शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

आमदाराच्या कार्यालयात ठिय्या देऊनही अपुरे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:37 IST

पावसाने दडी मारल्याने नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ५५ टक्के पाणी साठल्यामुळे महापालिकेने एक दिवसाचा पाणीपुरवठा कपातीचा निर्णय मागे घेतला असतानाही पंचवटीतील गणेशवाडी परिसरात काही भागात पाणी येत नाही,

पंचवटी : पावसाने दडी मारल्याने नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ५५ टक्के पाणी साठल्यामुळे महापालिकेने एक दिवसाचा पाणीपुरवठा कपातीचा निर्णय मागे घेतला असतानाही पंचवटीतील गणेशवाडी परिसरात काही भागात पाणी येत नाही, तर काही ठिकाणी अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याने ऐन पावसाळ्यात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने संतप्त महिलांनी थेट आमदार बाळासाहेब सानप यांच्या संपर्क कार्यालयात ठिय्या मांडला, मात्र तरीही प्रश्न सुटला नाही.गणेशवाडीत गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, त्यात प्रशासनाने दर गुरुवारी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद केल्याने तेव्हापासून नळाला पाणी येतच नसल्याचा आरोप महिलांनी केला आहे. पाणी येत नसल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, कधी गंगाघाटावर जाऊन वापरासाठी पाणी आणावे लागते तर कधी अन्य भागात राहणाºया नागरिकांकडून पाणी मागावे लागते. परिसरात पाणी कमी दाबाने येत असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पाणीपुरवठा सुरळीत करावा यासाठी महिलांनी आमदार सानप यांच्या कार्यालयात ठिय्या देऊन हकिकत कथन केली. परंतु दुसºया दिवशीदेखील परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने, तर काही भागात झालाच नसल्याने महिलांनी नाराजी दर्शवून संताप व्यक्त केला आहे.पाण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून येथील नागरिकांना कसरत करावी लागत आहे. यापूर्वी देखील नागरिकांनी विभागीय कार्यालयात तक्रारी केलेल्या आहेत. मात्र पाणीपुरवठा दोन दिवसात सुरळीत होईल असे उत्तर वारंवार मिळत गेले. प्रत्यक्षात मात्र सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढतच गेला. शहरात अन्यत्र एकवेळ पुरेवा पाणीपुरवठा होत असतांना फक्त गणेशवाडी आणि आजुबाजूच्या परिसरात पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांनी या संदर्भात थेट आमदाराकडेच आपली भूमिका मांडली.एकीकडे पाण्याची कमतरता असतांना पंचवटीतल काही भागात मात्र पाण्याचा मोठा वापर होत असल्याचे देखील चित्र आहे. शहरात एकवेळ पाणी पुरवठा केला जात असतांनाही अनेक लोक पाण्याचा गैरवापर करीत असल्याकडे देखील नागरिकांनी लक्ष वेधले. सध्या पाणीपुरवठा कमी करण्यात आला असतांना नागरिकांना समान पाणीवाटप होणे अपेक्षित आहे. मात्र काही भागात धो-धो पाणी मिळते आणि गणेशवाडीसह आजुबाजूच्या नागरिकांना कमी दाबाने पाणी दिले जात असल्यामुळे यातून तातडीने मार्ग काढावा अशी आग्रही मागणी करण्यात आली.सध्या धरणात कमी जलसाठा असल्याने संपूर्ण नाशिक शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. गणेशवाडी येथे कमी पाणीपुरवठा होत असल्याची नागरिकांची तक्रार असून, लागलीच संबंधित विभागाला पाणीपुरवठा व्यवस्थित करावा, अशा सूचना दिल्या आहेत.- बाळासाहेब सानप, आमदार

टॅग्स :water shortageपाणीकपातMLAआमदारNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका