शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पायाभूत सुविधांवर भर देणारा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 12:01 AM

चार महिन्यांपूर्वी याच सरकारने अंतरिम बजेट मांडले होते. तेच सरकार पुन्हा सत्तेवर आल्यामुळे अंतरिम बजेटमध्ये फारसे बदल अपेक्षित नव्हते. ...

चार महिन्यांपूर्वी याच सरकारने अंतरिम बजेट मांडले होते. तेच सरकार पुन्हा सत्तेवर आल्यामुळे अंतरिम बजेटमध्ये फारसे बदल अपेक्षित नव्हते. परंतु, दुसऱ्या टर्ममधील सरकारचा पहिला अर्थसंकल्प म्हणून पुढील पाच वर्षांचा रोडमॅप या अर्थसंकल्पातून दिसायला हवा होता, तसा तो पूर्णपणे प्रतिबिंबित झालेला नाही. अर्थात सर्वच बाबी अर्थसंकल्पातून मांडल्या जात नाहीत. औद्योगिकसह अन्य क्षेत्रांतील मंदी, बेरोजगारी या समस्यांना तोंड देण्यासाठी काही मोठ्या शस्त्रक्रिया या सरकारला येत्या पाच वर्षांत कराव्या लागणार आहेत. अंतरिम बजेटमधून शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत सहा हजार रुपये, असंघटित क्षेत्रातील कामगारांना ठराविक वयानंतर निश्चित उत्पन्नासाठी पेन्शन योजना, असंघटित कामगारांसाठी तीन हजार निवृत्तिवेतन देणाºया योजना जाहीर करण्यात आल्या होत्या. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून १.५ कोटींपेक्षा कमी उलाढाल असणाºया छोट्या व्यापाºयांना पेन्शन योजना लागू करण्यात आली असली तरी त्याची अंमलबजावणी कितपत प्रभावी होते, त्यावर त्याचे यशापयश अवलंबून आहे. छोट्या करदात्यांना सूट देऊन अतिश्रीमंत करदात्यांकडून ती तूट वसूल करण्याचा सरकारचा प्रयत्न दिसत आहे. तसेच ४०० कोटींपेक्षा अधिक उलाढाल असणाºया कंपन्यांच्या कराचा दर ३० वरून २५ टक्के करण्यात आला आहे. तसेच रोखीच्या व्यवहारांवर नियंत्रण आणण्यासाठी एक कोटींपेक्षा अधिक रकमेची रोख काढली गेल्यास २ टक्के टीडीएस कापून घेण्यात येणार आहे. मात्र, स्त्री सक्षमीकरणासाठीच्या पाच हजारांचा ओव्हरड्राफ्ट आणि एक लाखांपर्यंतचे मुद्रा कर्ज या योजना फारशा फलदायी ठरणार नाहीत. पायाभूत सुविधांवरील १०० लाख कोटी रुपये पूर्णपणे आणि योग्यरितीने वापरल्यास त्यांचा पूर्ण उपयोग होऊ शकणार आहे. स्टॅण्डअप, स्टार्टअप, मेक इन इंडिया, बॅँकिंग क्षेत्राला मदत, पायाभूत सुविधांवर भर या बाबींमुळेच भारतीय अर्थव्यवस्था तीन ट्रिलियन डॉलरवरून पाच ट्रिलीयन डॉलरवर पोहोचू शकणार आहे. त्यातून औद्योगिक आणि अन्य क्षेत्रांतील मंदी दूर करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. केवळ त्याची अंमलबजावणी कितपत प्रभावी होते, त्यावर यशापयश अवलंबून राहणार आहे.- तुषार पगार, सनदी लेखापाल

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019chartered accountantसीए