शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

पीककर्जावरील व्याज अनुदान पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:11 IST

मालेगाव : शेतकऱ्यांना जिल्हा बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांकडून पीककर्ज दिले जाते. वेळेवर व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून व्याजासकट मुद्दल आकारली ...

मालेगाव : शेतकऱ्यांना जिल्हा बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांकडून पीककर्ज दिले जाते. वेळेवर व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून व्याजासकट मुद्दल आकारली जाते. शेतकऱ्यांचे व्याजाचे परतावा अनुदान सन २०१६ पासून प्रलंबित आहे. वेळेवर कर्जफेड करूनही शेतकऱ्यांना व्याज अनुदान मिळाले नाही. शेतकऱ्यांचे व्याजाचे थकीत अनुदान बँकांकडे पडून आहे. ते तातडीने शेतकऱ्यांना देण्यात यावे, तसेच कोरोनाकाळात पीककर्ज भरण्यास दिलेल्या मुदतवाढीच्या कालावधीचे व्याज आकारू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जयंत पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनांद्वारे केली आहे.

शासन पूर्वी शेतकऱ्यांना पीककर्जावर तीन टक्के व्याजाचा परतावा देत होते. वेळेवर व नियमित व्याज भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून व्याजाची पूर्ण रक्कम मुद्दलासह बँकांनी भरून घेतली. शेतकऱ्यांनी जवळपास सात टक्के व्याजदराने मुद्दल रक्कम भरली. व्याजाच्या परताव्याचे तीन टक्के अनुदान अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाही. चार ते पाच वर्षांपासून व्याज अनुदान प्रलंबित आहे. शासनाकडून पैसे आले नाहीत, असे ढोबळ उत्तर बँकांचे अधिकारी देत आहेत. सदर व्याज अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने देण्यात यावी.

शासनाने तीन लाखांपर्यंतच्या पीककर्जावर शून्य टक्के व्याजदर आकारला आहे. तीन लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना मुदतीत परतफेड केली, तरीदेखील व्याजासह पूर्ण रक्कम भरावी लागते. व्याजाचा परतावा लगेच दिला जात नाही. यासाठी तीन ते चार वर्षे बँकेत चकरा माराव्या लागतात. शासनाने बँकांना निर्देश देऊन तीन लाखांपर्यंतच्या कर्जावरील व्याजाची आकारणी करू नये. वेळेत पैसे भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून केवळ पीककर्जाची मुद्दल रक्कमच भरून द्यावी, अशी मागणीही डॉ. पवार यांनी केली आहे.

--------------------------------

शेतमालाला भाव नसल्याने हाल

कोरोनाकाळात शासनाने शेतकऱ्यांना पीककर्ज भरण्यास मुदतवाढ दिली होती. मुदतवाढ दिलेल्या कालावधीचे बँकांकडून व्याज आकारण्यात आले आहे. कोरोनाकाळात भाजीपाला, फळे व इतर सर्व शेतीमालाला कवडीमाेल भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चदेखील मिळाला नाही. शासनाने यासंदर्भात तातडीने पावले उचलून मुदतवाढ दिलेल्या कालावधीतील कर्जावरील व्याज आकारू नये, असे आदेश बँकांना देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी डॉ. पवार यांनी निवेदनात केली आहे.