शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

अंदरसूल बाजार आवारात कांदा ५२५ रुपये क्विंटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:14 IST

उन्हाळ कांद्याच्या दरात घसरण सुरूच असून, नफा तर दूरच उत्पादन खर्चही सुटत नसल्याने शेतकरी आर्थिक दृष्टचक्रात सापडला आहे. सोमवारी (दि. २३) येवला मुख्य बाजार आवार व अंदरसूल बाजार आवारात एकूण २१ हजार क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी अवघा सव्वापाचशे रुपये दर मिळाला. येवला बाजार समितीत उन्हाळ कांद्याची आवक वाढत असली तरी बाजारभावाचा आलेख घसरत चालला आहे.

येवला : उन्हाळ कांद्याच्या दरात घसरण सुरूच असून, नफा तर दूरच उत्पादन खर्चही सुटत नसल्याने शेतकरी आर्थिक दृष्टचक्रात सापडला आहे. सोमवारी (दि. २३) येवला मुख्य बाजार आवार व अंदरसूल बाजार आवारात एकूण २१ हजार क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी अवघा सव्वापाचशे रुपये दर मिळाला. येवला बाजार समितीत उन्हाळ कांद्याची आवक वाढत असली तरी बाजारभावाचा आलेख घसरत चालला आहे.  सोमवारी येवला बाजार समितीत उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल किमान २५० ते ७२५ सरासरी ५२५ रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. सोमवारी येवला बाजार समितीच्या मुख्य आवारात २०० ट्रॅक्टर १०० रिक्षा व पिकअपमधून सुमारे नऊ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. तसेच अंदरसूल उपबाजार आवारात २०० ट्रॅक्टर, ६४० रिक्षा व पिकअपमधून सुमारे १२ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.  देशाची गरज भागवून कांदा शिल्लक राहील, अशी स्थिती आहे. मात्र निर्यातमूल्य शून्य असतानादेखील परदेशी ग्राहकांना भारतीय कांदा का परवडत नाही, स्थानिक खरेदीदार व निर्यातदारांनी कांदा खरेदीबाबत  हात आखडता घेतला असल्याचे दिसून येत आहे.निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्याची गरजकांदा निर्यातीसाठीची प्रक्रिया पूर्ण करताना लेटर आॅफ क्रेडिटची पूर्तता करावी लागते, ही प्रक्रिया क्लिष्ट व गुंतागुंतीची असल्याने निर्यातदाराची निर्यातीची इच्छा राहिलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारने निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत सद्यस्थितीत कांद्याचे दर सुमारे हजार रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे उत्पादकांच्या पदरी निराशा पडल्याने सकारात्मक धोरण सरकारने राबवावे, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने केली जात आहे. त्यातच कांदा खरेदीचे पैसे तत्काळ शेतकऱ्यांना मिळत नाही. मिळालेले धनादेश वटत नाही. शेतकºयांना पैसे मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे जगाचा पोशिंदा संकटात सापडला आहे. कांद्याला उठाव नाही. शासनाचे कांद्याबाबत उदासीन धोरण, शिवाय कांदा उत्पादक शेतकºयांपेक्षा शहरी ग्राहकांची अधिक काळजी सरकार कांद्याबाबत घेते. अन्य वस्तूंचे भाव वाढले तर शासन फार काळजी करीत नाही; परंतु शहरी ग्राहकांच्या डोळ्यात कांदा पाणी आणायला लागला की शासन त्यावर उपाययोजना करते आणि बळीराजा हवालदिल होतो. हे दृष्टचक्र थांबायला हवे. कांद्याला हमीभाव ही गर्जना हवेतच विरली आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम कांदा उत्पादक शेतकºयाला आर्थिक संकटात टाकण्यासाठी भर घालत आहे.

टॅग्स :onionकांदा