावावर कोसळला दु:खाचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 1:24 AM

हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात नोकरी मिळवून स्थिरस्थावर झालेल्या राजेंद्र केकाणे याच्या मृत्यूच्या बातमीने गावकºयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला.

ठळक मुद्देमजुरीच्या पैशांतून त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण भरतीत राजेंद्रचे नोकरीचे स्वप्न पूर्ण आर्यन व अनुष्का ही दोन मुले

नायगाव : हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात नोकरी मिळवून स्थिरस्थावर झालेल्या राजेंद्र केकाणे याच्या मृत्यूच्या बातमीने गावकºयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला. बातमी कळल्यानंतर सारा गाव अक्षरश: सुन्न झाला.घरची परिस्थती हलाखीची असल्याने राजेंद्रने ठाणगाव येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो शेतात मजुरीचे काम करू लागला. मजुरीच्या पैशांतून त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्याचे मूळगाव सिन्नर तालुक्यातील टेंभुरवाडी असले तरी राजेंद्रचे आयुष्य तालुक्यातील चिंचोली येथे मामांकडेच गेले. आईच्या निधनानंतर घरातील सर्व जबाबदारी राजेंद्रवरच होती. याच वेळी गावातील संदीप सानप या मित्राच्या बरोबरीने नोकरी शोधत असतांना तो मुंबई (चेंबूर ) येथील सीआईएसएफच्या भरतीला गेला. भरतीत राजेंद्रचे नोकरीचे स्वप्न पूर्ण झाले. सन २००८ मध्ये डेहराडून येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर राजेंद्र नोकरीत दाखल झाला. २०११ मध्ये राजेंद्र याचा विवाह संगमनेर तालुक्यातील क-हे - निमोण येथील शोभा हिच्याशी विवाह झाला. त्यांना आर्यन व अनुष्का ही दोन मुले झाली. सर्व काही सरळीत सुरू होते. दहा- बारा दिवसांपूर्वीच राजेंद्र सहकुटूंब गावी येऊन गेला होता. बुधवारी पहाटे राजेंद्र व त्याची पत्नी जखमी झाल्याचे वृत्त गावात येताच संपूर्ण केकाणे कुटुंबाबरोबर चिंचोली गावावर दु:खाचा डोंगरच कोसळला.राजेंद्र याने छोटा भाऊ गणेशचे शिक्षण पूर्ण केले. गणेशलाही मोठ्या भावाप्रमाणे देशसेवेची इच्छा असल्याने त्यानेही सैन्य भरतीसाठी जाण्याचे ठरवले. २०१२च्या सैन्य भरतीत गणेशही सैन्य दलात दाखल झाला. दोघेही कमावते झाल्याने चिंचोली येथेच त्यांनी स्वत:चे घर उभे केले.