शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

दबावामुळे समृद्धी प्रकरणी अधिकाऱ्यांकडून दिशाभूल करणारी माहिती, भालचंद्र कानगो यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 14:57 IST

समृद्धी महामार्ग मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेचा केला असून त्यांच्या दबावामुळेच अधिकारी दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. समृद्धी महामार्गासाठी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सरकारच्या दबावाला बळी पडून प्रत्यक्षात 25 टक्क्यांर्पयतच जमीन दिली असताना अधिकारी 50 टक्क्यांहून अधिक जमीन हस्तगत झाली असल्याचा दावा करीत असल्याचा गंभीर आरोप भाकपचे राज्य सरचिटणीस भालचंद्र कानगो यांनी केला.

ठळक मुद्देसमृद्धी प्रकरणी अधिकाऱ्यांकडून दिशाभूल करणारी माहिती अधिकाऱ्यांवर भूसंपादनासाठी दबाव असल्याचा आरोप भालचंद्र कानगो यांनी उठवली सरकारवर टिकेची झोड

नाशिक : समृद्धी महामार्ग मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेचा केला असून त्यांच्या दबावामुळेच अधिकारी दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. समृद्धी महामार्गासाठी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सरकारच्या दबावाला बळी पडून प्रत्यक्षात 25 टक्क्यांर्पयतच जमीन दिली असताना अधिकारी 50 टक्क्यांहून अधिक जमीन हस्तगत झाली असल्याचा दावा करीत असल्याचा गंभीर आरोप भाकपचे राज्य सरचिटणीस भालचंद्र कानगो यांनी केला आहे.सीबीएसजवळील आयटक कामगार केंद्र येथे कानगो यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समृद्धी महामार्गाचे भूससंपादन, कोरेगाव भीमा प्रकरण व औद्योगिक जमीनी बांधकाम व्यावसायिकांना देण्याविषयी सरकारने घेतलेल्या निर्णयाचा समाचार घेत राज्य व केंद्र सरकारने टिकेची झोड उठवली. ते म्हणाले, देशात भूसंपादन कायदा अस्तित्वात आणण्यासाठी भाजपची आग्रही भूमिका असताना सत्तेत आल्यानंतर मात्र भाजपने हा कायदाच रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपने या कायद्यानुसार जिमीनींचे भूसंपागन करणे अपेक्षित होते. परंतु, मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गासाठी भाजपनेच हा कायदा डावलून समृद्धी महामार्गासाठी भूसंपाद सुरू केले असून त्यासाठी मुख्यमंत्री अधिकाऱ्यांवर दबाव आणीत आहे. या प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनच 50 ते 60 टक्के शेतकरी जमीनी देण्यास तयार असल्याचा दावा सरकार करीत आहे. मात्र अद्याप केवळ 25 टक्के जमीनींचेच भूसंपादन होऊ शकले आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गाचा प्रकल्प प्रतिष्ठेचा केला असून त्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी समृद्धी महामार्गविरोधी संघर्ष समितीचे समन्वयक व भाकपचे जिल्हा सरचिटणीस राजू देसले, मनसेचे जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम, भाकपचे सहसचीव भास्कर शिंदे आदि उपस्थित होते.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गCommunist Party of indiaकम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाagitationआंदोलनFarmerशेतकरी