शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कांदा चाळ बनविवण्यासाठी मिळेना साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 00:24 IST

निऱ्हाळे : शासनाने लावलेल्या जनता कर्फ्युमुळे, लॉकडाऊन आदी विविध प्रकारच्या निर्णयामुळे दुकाने बंद झाल्याने शेतकऱ्यांना कांदा चाळ बनविण्यासाठी लागणारी साहित्य सामुग्री मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच पडून असुन तो साठवण्याची पंचाईत झाली आहे. अशातच रणरणत्या उन्हामुळे व अचानक येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचा कांदा शेतात तर कुठे झाडाखाली पडुन असुन तो साठवण्याची पंचाईत झाली आहे. उन्हामुळे या कांद्याची टिकवण क्षमता घटण्याची शक्यता असल्याने कांदा पीक घेऊनही शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे कांदा चाळ बनविण्यासाठी लागणारी सामग्री मिळवण्यासाठी शेतकऱ्याची धावपळ सुरू आहे.

ठळक मुद्देशेतातील कांद्दाची टिकवण क्षमता घटण्याची शक्यता

निऱ्हाळे : शासनाने लावलेल्या जनता कर्फ्युमुळे, लॉकडाऊन आदी विविध प्रकारच्या निर्णयामुळे दुकाने बंद झाल्याने शेतकऱ्यांना कांदा चाळ बनविण्यासाठी लागणारी साहित्य सामुग्री मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच पडून असुन तो साठवण्याची पंचाईत झाली आहे. अशातच रणरणत्या उन्हामुळे व अचानक येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचा कांदा शेतात तर कुठे झाडाखाली पडुन असुन तो साठवण्याची पंचाईत झाली आहे. उन्हामुळे या कांद्याची टिकवण क्षमता घटण्याची शक्यता असल्याने कांदा पीक घेऊनही शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे कांदा चाळ बनविण्यासाठी लागणारी सामग्री मिळवण्यासाठी शेतकऱ्याची धावपळ सुरू आहे.कडक लॉकडाऊनमुळे अनेक शेतकऱ्यांना कांदा चाळ बनविवण्यासाठी अडचणी येऊ लागल्या आहेत. अशा परिस्थितीत हि करोना महामारी समाप्त होईल, याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.कांदा लागवडीच्या काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा बियाणे वाया गेल्याने जे रोप जगली त्यात कांदा लागवड करण्यात आली. पिकलेल्या कांद्याला भाव कमी असल्याने तसेच सध्या बाजार समित्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कांदा साठवणूक करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे.कांदाचाळ बनविण्याचे काम अनेक शेतकरी आपल्या शेतात करत आहेत. मात्र ऐन उन्हाळ् कांदा काढणीच्या हंगामात झालेल्या लॉकडाउन मुळे, कांदा चाळ बनविवण्यासाठी लागणारी ॲगल, पट्टी,जाळी, पत्रे, विटा सिमेंट यासारखी साधनसामग्री सध्या मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा कांदा कडक उन्हात पडुन आहे.उन्हाने कांदा लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे कांदा जास्त दिवस टिकणार नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊन मोठा तोटा सहन करावा लागेल काही शेतकरी मात्र शेतातच झाडाच्या सावलीत कांद्याची पोळ मारुन ठेवताना दिसत आहेत.कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी...... प्रत्येकाला कांदा चाळ...... पण.. तीही ऑनलाईन अर्ज भरून.... शेतकरी कसा अर्ज भरणार..... मग ह्या चाळी शेतकऱ्यांना मिळणार कधी... कृषि अधिकारीच काय पण कृषी सहाय्यक पण शेतकरी वर्गाला भेटत नाही. म्हणे लॉगडाऊन आहे. आता बियाणे मोफत देणार.. पण अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा पण शेतु कार्यालयही बंद मग बियाणे कसे मिळेल अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गाने केली आहे.(१२ निऱ्हाळे, १)चाळीविना झाडाच्या सावलीत पडलेला कांदा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याonionकांदा