शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
3
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
4
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
5
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
6
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
7
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
8
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
9
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
10
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
11
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
12
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
13
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
14
इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 
15
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
16
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
17
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
18
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
19
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
20
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक टर्मिनसपासून शहरात होतो घुसखोरांचा प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 22:48 IST

नाशिक : मालेगावमधील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे तेथील नागरिकांनी पलायन करीत नाशिकमध्ये येण्यास सुरुवात केली आहे. चोरट्या मार्गाने महामार्गावर येत ट्रकच्या माध्यमातून दररोज असंख्य मालेगावकर नाशिक शहराच्या सीमारेषेवरील ट्रक टर्मिनसपर्यंत प्रवास करीत आहेत. ट्रक टर्मिनस येथून शहरात येईपर्यंत त्यांना कोणताही अटकाव होत नसल्याने प्रशासकीय तसेच पोलीस यंत्रणेच्या मर्यादाही उघड होत आहे.

ठळक मुद्देआडगावकडून येण्याºया मार्गावर कुठेही चेकपोस्ट नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मालेगावमधील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे तेथील नागरिकांनी पलायन करीत नाशिकमध्ये येण्यास सुरुवात केली आहे. चोरट्या मार्गाने महामार्गावर येत ट्रकच्या माध्यमातून दररोज असंख्य मालेगावकर नाशिक शहराच्या सीमारेषेवरील ट्रक टर्मिनसपर्यंत प्रवास करीत आहेत. ट्रक टर्मिनस येथून शहरात येईपर्यंत त्यांना कोणताही अटकाव होत नसल्याने प्रशासकीय तसेच पोलीस यंत्रणेच्या मर्यादाही उघड होत आहे.कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असले तरी घुसखोर रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. मात्र परप्रांतीयांचे परतीसाठी रस्त्याने दिसणारे लोंढे, जिल्हाधिकारी कार्यालयात जमलेले हजारो परप्रांतीय आणि रस्त्याने उगाचच दुचाकीवर हिंडणाऱ्या टवाळांना आवर घालण्यासाठीचे व्यापक प्रयत्न होताना दिसत नाही. कोरोनाचे संकट अधिक गडद झालेले असतानाही बाजारातील गर्दी तसेच झोपडपट्टी परिसरात होत असलेले डिस्टन्स नियमांचा फज्जा याबाबतही प्रशासनाकडून फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे दिसते. याच यंत्रणेच्या मर्यादा पुन्हा उघड झाल्या असून, मालेगावातून नाशिकमध्ये येणाऱ्यांना अटकाव घालण्याचा कोणताही ‘प्लॅन’ करण्यात आलेले नसल्याचे गेल्या काही दिवसांवरून दिसून आले आहे.मालेगावात शहरात येण्यासाठी अनेक मालेगावकर चाळीसगावफाटा, मनमाड चौफुली तसेच चांदवडमार्गे नाशिक गाठत आहेत. काही लोक मालेगाव-मनमाड आणि चांदवडमार्गे नाशिकला दाखल होत आहेत, तर याच मार्गाने पुढे पिंपळगाव बसवंत मार्गाने नाशिकपर्यंतचा प्रवास केला जात आहे. महामार्गावरून जाणाºया ट्रकचालकांना भरपूर पैसे दिले जात आहे. शहरात जाणे जोखमीचे असल्याने चालकही ट्रक टर्मिनसपर्यंतच सोडण्याचे सांगून प्रवासी नाशिकमध्ये आणत आहेत.दुर्लक्ष की निष्काळजीपणा?वास्तविक पोलीस प्रशासनाने ट्रक टर्मिनस येथे वाहनांची तपासणी करण्याबरोबरच चालकाचीदेखील स्क्रिनिंग करणे अपेक्षित आहे. परंतु तपासणीची कोणतीही प्रक्रिया सक्षमपणे राबविली जात नसल्याचे दिसून येते. टर्मिनसपर्यंत आलेले घुसखोर दिवसा आणि रात्रीही रस्त्याने प्रवास करीत असताना त्यांना कुठेही अडविले जात नसल्याने सध्या नाशिकमध्ये प्रवास करणे अनेकांना सुलभ होऊन बसले आहे. इतके दिवस सर्वसामान्य माणसांवर दंडुका उगारणारे आणि प्रसंगी शिक्षाही ठोठावणाºया पोलिसांच्या नजरा मात्र या घुसखोरांवर खरेच पडत नसेल का? असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सPoliceपोलिस