शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

काळ्या अळीचा सागाच्या झाडांवर प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 17:39 IST

कळवण : तालुक्यातील पश्चिम भागात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून एका काळ्या अळीने जंगलातील सागाच्या झाडाच्या पानास आपले भक्ष बनवीत आहे. त्यामुळे परिसरातील किमती सागाच्या झाडाची वाढ खुंटून त्याचे अस्तित्व नष्ट होते की काय ? अशी भिती या भागातील ज्येष्ठआदिवासी शेतकरी व्यक्त करीत असून, प्रथमच काळ्या अळीचा सागावर झालेला प्रादुर्भाव अनुभवला असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देउपाययोजनेसाठी निसर्ग अन्पर्यावरण संस्थेचे वनविभागास निवेदन

कळवण : तालुक्यातील पश्चिम भागात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून एका काळ्या अळीने जंगलातील सागाच्या झाडाच्या पानास आपले भक्ष बनवीत आहे. त्यामुळे परिसरातील किमती सागाच्या झाडाची वाढ खुंटून त्याचे अस्तित्व नष्ट होते की काय ? अशी भिती या भागातील ज्येष्ठआदिवासी शेतकरी व्यक्त करीत असून, प्रथमच काळ्या अळीचा सागावर झालेला प्रादुर्भाव अनुभवला असल्याचे त्यांनी सांगितले. याकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र निसर्ग आणि पर्यावरण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किशोर कुवर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी कळवण (प्रादेशिक) यांना याबाबत योग्य उपाय योजना कराव्यात यासाठी सोमवारी निवेदन दिले.कळवण तालुक्यातील जिरवाडे, जामले, दरेगाव, कोसुरडे, भाकुरडे, करंमभेळ, कुंमसाडी आदी भागातील वनविभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या डोंगरावर विविध प्रकारची जंगली झाडे आहेत. मात्र अज्ञात अळीच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र या पश्चिम पट्यात ज्या ज्या ठिकाणी ही सागाची झाडे आहेत, त्याठिकाणी पाने काळ्या रंगाचा अळीने खाल्यामुळे येथील डोंगरावर ठीक ठिकाणी पांढरे भुरकट पट्टे निर्माण झाले आहेत, व सागाच्या झाडावर आलेली हिरवीगार मोठमोठी पाने नष्ट होत आहे. त्यामुळे सागाच्या झाडाच्या वाढीवर परिणाम देखील होऊ शकतो. त्यामुळे निसर्ग व पर्यावरणाचे अस्तित्व या भागात धोक्यात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.वेळीच या अळीवर उपाय योजना न केल्यास इतर झाडे, वनस्पती व डोंगर उताºयावर असलेल्या शेतीत याअळीने शिरकाव केल्यास आदिवासी शेतकऱ्यांचे शेत पिकांचे प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे संबंधित वनविभागाने याकडे वेळीच लक्ष घालून उपाय योजना कराव्यात अशी मागणी डॉ. कुवर यांनी केली आह.ेकळवण तालुक्यातील डोंगरांवरील काळ्या अळीचा सागावरील प्रादुर्भाव वाढतच गेला तर शेजारील गुजरात राज्यात असलेल्या सापुतारा परिसरातील मोठ्या प्रमाणावर असलेल्या सागाच्या जंगलात शिरकाव झाल्यास शेत पिकांबरोबर जंगल संपत्तीचे परिणामी निसर्ग व पर्यावरनाचे नुकसान होईल.त्यासाठी वनविभागाने याबाबत वनस्पतीशास्त्र तज्ज्ञांचे मत जाणून घेऊन योग्य ती उपाय योजना करावी.- डॉ. किशोर कुवर, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र निसर्ग आणि पर्यावरण विकास.

टॅग्स :forestजंगलFarmerशेतकरी