शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

देशाला हिंदू राष्ट्र करणे सोपे नाही: रावसाहेब कसबे

By संजय दुनबळे | Published: July 13, 2023 6:55 PM

मणिपूरमधील धगीचा अर्थ काय ? विषयावर चर्चासत्र

नाशिक : आगामी काळात भारत हे हिंदू राष्ट्र करण्यासाठी जे जे करायला हवे ते करण्याचा प्रयत्न केला जात आहे; पण या देशात हिंदू राष्ट्र निर्माण करणे अवघड आहे हे मणिपूरच्या घटनेने दाखवून दिले आहे. या देशात अपल्पसंख्याकांचे अनेक प्रश्न आहेत. याशिवाय हिंदूंमधीलच काही जातींचा हिंदू राष्ट्राला विरोध असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले.

विचार जागर फाउंडेशनच्या वतीने येथील मु. श. औरंगाबादकर सभागृहात आयोजित मणिपूरच्या धगीचा अर्थ काय या विषयावरील चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, सुरेश भटेवरा, निरंजन टकले, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कसबे म्हणाले, मणिपूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. यामुळे निर्माण झालेला प्रश्न आपल्याला काय धडा देणर आहे हे महत्त्वाचे आहे.

या घटनेमागे अनेक कंगोरे आहेत. हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी जे जे करावे लागणार आहे, ते तेथे केले जात असून, येणाऱ्या निवडणुकीत देशातील जनतेने सत्ता बदल करायला हवा, असे त्यांनी सांगितले. उत्तम कांबळे म्हणाले, आपण सर्व भारताचे नागरिक आहोत. कोणत्याही जातीचे अथवा धर्माचे नाहीत. निवडणुका जसजशा जवळ येतील, तसतशी धग वाढत जाईल. केवळ राखीव जागा हे मणिपूर हिंसाचाराचे एक कारण दिसत असले तरी अन्य भूमिकाही त्यामागे आहेत. जेव्हा व्यवस्थेकडून सामान्य माणसांचे प्रश्न सोडविले जात नाहीत, तेव्हा राखीव जागांचे गाजर पुढे केले जात असल्याचेही ते म्हणाले.

निरंजन टकले आणि सुरेश भटेवरा यांनी आपल्या भाषणात मणिपूरचा भूप्रदेश, तेथील विविध जाती आणि त्यांचे प्रश्न याविषयीचे विवेचन केले. यावेळी मणिपूरमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुभव कथन करतानाच तेथील हिंसाचाराची धग उपस्थितांसमोर मांडली. कार्यक्रमास शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.