शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
3
टीडीपीने अद्याप पत्तेच खोललेले नाहीत, भाजप टेन्शनमध्ये; लोकसभा अध्यक्षपदासाठी बैठकांचे सत्र
4
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
5
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
6
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
7
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
8
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
9
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
10
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
11
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
12
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
13
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
14
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
15
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
16
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
17
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
18
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा
19
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
20
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत

कर्जमाफीसाठी नाशिक जिल्ह्यातील ४७ हजार शेतक-यांची माहिती जुळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 2:53 PM

राज्य सरकारने जुलै महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज स्वाभीमान कर्जमाफी योजना जाहीर करून आॅगष्ट महिन्यापासून शेतक-यांकडून आॅनलाईन कर्जमाफीचे अर्ज भरून घेतले. या अर्जात जवळपास ५५ प्रकारचे प्रश्न विचारून शेतक-याची व त्याच्या कुटुंबियांची इत्यंभुत माहिती शासनाने भरून घेतली व

ठळक मुद्देनाशिक जिल्हा बॅँक : योजनेपासून वंचित राहण्याची भितीजिल्ह्यातील १,४७,७८३ शेतक-यांनी सरकारकडे आॅनलाईन अर्ज

नाशिक : जिल्हा बॅँकेकडून पीक कर्ज घेतांना खातेदाराने बॅँकेला दिलेली माहिती व शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गंत आॅनलाईन भरलेल्या माहितीचा ताळामेळ बसत नसल्याने जिल्ह्यातील जवळपास ४७ हजार शेतकरी शासनाच्या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहण्याची भिती व्यक्त केली जात असून, जिल्हा बॅँकेने या संदर्भात केलेल्या आवाहनाला फक्त तीन हजार शेतक-यांचा प्रतिसाद मिळाला आहे.राज्य सरकारने जुलै महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज स्वाभीमान कर्जमाफी योजना जाहीर करून आॅगष्ट महिन्यापासून शेतक-यांकडून आॅनलाईन कर्जमाफीचे अर्ज भरून घेतले. या अर्जात जवळपास ५५ प्रकारचे प्रश्न विचारून शेतक-याची व त्याच्या कुटुंबियांची इत्यंभुत माहिती शासनाने भरून घेतली व त्याची खात्री पटल्यानंतरच त्यांचे दिड लाखापर्यंतचे कर्ज माफ केले. प्रत्यक्षात शेतक-याच्या हातात कर्जमाफीची रक्कम न देता जिल्हा बॅँकेच्या त्याच्या कर्जखात्यााात पैसे भरून सातबारा कोरा करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा बँकेकडून कर्ज घेतलेल्या नाशिक जिल्ह्यातील १,४७,७८३ शेतक-यांनी सरकारकडे आॅनलाईन अर्ज केले व त्यातील ९७,५५० शेतक-यांना छाननीत पात्र ठरविण्यात आले. जिल्ह्यातील शेतक-यांकडील ७६४.०७ कोटी रूपये कर्जमाफी होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षातमात्र ४२९.६३ कोटी रूपयांचीच कर्जमाफी मिळाली आहे. जवळपास ५०३३३ शेतक-यांना शासनाने अपात्र ठरवून त्यांची यादी पुन्हा जिल्हा बॅँकेकडे जानेवारी महिन्यात परत पाठविली व शेतक-यांनी भरलेली चुकीच्या माहितीची दुरूस्ती करून पुन्हा प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना केल्या. त्यात प्रामुख्याने कर्जदार पत्नी असता पतीने अर्ज भरणे, आधार क्रमांक नसणे, भ्रमणध्वनी क्रमांक न देणे, कर्जाची रक्कम चुकणे, त्याच बरोबर २०१७ पर्यंतच्या कर्जाचा उल्लेख करणे अशा प्रकारच्या चुका असल्याने जिल्हा बॅँकेने सदरची यादी बॅँकेच्या प्रत्येक शाखेत पाठवून त्या त्या शेतक-यांनी त्याची पुर्तता करण्याचे आवाहन केले. परंतु बॅँकेच्या या आवाहनाला फक्त तीन हजार शेतक-यांना प्रतिसाद मिळाला. याचाच अर्थ शेतक-यांनी चुकीचे अर्ज भरले असून खरी माहिती दडविली असावी असे बॅँक व्यवस्थापनाला वाटू लागले आहे. त्यामुळे जवळपास ४७ हजार शेतकरी या कर्जमाफी योजनेपासून आता वंचित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक