शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

जलहक्क समितीद्वारे जनजागर अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 00:26 IST

नादंगाव : तालुक्याचे सिंचन क्षेत्र अवघे ५ टक्के असणे हे शासन-प्रशासन आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने भूषणावह नसून, याबाबत जलहक्क समितीने नाराजी व्यक्त करून राजकीय जाणकारांचे लक्ष वेधले आहे. तालुक्यातील राजकीय आणि एकूणच सर्व क्षेत्रातील उदासीनता दूर हटविणे आवश्यक आहे. त्यासाठी तरुणांनी सजगतेने प्रत्येक गावातून पुढे यावे म्हणून तालुका जलहक्क समितीद्वारे जनजागरण अभियान राबविण्याचा निर्णय गुरुवारी (दि.१७) झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

येथील विश्रामगृह प्रांगणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते निवृत्ती खालकर यांच्या अध्यक्षतेखाली जलहक्क समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा आणि ह्या आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या २० शेतकऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली. आम आदमी पक्षाचे विशाल वडघुले यांनी प्रास्ताविकात जलहक्क समितीच्या कामाचा आढावा घेतला.नार-पार तथा मांजरपाडा-१ (देवसाने) प्रकल्पाचे अभ्यासक अंबादास मोरे यांनी सविस्तर विवेचन व मार्गदर्शन केले. देवीदास देवरे यांनी गावोगावी तरुणांशी सुसंवाद साधून केंद्र उभारण्याची केलेली सूचना सर्वमान्य करण्यात आली. शेतकरी-तरुणांसाठी १ दिवसाचे शिबिराचे आयोजन करणे, प्रकल्पासंदर्भात पुस्तिका प्रसिद्ध करणे आणि जलसंपदामंत्र्याकडे तसेच जिल्हाधिकारी तथा तापी विकास महामंडळापर्यंत नांदगाव तालुक्याचा पाणीप्रश्न मांडण्याबाबत निर्णय घेण्यात आलेत. ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक परदेशी यांनी सूत्रसंचलन केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मच्छींद्र वाघ, सुदाम काळे, जनार्दन पवार, गोरख चव्हाण, मनमाड बचावाचे योगेश बोदडे, राजेश खालकर, अप्पा झाल्टे,अमोल शेलार,राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय चव्हाण, दिगंबर कवडे व इतर कार्यकर्त्यांनी चर्चेत सहभाग दिला.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी