शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

राणा दाम्पत्याच्या अट्टाहासापोटीच व्हायला नको ते झाले : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2022 01:51 IST

‘एखाद्या ठिकाणी वातावरण तंग असेल तर पोलीस सत्ताधारी किंवा विरोधकांना तिथे जाण्यापासून रोखतात. त्यामुळे बहुतांशवेळा नेतेदेखील त्या सल्ल्याच्या अनुषंगाने निर्णय घेतात. मात्र, अमरावतीच्या आमदार-खासदारांनाही पोलिसांनी त्याप्रमाणे सांगितले होते. तरीदेखील त्यांनी अट्टाहास कायम ठेवल्याने खारला राणा दाम्पत्याच्या फ्लॅटभोवती शिवसैनिक जमले. अट्टाहासापोटी व्हायला नको ते झाले असून, आता पोलीस आणि न्याययंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करतील,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्देकुणालाही भडकावणे, उचकवण्याचा प्रयत्न नको

नाशिक : ‘एखाद्या ठिकाणी वातावरण तंग असेल तर पोलीस सत्ताधारी किंवा विरोधकांना तिथे जाण्यापासून रोखतात. त्यामुळे बहुतांशवेळा नेतेदेखील त्या सल्ल्याच्या अनुषंगाने निर्णय घेतात. मात्र, अमरावतीच्या आमदार-खासदारांनाही पोलिसांनी त्याप्रमाणे सांगितले होते. तरीदेखील त्यांनी अट्टाहास कायम ठेवल्याने खारला राणा दाम्पत्याच्या फ्लॅटभोवती शिवसैनिक जमले. अट्टाहासापोटी व्हायला नको ते झाले असून, आता पोलीस आणि न्याययंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करतील,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाच्या उद्घाटनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना पवार यांनी अमरावतीचे आमदार खासदार यांनी हनुमान चालीसा म्हणण्याचा निर्णय घेतला. लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिला असला तरी त्यातून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये, हेदेखील पाहणे आवश्यक असते. प्रत्येकाची श्रद्धा असली तरी त्यासाठी मंदिर आहेत, अन्यथा आपल्या घरात म्हणण्यात कोणाचीच हरकत नाही. मात्र, एका पक्षाच्या नेत्याच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा पठण करायची म्हटल्यावर कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या. त्यातून शिवसैनिक तिथे जमले. कोणतेही काम कायद्याच्या नियमाच्या चौकटीत राहून करावे, असेही त्यांनी नमूद केले. मातोश्रीबाबत शिवसैनिकांच्या भावना तीव्र आहेत. तीच भावना प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची ज्येष्ठ नेत्यांबाबत असते. कंबोज प्रकरणातही कुणी म्हणतं अंगावर गाडी घातली, कुणी म्हणतं दगड फेकले. पोलीस या प्रकरणातही व्यवस्थित काम करतील. कुणाची चूक, कुणाची जबाबदारी या सर्व बाबी सीसीटीव्हीत तपासल्या जातील. कोणत्याही पक्षाला राज्यकारभार करत असताना सगळीकडे शांतता नांदायला हवी असते. मात्र, विरोधकांना वाटतं की, पोलीस फक्त सत्ताधाऱ्याचं ऐकतात, असा समज आहे. आम्ही विरोधात हवं तेव्हाही असं वाटायचं. केंद्र असो वा राज्य सुरक्षा, कोणावरही हल्ला नकोच. कुणालाही उचकविण्याचा प्रयत्न व्हायलाच नको. प्रत्येकाने तारतम्य बाळगावे, तसेच कोणत्याही प्रकारच्या राजकीय हस्तक्षेपाला पोलिसांनी बळी पडू नये, असेही पवार यांनी नमूद केले. यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री छगन भुजबळ आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारण