शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
6
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
7
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
8
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
9
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
10
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
11
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
12
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
13
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
14
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
15
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
16
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
17
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
18
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
19
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
20
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं

जनता कर्फ्यूने दिंडोरी तालुक्याला तारले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 9:40 PM

दिंडोरी : पंधरा दिवसांपूर्वी तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि जनता हादरली. मात्र, स्थानिक यंत्रणेला विश्वासात घेत प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय आखली. तीन ते सात दिवसांपर्यंत जनता कर्फ्यूचे काटेकोर पालन करत अत्यावश्यक वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. सुमारे १५०० नागरिकांना सेल्फ कॉरण्टाइन करण्यात आले. बाहेरुन येणाऱ्यांवर कडक नजर ठेवली गेली आणि या साºयाचा एकत्रित परिणाम म्हणून नवीन रुग्ण दाखल तर झालाच नाही शिवाय बाधित सर्व नऊ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

दिंडोरी : पंधरा दिवसांपूर्वी तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि जनता हादरली. मात्र, स्थानिक यंत्रणेला विश्वासात घेत प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय आखली. तीन ते सात दिवसांपर्यंत जनता कर्फ्यूचे काटेकोर पालन करत अत्यावश्यक वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. सुमारे १५०० नागरिकांना सेल्फ कॉरण्टाइन करण्यात आले. बाहेरुन येणाऱ्यांवर कडक नजर ठेवली गेली आणि या साºयाचा एकत्रित परिणाम म्हणून नवीन रुग्ण दाखल तर झालाच नाही शिवाय बाधित सर्व नऊ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.तालुक्यात ८ मे रोजी पहिला बाधित आढळला होता. त्यानंतर लागोपाठ नऊ रु ग्ण आढळल्याने चिंता वाढली. यंत्रणेने सहवासातील अति जोखमीच्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवले. रु ग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांनीही जनता कर्फ्यूचे स्वयंस्फूर्तीने पालन केले. आपत्ती व्यवस्थापन समितीसह अधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित केली. बाहेरून आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले. तालुक्यातून भाजीपाला नाशिकसह मुंबईत जात असल्याने धोका वाढला होता. त्यातच तालुक्यातील पोलिसाला मालेगाव कर्तव्य बजावताना संसर्ग झाल्याने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. पंधरा दिवसात बाधितांची संख्या ९ वर जाऊन पोहोचली परंतु, आता नवीन रुग्ण दाखल न होण्याबरोबरच हे सर्व नऊ जण कोरोनामुक्त झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तालुक्यात ८ ते १५ मे या कालावधीत हे नऊ रुग्ण बाधित झाल्याचे आढळून आले होते. मात्र, १५ मे नंतर तालुक्यात एकही नवा बाधित रुग्ण आढळून आलेला नाही.----------------विलगीकरण कक्ष रिकामादिंडोरी येथे कोव्हिड हेल्थ सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. येथे तालुका वैद्यकीय अधीकारी डॉ. सुजय कोशिरे, ग्रामीण रु ग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ विलास पाटील यांच्या पथकाचे निगराणी खाली पाच तर नाशिकला चार रु ग्ण उपचार घेत होते. हे सर्व रु ग्ण ठणठणीत बरे होत त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. आता दिंडोरीत कुणीही विलीगीकरण कक्षात नाही.------------------------प्रशासकीय यंत्रणेतील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी एकमेकात समन्वय ठेवत आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत आहेत. तालुक्यातील जनतेचेही चांगले सहकार्य मिळाले आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटावर मात करत आहोत . यापुढेही तालुक्यात प्रार्दुभाव होऊ नये यासाठी शासकीय यंत्रणा काम करत आहे . जनतेने बाजारपेठ सुरु झाल्या असल्या तरी आवश्यक ती काळजी घेणे व नियम पाळणे आवश्यक आहे- डॉ संदीप आहेर, प्रांताधिकारी दिंडोरी-पेठ

टॅग्स :Nashikनाशिक