शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
2
कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
3
'नवीन भाडे करार २०२५' : अ‍ॅडव्हान्स म्हणून घेता येईल फक्त २ महिन्यांचे भाडे; घरमालक वाढवू शकणार नाही मनमानी पद्धतीनं भाडं
4
दिल्ली स्फोट प्रकरणी मोठा खुलासा! 'घरघंटी'च्या मदतीने बनवले होते बॉम्ब; साहित्य जप्त केले
5
IND vs SA 2nd Test: 'आमचं ठरलंय!' गिलच्या जागी कोण? कॅप्टन पंतनं उत्तर दिलं, पण...
6
ट्रम्प ज्युनियर यांचा भारतात शाही मुक्काम! एका रात्रीच्या भाड्यात येईल SUV कार; ताजमहलचा दिसतो व्ह्यू
7
Gold Price Today: ₹३००० नं स्वस्त झालं सोनं, चांदी ₹८००० नं आपटली; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट रेट
8
Railway: रेल्वेगाड्यांत 'या' रुग्णांना मिळते 'इतकी' सवलत!
9
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण; अमित ठाकरे म्हणाले, “अखेर सरकारला जाग आली...!”
10
स्मृती-पलाश होणार विवाहबद्ध; PM मोदींचे दोघांसाठी खास पत्र, म्हणाले- "तुमची पार्टनरशिप..."
11
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
12
Mumbai: एक्स्प्रेस वेवरील पुलांच्या डागडुजीसाठी १३६ कोटींचा खर्च, एकनाथ शिंदेंच्या सूचनेनंतर महापालिका सरसावली
13
Cryptocurrency Crash: क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! २४ तासांत १७ लाख कोटींची फोडणी; Bitcoin ७% पेक्षा अधिक घसरलं
14
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
15
"पुरस्कार घेण्यास परदेशात गेलीस तर…’’, नोबेल विजेत्या महिलेला सरकारने दिली धमकी  
16
‘गोल्डन गर्ल’चं नवं टार्गेट सेट, बिहारच्या राजकारणातील तरुण चेहऱ्याने वेधलं लक्ष, कोण आहे ती?
17
धक्कादायक खुलासा! डॉक्टर शाहीन निघाली दहशतवादी फंडिंगची मास्टरमाईंड; बिटकॉइन आणि हवालातून कोट्यवधींचा व्यवहार
18
ST महामंडळाचा आर्थिक शिस्तीवर भर; नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर, पारदर्शकतेसाठी विशेष नोंदवही
19
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
20
आमदार-खासदारांशी कसं वागावे? शासनानं काढलं परिपत्रक; कर्मचाऱ्यांना दिला ९ कलमी कार्यक्रम
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपन्यांना ‘आयुष्यमान’ करण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 00:43 IST

नाशिक : सरकारने पुरेसे वैद्यकीय व्यावसायिक उपलब्ध करून देण्यासाठी सरकारी रुग्णालये अद्ययावत करून तेथे वैद्यकीय महाविद्यालये सुरू करणे अपेक्षित आहे, मात्र सरकार त्याऐवजी विमा कंपन्यांना ‘आयुष्यमान’ करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्टÑीय अध्यक्ष डॉ. रवि वानखेडकर यांनी केली.

ठळक मुद्देरवि वानखेडकर : सरकारच्या वैद्यकीय धोरणार टीका

नाशिक : सरकारने पुरेसे वैद्यकीय व्यावसायिक उपलब्ध करून देण्यासाठी सरकारी रुग्णालये अद्ययावत करून तेथे वैद्यकीय महाविद्यालये सुरू करणे अपेक्षित आहे, मात्र सरकार त्याऐवजी विमा कंपन्यांना ‘आयुष्यमान’ करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्टÑीय अध्यक्ष डॉ. रवि वानखेडकर यांनी केली.आयएमएच्या कृतज्ञता सोहळ्यानिमित्त शालिमार येथील आयएमए कार्यालयात वानखेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी डॉ. संजय ओक, आयएम शहराध्यक्ष डॉ. आवेश पलोड, डॉ. नितीन चिताळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ‘आयुष्यमान भारत’ या योजनेतून मिळणारी रक्कम उपचार व जोखमीच्या खर्चाचा विचार करता अत्यंत तुटपुंजी आहे. त्यामुळे डॉक्टर-रुग्ण यांच्या नातेसंबंधात तणाव निर्माण होण्याचा धोका संभवतो असे वानखेडकर म्हणाले. सरकारने डॉक्टरांपेक्षा नागरिकांचे आरोग्यहित लक्षात घेऊन वैद्यकीय आयोग विधेयक नामंजूर करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. प्रगत राष्टÑांच्या तुलनेत भारताचे आरोग्यविषयक अंदापत्रकातील तरतूद नगण्य स्वरूपाची असून, हे चिंताजनक आहे. सरकारने सरकारी आरोग्यव्यवस्था अधिकाधिक बळकट करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.टीबीमुक्त भारताचा निर्धारभारत अजूनही ‘क्षयरोगा’ची राजधानी आहे. आपल्या देशात दरवर्षी दोन लाख ७० हजार लोक टीबीने (क्षयरोग) मृत्युमुखी पडतात. देशाचे आरोग्य राजकीय अजेंड्यावर येणे हे स्वागतार्ह आहे; मात्र सरकारने आपली जबाबदारी खासगी क्षेत्रावर ढकलणे योग्य नाही. देशात दरवर्षी २ लाख ७० हजार नागरिकांचा टीबीने मृत्यू होतो, हे अत्यंत धक्कादायक आहे. युनायटेड नेशनकडून याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. जागतिकस्तरावर ‘टीबी हटाव’अभियान युनायटेड नेशनने हाती घेतले आहे. याअंतर्गत २०२५ पर्यंत भारत ‘टीबी’मुक्त करण्याचा निर्धार आयएमएने सरकारसोबत केल्याचे त्यांनी अधोरेखित केले.निवडणुकांमध्ये ‘आरोग्य अजेंडा’मध्य प्रदेश, रांजस्थान, छत्तीसगढ या राज्यांमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये कर्नाटकप्रमाणे ‘आरोग्य अजेंडा’ ठेवण्यात येणार आहे. जो पक्ष हा अजेंडा मान्य करण्याची हमी देईल, त्याला पाठिंबा आयएमए देणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रयोग कर्नाटक निवडणुकीत यशस्वी ठरल्याचा दावा त्यांनी केला. आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्येही आरोग्य अजेंडा मांडला जाईल, असे वानखेडकर म्हणाले.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाMONEYपैसा