शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पळवापळवीचा मुद्दा ‘भाजपा’ला सतावणार

By admin | Updated: January 26, 2017 00:21 IST

सेना-मनसे आक्रमक : भाजपाला घेरण्याची विरोधकांची रणनीती

नाशिक : सन २०१५ - १६ मध्ये शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अत्यल्प पाणीसाठ्यामुळे नाशिककर पाणीकपातीच्या संकटाचा सामना करत असताना राज्य शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत जायकवाडीला पाणी सोडण्याचा झालेला निर्णय आणि त्याबाबत स्थानिक भाजपा आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी बाळगलेले मौन याचे भांडवल आता विरोधकांकडून महापालिका निवडणुकीत केले जाणार असून, प्रामुख्याने, सेना आणि मनसे या पक्षांनी त्याबाबत आक्रमक पवित्रा घेत रणनीती आखली आहे. सन २०१५ मध्ये पावसाने पाठ फिरविल्याने धरणे अर्धवटच भरली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर पाणीटंचाईचे संकट ओढवले. त्यावेळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ७० टक्के पाणीसाठा होता. भविष्यात पाण्याची लागणारी गरज ओळखून महापालिकेने ९ आॅक्टोबर २०१५ पासूनच शहरात पाणीकपात करत एकवेळ पाणीपुरवठा सुरू केला. त्यानंतर, जलसंपत्ती नियामक प्राधिकरणच्या निर्देशानुसार, गंगापूर धरणातून मराठवाड्यातील जायकवाडीला  पाणी सोडण्याचा मुद्दा पुढे  आल्यानंतर नाशिककरांनी त्यास तीव्र विरोध दर्शविला. जायकवाडीत पुरेसा पाणीसाठा असताना गंगापूररचे पाणी सोडण्यात येऊ नये, अशीच भूमिका त्यावेळी राजकीय पक्षांनी घेतली. परंतु, राज्य शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत विरोध झुगारून रातोरात जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याचे तीव्र पडसाद उमटले.  प्रामुख्याने, शिवसेना, मनसे, कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि माकपा या प्रमुख विरोधी पक्षांनी राज्यातील भाजपा सरकारचा तीव्र निषेध करत पाणी पळवापळवीला विरोध दर्शविला. राजकीय पक्षांसह नागरिक रस्त्यावर उतरले. परंतु, त्याचा काहीही उपयोग झाला नाही आणि न्यायाधिकरणाचे निर्देश म्हणून भाजपाने त्याचे समर्थन करत गंगापूर धरणातून पाणी सोडलेच. त्यावेळी भाजपाच्या स्थानिक आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी चुप्पी साधली. त्यामुळे भाजपा विरोधात एकच रान पेटले. त्यातूनच, भाजपा आमदारांच्या घरांसमोर सर्वपक्षीय घंटानाद आंदोलने झाली. मोर्चे-निदर्शने झालीत. शिवसेनेने तर मोठा मोर्चा काढत भाजपाला आरोपीच्या पिंजऱ्यात ओढले. या पाणी पळवापळवीमुळे नाशिककरांना ३१ जुलै २०१६ अखेरपर्यंत धरणातील पाणी पुरून-पुरून वापरावे लागले. एकवेळ पाणीकपातीबरोबरच आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंदच्या संकटालाही सामोरे जावे लागले. पुढे २ आॅगस्ट २०१६ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे गंगापूर धरण भरले असले तरी हा पाणी पळवापळवीचा मुद्दा महापालिका निवडणुकीत उचलण्याची तयारी विरोधकांनी आधीपासूनच केलेली आहे. त्यामुळे, आता मनपा निवडणुकीच्या प्रचारात पाणी पळवापळवीचा मुद्दा भाजपाला सतावणार असून, त्या दृष्टीने विरोधकांनी रणनीतीही आखली आहे. प्रामुख्याने सेना-मनसेकडून त्याबाबत आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)