शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
4
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
5
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
6
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
7
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
8
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
9
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
10
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
11
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
12
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
13
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
14
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
15
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
16
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
17
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
18
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
19
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
20
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले

पाणी पळवापळवीचा मुद्दा ‘भाजपा’ला सतावणार

By admin | Updated: January 26, 2017 00:21 IST

सेना-मनसे आक्रमक : भाजपाला घेरण्याची विरोधकांची रणनीती

नाशिक : सन २०१५ - १६ मध्ये शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अत्यल्प पाणीसाठ्यामुळे नाशिककर पाणीकपातीच्या संकटाचा सामना करत असताना राज्य शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत जायकवाडीला पाणी सोडण्याचा झालेला निर्णय आणि त्याबाबत स्थानिक भाजपा आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी बाळगलेले मौन याचे भांडवल आता विरोधकांकडून महापालिका निवडणुकीत केले जाणार असून, प्रामुख्याने, सेना आणि मनसे या पक्षांनी त्याबाबत आक्रमक पवित्रा घेत रणनीती आखली आहे. सन २०१५ मध्ये पावसाने पाठ फिरविल्याने धरणे अर्धवटच भरली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर पाणीटंचाईचे संकट ओढवले. त्यावेळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ७० टक्के पाणीसाठा होता. भविष्यात पाण्याची लागणारी गरज ओळखून महापालिकेने ९ आॅक्टोबर २०१५ पासूनच शहरात पाणीकपात करत एकवेळ पाणीपुरवठा सुरू केला. त्यानंतर, जलसंपत्ती नियामक प्राधिकरणच्या निर्देशानुसार, गंगापूर धरणातून मराठवाड्यातील जायकवाडीला  पाणी सोडण्याचा मुद्दा पुढे  आल्यानंतर नाशिककरांनी त्यास तीव्र विरोध दर्शविला. जायकवाडीत पुरेसा पाणीसाठा असताना गंगापूररचे पाणी सोडण्यात येऊ नये, अशीच भूमिका त्यावेळी राजकीय पक्षांनी घेतली. परंतु, राज्य शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत विरोध झुगारून रातोरात जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याचे तीव्र पडसाद उमटले.  प्रामुख्याने, शिवसेना, मनसे, कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि माकपा या प्रमुख विरोधी पक्षांनी राज्यातील भाजपा सरकारचा तीव्र निषेध करत पाणी पळवापळवीला विरोध दर्शविला. राजकीय पक्षांसह नागरिक रस्त्यावर उतरले. परंतु, त्याचा काहीही उपयोग झाला नाही आणि न्यायाधिकरणाचे निर्देश म्हणून भाजपाने त्याचे समर्थन करत गंगापूर धरणातून पाणी सोडलेच. त्यावेळी भाजपाच्या स्थानिक आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी चुप्पी साधली. त्यामुळे भाजपा विरोधात एकच रान पेटले. त्यातूनच, भाजपा आमदारांच्या घरांसमोर सर्वपक्षीय घंटानाद आंदोलने झाली. मोर्चे-निदर्शने झालीत. शिवसेनेने तर मोठा मोर्चा काढत भाजपाला आरोपीच्या पिंजऱ्यात ओढले. या पाणी पळवापळवीमुळे नाशिककरांना ३१ जुलै २०१६ अखेरपर्यंत धरणातील पाणी पुरून-पुरून वापरावे लागले. एकवेळ पाणीकपातीबरोबरच आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंदच्या संकटालाही सामोरे जावे लागले. पुढे २ आॅगस्ट २०१६ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे गंगापूर धरण भरले असले तरी हा पाणी पळवापळवीचा मुद्दा महापालिका निवडणुकीत उचलण्याची तयारी विरोधकांनी आधीपासूनच केलेली आहे. त्यामुळे, आता मनपा निवडणुकीच्या प्रचारात पाणी पळवापळवीचा मुद्दा भाजपाला सतावणार असून, त्या दृष्टीने विरोधकांनी रणनीतीही आखली आहे. प्रामुख्याने सेना-मनसेकडून त्याबाबत आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)