शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

पाणी पळवापळवीचा मुद्दा ‘भाजपा’ला सतावणार

By admin | Updated: January 26, 2017 00:21 IST

सेना-मनसे आक्रमक : भाजपाला घेरण्याची विरोधकांची रणनीती

नाशिक : सन २०१५ - १६ मध्ये शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अत्यल्प पाणीसाठ्यामुळे नाशिककर पाणीकपातीच्या संकटाचा सामना करत असताना राज्य शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत जायकवाडीला पाणी सोडण्याचा झालेला निर्णय आणि त्याबाबत स्थानिक भाजपा आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी बाळगलेले मौन याचे भांडवल आता विरोधकांकडून महापालिका निवडणुकीत केले जाणार असून, प्रामुख्याने, सेना आणि मनसे या पक्षांनी त्याबाबत आक्रमक पवित्रा घेत रणनीती आखली आहे. सन २०१५ मध्ये पावसाने पाठ फिरविल्याने धरणे अर्धवटच भरली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर पाणीटंचाईचे संकट ओढवले. त्यावेळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ७० टक्के पाणीसाठा होता. भविष्यात पाण्याची लागणारी गरज ओळखून महापालिकेने ९ आॅक्टोबर २०१५ पासूनच शहरात पाणीकपात करत एकवेळ पाणीपुरवठा सुरू केला. त्यानंतर, जलसंपत्ती नियामक प्राधिकरणच्या निर्देशानुसार, गंगापूर धरणातून मराठवाड्यातील जायकवाडीला  पाणी सोडण्याचा मुद्दा पुढे  आल्यानंतर नाशिककरांनी त्यास तीव्र विरोध दर्शविला. जायकवाडीत पुरेसा पाणीसाठा असताना गंगापूररचे पाणी सोडण्यात येऊ नये, अशीच भूमिका त्यावेळी राजकीय पक्षांनी घेतली. परंतु, राज्य शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत विरोध झुगारून रातोरात जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याचे तीव्र पडसाद उमटले.  प्रामुख्याने, शिवसेना, मनसे, कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि माकपा या प्रमुख विरोधी पक्षांनी राज्यातील भाजपा सरकारचा तीव्र निषेध करत पाणी पळवापळवीला विरोध दर्शविला. राजकीय पक्षांसह नागरिक रस्त्यावर उतरले. परंतु, त्याचा काहीही उपयोग झाला नाही आणि न्यायाधिकरणाचे निर्देश म्हणून भाजपाने त्याचे समर्थन करत गंगापूर धरणातून पाणी सोडलेच. त्यावेळी भाजपाच्या स्थानिक आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी चुप्पी साधली. त्यामुळे भाजपा विरोधात एकच रान पेटले. त्यातूनच, भाजपा आमदारांच्या घरांसमोर सर्वपक्षीय घंटानाद आंदोलने झाली. मोर्चे-निदर्शने झालीत. शिवसेनेने तर मोठा मोर्चा काढत भाजपाला आरोपीच्या पिंजऱ्यात ओढले. या पाणी पळवापळवीमुळे नाशिककरांना ३१ जुलै २०१६ अखेरपर्यंत धरणातील पाणी पुरून-पुरून वापरावे लागले. एकवेळ पाणीकपातीबरोबरच आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंदच्या संकटालाही सामोरे जावे लागले. पुढे २ आॅगस्ट २०१६ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे गंगापूर धरण भरले असले तरी हा पाणी पळवापळवीचा मुद्दा महापालिका निवडणुकीत उचलण्याची तयारी विरोधकांनी आधीपासूनच केलेली आहे. त्यामुळे, आता मनपा निवडणुकीच्या प्रचारात पाणी पळवापळवीचा मुद्दा भाजपाला सतावणार असून, त्या दृष्टीने विरोधकांनी रणनीतीही आखली आहे. प्रामुख्याने सेना-मनसेकडून त्याबाबत आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)