शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

शिक्षण खात्याच्या आदेशाने पर्यटनावर घाला

By admin | Updated: February 6, 2016 23:00 IST

अजब : दुर्घटना घडली म्हणून किनारे वर्ज्य करणे अव्यवहार्य; सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी

समुद्रात बुडून चौदा शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याने शिक्षण विभागाने समुद्रकिनारे आणि उंच ठिकाणी सहलींना मनाई करणारे आदेश जारी केले आहेत. शासनाची ही अतिदक्षता मात्र पर्यटक आणि पर्यटन व्यवसायाच्या मुळावर उठणार असून, कोकणचे पर्यटन अडचणीत येणार आहे. हे आदेश म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती असून, उद्या सहलीच्या बसला अपघात घडला, तर सहलीच बंद करणार काय? असा प्रश्न पर्यटन व्यावसायिकांनी केला आहे.पुण्याच्या आबेदा इनामदार महाविद्यालयातील १४ विद्यार्थी पाण्याचा अंदाज न आल्याने मुरूड येथील सागरात बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. प्रत्यक्षात काय घडले, याची चौकशी न करताच शिक्षण खात्याने हा निर्णय घेतल्याने त्याचे परिणाम पर्यटनावर होण्याची शक्यता आहे. पर्यटन स्थळांच्या निमित्ताने स्थानिक नागरिकांना रोजगार मिळतो, तसेच समुद्र किनाऱ्यावर म्हणजे बीचच्या व्यवसायावर ज्यांचा उदरनिर्वाह आहे, त्यांच्यावर संकट येणार आहे, परंतु समुद्र किनाऱ्याचे निसर्गसौंदर्य पाहणाऱ्या पर्यटकांना बंदी करण्यात आल्याने त्यांच्या हक्कावर गदा आली आहे. कोकण, गोवा अशा ठिकाणी महाविद्यालये आणि शाळांच्या सहली नेणारे अडचणीत येणार आहेत. राज्य शासनाने पर्यटन व्यवसायाला चालना देण्याचे सोडून निर्बंध घालण्याचे तरी थांबवावे, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. समुद्रकिनारा सोडाच, परंतु एखाद्या राजवाड्याला भेट देण्यासाठी विद्यार्थी गेले आणि राजवाड्याची भिंत पडली तर दुर्घटना झाली म्हणून राजवाडे पाहण्यास शासन मनाई करणार काय की एखाद्या सहलीच्या बसला अपघात झाला म्हणून बसने सहल नेण्यास बंदी करणार, असे प्रश्न पर्यटन व्यावसायिकांनी केले आहेत.