शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

आमदाराच्या कार्यालयात ठिय्या देऊनही अपुरे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:37 IST

पावसाने दडी मारल्याने नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ५५ टक्के पाणी साठल्यामुळे महापालिकेने एक दिवसाचा पाणीपुरवठा कपातीचा निर्णय मागे घेतला असतानाही पंचवटीतील गणेशवाडी परिसरात काही भागात पाणी येत नाही,

पंचवटी : पावसाने दडी मारल्याने नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ५५ टक्के पाणी साठल्यामुळे महापालिकेने एक दिवसाचा पाणीपुरवठा कपातीचा निर्णय मागे घेतला असतानाही पंचवटीतील गणेशवाडी परिसरात काही भागात पाणी येत नाही, तर काही ठिकाणी अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याने ऐन पावसाळ्यात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने संतप्त महिलांनी थेट आमदार बाळासाहेब सानप यांच्या संपर्क कार्यालयात ठिय्या मांडला, मात्र तरीही प्रश्न सुटला नाही.गणेशवाडीत गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, त्यात प्रशासनाने दर गुरुवारी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद केल्याने तेव्हापासून नळाला पाणी येतच नसल्याचा आरोप महिलांनी केला आहे. पाणी येत नसल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, कधी गंगाघाटावर जाऊन वापरासाठी पाणी आणावे लागते तर कधी अन्य भागात राहणाºया नागरिकांकडून पाणी मागावे लागते. परिसरात पाणी कमी दाबाने येत असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पाणीपुरवठा सुरळीत करावा यासाठी महिलांनी आमदार सानप यांच्या कार्यालयात ठिय्या देऊन हकिकत कथन केली. परंतु दुसºया दिवशीदेखील परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने, तर काही भागात झालाच नसल्याने महिलांनी नाराजी दर्शवून संताप व्यक्त केला आहे.पाण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून येथील नागरिकांना कसरत करावी लागत आहे. यापूर्वी देखील नागरिकांनी विभागीय कार्यालयात तक्रारी केलेल्या आहेत. मात्र पाणीपुरवठा दोन दिवसात सुरळीत होईल असे उत्तर वारंवार मिळत गेले. प्रत्यक्षात मात्र सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढतच गेला. शहरात अन्यत्र एकवेळ पुरेवा पाणीपुरवठा होत असतांना फक्त गणेशवाडी आणि आजुबाजूच्या परिसरात पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांनी या संदर्भात थेट आमदाराकडेच आपली भूमिका मांडली.एकीकडे पाण्याची कमतरता असतांना पंचवटीतल काही भागात मात्र पाण्याचा मोठा वापर होत असल्याचे देखील चित्र आहे. शहरात एकवेळ पाणी पुरवठा केला जात असतांनाही अनेक लोक पाण्याचा गैरवापर करीत असल्याकडे देखील नागरिकांनी लक्ष वेधले. सध्या पाणीपुरवठा कमी करण्यात आला असतांना नागरिकांना समान पाणीवाटप होणे अपेक्षित आहे. मात्र काही भागात धो-धो पाणी मिळते आणि गणेशवाडीसह आजुबाजूच्या नागरिकांना कमी दाबाने पाणी दिले जात असल्यामुळे यातून तातडीने मार्ग काढावा अशी आग्रही मागणी करण्यात आली.सध्या धरणात कमी जलसाठा असल्याने संपूर्ण नाशिक शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. गणेशवाडी येथे कमी पाणीपुरवठा होत असल्याची नागरिकांची तक्रार असून, लागलीच संबंधित विभागाला पाणीपुरवठा व्यवस्थित करावा, अशा सूचना दिल्या आहेत.- बाळासाहेब सानप, आमदार

टॅग्स :water shortageपाणीकपातMLAआमदारNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका