शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
6
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
7
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
8
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
9
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
10
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
11
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
12
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
13
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
14
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
15
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
16
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
17
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
18
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
19
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
20
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं

विमा कंपन्यांना ‘आयुष्यमान’ करण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 12:42 AM

नाशिक : सरकारने पुरेसे वैद्यकीय व्यावसायिक उपलब्ध करून देण्यासाठी सरकारी रुग्णालये अद्ययावत करून तेथे वैद्यकीय महाविद्यालये सुरू करणे अपेक्षित आहे, मात्र सरकार त्याऐवजी विमा कंपन्यांना ‘आयुष्यमान’ करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्टÑीय अध्यक्ष डॉ. रवि वानखेडकर यांनी केली.

ठळक मुद्देरवि वानखेडकर : सरकारच्या वैद्यकीय धोरणार टीका

नाशिक : सरकारने पुरेसे वैद्यकीय व्यावसायिक उपलब्ध करून देण्यासाठी सरकारी रुग्णालये अद्ययावत करून तेथे वैद्यकीय महाविद्यालये सुरू करणे अपेक्षित आहे, मात्र सरकार त्याऐवजी विमा कंपन्यांना ‘आयुष्यमान’ करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्टÑीय अध्यक्ष डॉ. रवि वानखेडकर यांनी केली.आयएमएच्या कृतज्ञता सोहळ्यानिमित्त शालिमार येथील आयएमए कार्यालयात वानखेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी डॉ. संजय ओक, आयएम शहराध्यक्ष डॉ. आवेश पलोड, डॉ. नितीन चिताळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ‘आयुष्यमान भारत’ या योजनेतून मिळणारी रक्कम उपचार व जोखमीच्या खर्चाचा विचार करता अत्यंत तुटपुंजी आहे. त्यामुळे डॉक्टर-रुग्ण यांच्या नातेसंबंधात तणाव निर्माण होण्याचा धोका संभवतो असे वानखेडकर म्हणाले. सरकारने डॉक्टरांपेक्षा नागरिकांचे आरोग्यहित लक्षात घेऊन वैद्यकीय आयोग विधेयक नामंजूर करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. प्रगत राष्टÑांच्या तुलनेत भारताचे आरोग्यविषयक अंदापत्रकातील तरतूद नगण्य स्वरूपाची असून, हे चिंताजनक आहे. सरकारने सरकारी आरोग्यव्यवस्था अधिकाधिक बळकट करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.टीबीमुक्त भारताचा निर्धारभारत अजूनही ‘क्षयरोगा’ची राजधानी आहे. आपल्या देशात दरवर्षी दोन लाख ७० हजार लोक टीबीने (क्षयरोग) मृत्युमुखी पडतात. देशाचे आरोग्य राजकीय अजेंड्यावर येणे हे स्वागतार्ह आहे; मात्र सरकारने आपली जबाबदारी खासगी क्षेत्रावर ढकलणे योग्य नाही. देशात दरवर्षी २ लाख ७० हजार नागरिकांचा टीबीने मृत्यू होतो, हे अत्यंत धक्कादायक आहे. युनायटेड नेशनकडून याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. जागतिकस्तरावर ‘टीबी हटाव’अभियान युनायटेड नेशनने हाती घेतले आहे. याअंतर्गत २०२५ पर्यंत भारत ‘टीबी’मुक्त करण्याचा निर्धार आयएमएने सरकारसोबत केल्याचे त्यांनी अधोरेखित केले.निवडणुकांमध्ये ‘आरोग्य अजेंडा’मध्य प्रदेश, रांजस्थान, छत्तीसगढ या राज्यांमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये कर्नाटकप्रमाणे ‘आरोग्य अजेंडा’ ठेवण्यात येणार आहे. जो पक्ष हा अजेंडा मान्य करण्याची हमी देईल, त्याला पाठिंबा आयएमए देणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रयोग कर्नाटक निवडणुकीत यशस्वी ठरल्याचा दावा त्यांनी केला. आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्येही आरोग्य अजेंडा मांडला जाईल, असे वानखेडकर म्हणाले.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाMONEYपैसा