‘समाजकल्याण’ सुरक्षा रक्षकांवर अन्याय
By Admin | Updated: May 15, 2017 17:30 IST2017-05-15T17:30:36+5:302017-05-15T17:30:36+5:30
तक्रार: शासनाला देणार निवेदन

‘समाजकल्याण’ सुरक्षा रक्षकांवर अन्याय
नाशिक : समाजकल्याण विभागाच्या विविध कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकांना कंपनीमार्फतच ठेवण्याचा प्रकार संबंधित अधिकारी करीत असून, ठेकेदार कंपन्यांना पाठीशी घातले जात असल्याची तक्रार या रक्षकांनी केली आहे. विशेष म्हणजे स्वच्छता आणि सुरक्षितेच्या कामासाठी बाह्यस्त्रोतांच्या माध्यमातून करण्याच्या आदेशातून समाजकल्याण विभागाला सूट दिल्याचे पत्र कामगार विभागाने दिल्यानंतरही त्याचे पालन हा विभाग करीत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.