शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

प्रवाशांना विम्याचा लाभ मात्र बसेस असुरक्षितबसेसला नाही विमा संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 12:49 AM

संदीप भालेराव । नाशिक : कोणत्याही आंदोलनात सरकारी वाहन म्हणून महामंडळाच्या बसला लक्ष्य करण्याची मानसिकता बळावल्याने बसेस आंदोलनकर्त्यांच्या असंतोषाला बळी पडतात. वर्षानुवर्षे अनेक प्रकारच्या आंदोलनांत याच मानसिकतेमुळे बसेसचे नुकसान होत आहे. मात्र सरकारी वाहन म्हणून ज्या बसेसची तोडफोड होते त्या बसेसना विम्याचे कोणतेही संरक्षण नसल्याची बाब समोर आली असून, एस.टी. महामंडळ हे स्वयंअर्थसहाय्यित संस्था असल्याने त्यांना विमा मिळत नसल्याने महामंडळाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

ठळक मुद्देभरपाई मिळत नसल्याने महामंडळाला भुर्दंडउत्पन्नातूनच करावी लागते दुरुस्तीनुकसानग्रस्त बसेसला मिळेना सरकारी मदतएसटी महामंडळ असल्याचा फटका 

संदीप भालेराव ।नाशिक : कोणत्याही आंदोलनात सरकारी वाहन म्हणून महामंडळाच्या बसला लक्ष्य करण्याची मानसिकता बळावल्याने बसेस आंदोलनकर्त्यांच्या असंतोषाला बळी पडतात. वर्षानुवर्षे अनेक प्रकारच्या आंदोलनांत याच मानसिकतेमुळे बसेसचे नुकसान होत आहे. मात्र सरकारी वाहन म्हणून ज्या बसेसची तोडफोड होते त्या बसेसना विम्याचे कोणतेही संरक्षण नसल्याची बाब समोर आली असून, एस.टी. महामंडळ हे स्वयंअर्थसहाय्यित संस्था असल्याने त्यांना विमा मिळत नसल्याने महामंडळाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.कोरेगाव-भीमा येथील प्रकरणावरून उफाळलेल्या वादानंतर राज्यात ठिकठिकाणी सुमारे ४३ बसेसची तोडफोड होऊन महामंडळाचे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले तर १९ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले. या घटनेनंतर परिवहन मंत्र्यांनी आंदोलनात झालेल्या नुकसानीची कुणाकडूनही भरपाई घेतली जाणार नसल्याचे जाहीर करून महामंडळ स्वत: नुकसान सोसणार असल्याचे म्हटले होते. अशा प्रकारचे आर्थिक नुकसान सोसण्याचा महामंडळाचा हा पहिलाच प्रकार नसून राज्यात आजवर झालेल्या विविध उग्र आंदोलनांत बसेसचे नुकसान महामंडळाला सोसावे लागले आहे.अगोदरच आर्थिक तोट्यात असलेल्या महामंडळापुढे अनेक प्रश्न असताना बसेसचे होणारे नुकसान आणि बंदमुळे बुडणारे उत्पन्न यामुळे तोट्यात भरच पडत असते. महामंडळापुढे सध्या कामगारांच्या वेतन मसुद्याचा मोठा प्रश्न आहे. प्रवाशांना संरक्षण, बसेस वाºयावरअपघातात प्रवाशाचा मृत्यू अथवा जखमी झाल्यास महामंडळाकडून पूर्वी भरपाई दिली जात होती. महामंडळ आपल्याकडील उत्पन्नातून दुर्घटनेतील प्रवाशांना आर्थिक मदत करीत होते. परंतु आता तिकिटावर एक रुपया सरचार्ज घेऊन प्रवाशांना विम्याचे संरक्षण दिले जाते. असाच मार्ग काढून बसेसला विम्याचे संरक्षण कसे मिळेल, यासाठी मार्ग काढणे अपेक्षित आहे. ‘सार्वजनिक मालमत्तेच्या विद्रुपीकरणाचा कायदा’ अस्तित्वात आहे. यामध्ये ज्या संघटनेच्या आंदोलनात बसेसचे नुकसान झाले त्या संघटना, राजकीय पक्षांकडून नुकसानीची भरपाई वसूल केली जाते. अशा प्रकारचा कायदा अस्तित्वात असला तरी मात्र या कायद्यान्वये महामंडळाला अद्यापही दिलासा मिळालेला नाही. अशाप्रकारची भरपाई कुणीही महामंडळाला देऊ केलेली नाही. ज्या जिल्ह्यात आंदोलनामुळे बसेसचे नुकसान झाले तेथील जिल्हाधिकाºयांकडे ‘सार्वजनिक मालमत्तेच्या विद्रुपीकरणाचा कायदा’ अंतर्गत नुकसान भरपाईचा प्रस्ताव सादर केला जातो. परंतु नंतर याचे पुढे काय होते याची माहिती महामंडळालाही मिळत नाही.