शहरं
Join us  
Trending Stories
1
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
2
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
4
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
5
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
6
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
7
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
8
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
9
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
10
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
11
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
12
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
13
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
14
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
15
Nashik Crime: मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावून घेतलं अन् हल्लेखोरांना केला 'मेसेज'; नाशिकमध्ये तरुणाची कॅफेमध्ये कोयत्याने हत्या
16
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
17
नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
18
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
19
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
20
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...

शिक्षण खात्याच्या आदेशाने पर्यटनावर घाला

By admin | Updated: February 6, 2016 23:00 IST

अजब : दुर्घटना घडली म्हणून किनारे वर्ज्य करणे अव्यवहार्य; सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी

समुद्रात बुडून चौदा शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याने शिक्षण विभागाने समुद्रकिनारे आणि उंच ठिकाणी सहलींना मनाई करणारे आदेश जारी केले आहेत. शासनाची ही अतिदक्षता मात्र पर्यटक आणि पर्यटन व्यवसायाच्या मुळावर उठणार असून, कोकणचे पर्यटन अडचणीत येणार आहे. हे आदेश म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती असून, उद्या सहलीच्या बसला अपघात घडला, तर सहलीच बंद करणार काय? असा प्रश्न पर्यटन व्यावसायिकांनी केला आहे.पुण्याच्या आबेदा इनामदार महाविद्यालयातील १४ विद्यार्थी पाण्याचा अंदाज न आल्याने मुरूड येथील सागरात बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. प्रत्यक्षात काय घडले, याची चौकशी न करताच शिक्षण खात्याने हा निर्णय घेतल्याने त्याचे परिणाम पर्यटनावर होण्याची शक्यता आहे. पर्यटन स्थळांच्या निमित्ताने स्थानिक नागरिकांना रोजगार मिळतो, तसेच समुद्र किनाऱ्यावर म्हणजे बीचच्या व्यवसायावर ज्यांचा उदरनिर्वाह आहे, त्यांच्यावर संकट येणार आहे, परंतु समुद्र किनाऱ्याचे निसर्गसौंदर्य पाहणाऱ्या पर्यटकांना बंदी करण्यात आल्याने त्यांच्या हक्कावर गदा आली आहे. कोकण, गोवा अशा ठिकाणी महाविद्यालये आणि शाळांच्या सहली नेणारे अडचणीत येणार आहेत. राज्य शासनाने पर्यटन व्यवसायाला चालना देण्याचे सोडून निर्बंध घालण्याचे तरी थांबवावे, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. समुद्रकिनारा सोडाच, परंतु एखाद्या राजवाड्याला भेट देण्यासाठी विद्यार्थी गेले आणि राजवाड्याची भिंत पडली तर दुर्घटना झाली म्हणून राजवाडे पाहण्यास शासन मनाई करणार काय की एखाद्या सहलीच्या बसला अपघात झाला म्हणून बसने सहल नेण्यास बंदी करणार, असे प्रश्न पर्यटन व्यावसायिकांनी केले आहेत.