शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

दबावामुळे समृद्धी प्रकरणी अधिकाऱ्यांकडून दिशाभूल करणारी माहिती, भालचंद्र कानगो यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 14:57 IST

समृद्धी महामार्ग मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेचा केला असून त्यांच्या दबावामुळेच अधिकारी दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. समृद्धी महामार्गासाठी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सरकारच्या दबावाला बळी पडून प्रत्यक्षात 25 टक्क्यांर्पयतच जमीन दिली असताना अधिकारी 50 टक्क्यांहून अधिक जमीन हस्तगत झाली असल्याचा दावा करीत असल्याचा गंभीर आरोप भाकपचे राज्य सरचिटणीस भालचंद्र कानगो यांनी केला.

ठळक मुद्देसमृद्धी प्रकरणी अधिकाऱ्यांकडून दिशाभूल करणारी माहिती अधिकाऱ्यांवर भूसंपादनासाठी दबाव असल्याचा आरोप भालचंद्र कानगो यांनी उठवली सरकारवर टिकेची झोड

नाशिक : समृद्धी महामार्ग मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेचा केला असून त्यांच्या दबावामुळेच अधिकारी दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. समृद्धी महामार्गासाठी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सरकारच्या दबावाला बळी पडून प्रत्यक्षात 25 टक्क्यांर्पयतच जमीन दिली असताना अधिकारी 50 टक्क्यांहून अधिक जमीन हस्तगत झाली असल्याचा दावा करीत असल्याचा गंभीर आरोप भाकपचे राज्य सरचिटणीस भालचंद्र कानगो यांनी केला आहे.सीबीएसजवळील आयटक कामगार केंद्र येथे कानगो यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समृद्धी महामार्गाचे भूससंपादन, कोरेगाव भीमा प्रकरण व औद्योगिक जमीनी बांधकाम व्यावसायिकांना देण्याविषयी सरकारने घेतलेल्या निर्णयाचा समाचार घेत राज्य व केंद्र सरकारने टिकेची झोड उठवली. ते म्हणाले, देशात भूसंपादन कायदा अस्तित्वात आणण्यासाठी भाजपची आग्रही भूमिका असताना सत्तेत आल्यानंतर मात्र भाजपने हा कायदाच रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपने या कायद्यानुसार जिमीनींचे भूसंपागन करणे अपेक्षित होते. परंतु, मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गासाठी भाजपनेच हा कायदा डावलून समृद्धी महामार्गासाठी भूसंपाद सुरू केले असून त्यासाठी मुख्यमंत्री अधिकाऱ्यांवर दबाव आणीत आहे. या प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनच 50 ते 60 टक्के शेतकरी जमीनी देण्यास तयार असल्याचा दावा सरकार करीत आहे. मात्र अद्याप केवळ 25 टक्के जमीनींचेच भूसंपादन होऊ शकले आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गाचा प्रकल्प प्रतिष्ठेचा केला असून त्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी समृद्धी महामार्गविरोधी संघर्ष समितीचे समन्वयक व भाकपचे जिल्हा सरचिटणीस राजू देसले, मनसेचे जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम, भाकपचे सहसचीव भास्कर शिंदे आदि उपस्थित होते.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गCommunist Party of indiaकम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाagitationआंदोलनFarmerशेतकरी