शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पळवापळवीचा मुद्दा ‘भाजपा’ला सतावणार

By admin | Updated: January 26, 2017 00:21 IST

सेना-मनसे आक्रमक : भाजपाला घेरण्याची विरोधकांची रणनीती

नाशिक : सन २०१५ - १६ मध्ये शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अत्यल्प पाणीसाठ्यामुळे नाशिककर पाणीकपातीच्या संकटाचा सामना करत असताना राज्य शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत जायकवाडीला पाणी सोडण्याचा झालेला निर्णय आणि त्याबाबत स्थानिक भाजपा आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी बाळगलेले मौन याचे भांडवल आता विरोधकांकडून महापालिका निवडणुकीत केले जाणार असून, प्रामुख्याने, सेना आणि मनसे या पक्षांनी त्याबाबत आक्रमक पवित्रा घेत रणनीती आखली आहे. सन २०१५ मध्ये पावसाने पाठ फिरविल्याने धरणे अर्धवटच भरली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर पाणीटंचाईचे संकट ओढवले. त्यावेळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ७० टक्के पाणीसाठा होता. भविष्यात पाण्याची लागणारी गरज ओळखून महापालिकेने ९ आॅक्टोबर २०१५ पासूनच शहरात पाणीकपात करत एकवेळ पाणीपुरवठा सुरू केला. त्यानंतर, जलसंपत्ती नियामक प्राधिकरणच्या निर्देशानुसार, गंगापूर धरणातून मराठवाड्यातील जायकवाडीला  पाणी सोडण्याचा मुद्दा पुढे  आल्यानंतर नाशिककरांनी त्यास तीव्र विरोध दर्शविला. जायकवाडीत पुरेसा पाणीसाठा असताना गंगापूररचे पाणी सोडण्यात येऊ नये, अशीच भूमिका त्यावेळी राजकीय पक्षांनी घेतली. परंतु, राज्य शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत विरोध झुगारून रातोरात जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याचे तीव्र पडसाद उमटले.  प्रामुख्याने, शिवसेना, मनसे, कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि माकपा या प्रमुख विरोधी पक्षांनी राज्यातील भाजपा सरकारचा तीव्र निषेध करत पाणी पळवापळवीला विरोध दर्शविला. राजकीय पक्षांसह नागरिक रस्त्यावर उतरले. परंतु, त्याचा काहीही उपयोग झाला नाही आणि न्यायाधिकरणाचे निर्देश म्हणून भाजपाने त्याचे समर्थन करत गंगापूर धरणातून पाणी सोडलेच. त्यावेळी भाजपाच्या स्थानिक आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी चुप्पी साधली. त्यामुळे भाजपा विरोधात एकच रान पेटले. त्यातूनच, भाजपा आमदारांच्या घरांसमोर सर्वपक्षीय घंटानाद आंदोलने झाली. मोर्चे-निदर्शने झालीत. शिवसेनेने तर मोठा मोर्चा काढत भाजपाला आरोपीच्या पिंजऱ्यात ओढले. या पाणी पळवापळवीमुळे नाशिककरांना ३१ जुलै २०१६ अखेरपर्यंत धरणातील पाणी पुरून-पुरून वापरावे लागले. एकवेळ पाणीकपातीबरोबरच आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंदच्या संकटालाही सामोरे जावे लागले. पुढे २ आॅगस्ट २०१६ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे गंगापूर धरण भरले असले तरी हा पाणी पळवापळवीचा मुद्दा महापालिका निवडणुकीत उचलण्याची तयारी विरोधकांनी आधीपासूनच केलेली आहे. त्यामुळे, आता मनपा निवडणुकीच्या प्रचारात पाणी पळवापळवीचा मुद्दा भाजपाला सतावणार असून, त्या दृष्टीने विरोधकांनी रणनीतीही आखली आहे. प्रामुख्याने सेना-मनसेकडून त्याबाबत आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)