शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राणा दाम्पत्याच्या अट्टाहासापोटीच व्हायला नको ते झाले : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2022 01:51 IST

‘एखाद्या ठिकाणी वातावरण तंग असेल तर पोलीस सत्ताधारी किंवा विरोधकांना तिथे जाण्यापासून रोखतात. त्यामुळे बहुतांशवेळा नेतेदेखील त्या सल्ल्याच्या अनुषंगाने निर्णय घेतात. मात्र, अमरावतीच्या आमदार-खासदारांनाही पोलिसांनी त्याप्रमाणे सांगितले होते. तरीदेखील त्यांनी अट्टाहास कायम ठेवल्याने खारला राणा दाम्पत्याच्या फ्लॅटभोवती शिवसैनिक जमले. अट्टाहासापोटी व्हायला नको ते झाले असून, आता पोलीस आणि न्याययंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करतील,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्देकुणालाही भडकावणे, उचकवण्याचा प्रयत्न नको

नाशिक : ‘एखाद्या ठिकाणी वातावरण तंग असेल तर पोलीस सत्ताधारी किंवा विरोधकांना तिथे जाण्यापासून रोखतात. त्यामुळे बहुतांशवेळा नेतेदेखील त्या सल्ल्याच्या अनुषंगाने निर्णय घेतात. मात्र, अमरावतीच्या आमदार-खासदारांनाही पोलिसांनी त्याप्रमाणे सांगितले होते. तरीदेखील त्यांनी अट्टाहास कायम ठेवल्याने खारला राणा दाम्पत्याच्या फ्लॅटभोवती शिवसैनिक जमले. अट्टाहासापोटी व्हायला नको ते झाले असून, आता पोलीस आणि न्याययंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करतील,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाच्या उद्घाटनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना पवार यांनी अमरावतीचे आमदार खासदार यांनी हनुमान चालीसा म्हणण्याचा निर्णय घेतला. लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिला असला तरी त्यातून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये, हेदेखील पाहणे आवश्यक असते. प्रत्येकाची श्रद्धा असली तरी त्यासाठी मंदिर आहेत, अन्यथा आपल्या घरात म्हणण्यात कोणाचीच हरकत नाही. मात्र, एका पक्षाच्या नेत्याच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा पठण करायची म्हटल्यावर कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या. त्यातून शिवसैनिक तिथे जमले. कोणतेही काम कायद्याच्या नियमाच्या चौकटीत राहून करावे, असेही त्यांनी नमूद केले. मातोश्रीबाबत शिवसैनिकांच्या भावना तीव्र आहेत. तीच भावना प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची ज्येष्ठ नेत्यांबाबत असते. कंबोज प्रकरणातही कुणी म्हणतं अंगावर गाडी घातली, कुणी म्हणतं दगड फेकले. पोलीस या प्रकरणातही व्यवस्थित काम करतील. कुणाची चूक, कुणाची जबाबदारी या सर्व बाबी सीसीटीव्हीत तपासल्या जातील. कोणत्याही पक्षाला राज्यकारभार करत असताना सगळीकडे शांतता नांदायला हवी असते. मात्र, विरोधकांना वाटतं की, पोलीस फक्त सत्ताधाऱ्याचं ऐकतात, असा समज आहे. आम्ही विरोधात हवं तेव्हाही असं वाटायचं. केंद्र असो वा राज्य सुरक्षा, कोणावरही हल्ला नकोच. कुणालाही उचकविण्याचा प्रयत्न व्हायलाच नको. प्रत्येकाने तारतम्य बाळगावे, तसेच कोणत्याही प्रकारच्या राजकीय हस्तक्षेपाला पोलिसांनी बळी पडू नये, असेही पवार यांनी नमूद केले. यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री छगन भुजबळ आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारण