शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
5
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
6
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
7
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
8
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
9
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
10
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
11
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
12
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
13
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
14
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
15
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
16
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
17
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
18
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
19
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
20
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी

काळ्या अळीचा सागाच्या झाडांवर प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 17:39 IST

कळवण : तालुक्यातील पश्चिम भागात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून एका काळ्या अळीने जंगलातील सागाच्या झाडाच्या पानास आपले भक्ष बनवीत आहे. त्यामुळे परिसरातील किमती सागाच्या झाडाची वाढ खुंटून त्याचे अस्तित्व नष्ट होते की काय ? अशी भिती या भागातील ज्येष्ठआदिवासी शेतकरी व्यक्त करीत असून, प्रथमच काळ्या अळीचा सागावर झालेला प्रादुर्भाव अनुभवला असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देउपाययोजनेसाठी निसर्ग अन्पर्यावरण संस्थेचे वनविभागास निवेदन

कळवण : तालुक्यातील पश्चिम भागात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून एका काळ्या अळीने जंगलातील सागाच्या झाडाच्या पानास आपले भक्ष बनवीत आहे. त्यामुळे परिसरातील किमती सागाच्या झाडाची वाढ खुंटून त्याचे अस्तित्व नष्ट होते की काय ? अशी भिती या भागातील ज्येष्ठआदिवासी शेतकरी व्यक्त करीत असून, प्रथमच काळ्या अळीचा सागावर झालेला प्रादुर्भाव अनुभवला असल्याचे त्यांनी सांगितले. याकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र निसर्ग आणि पर्यावरण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किशोर कुवर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी कळवण (प्रादेशिक) यांना याबाबत योग्य उपाय योजना कराव्यात यासाठी सोमवारी निवेदन दिले.कळवण तालुक्यातील जिरवाडे, जामले, दरेगाव, कोसुरडे, भाकुरडे, करंमभेळ, कुंमसाडी आदी भागातील वनविभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या डोंगरावर विविध प्रकारची जंगली झाडे आहेत. मात्र अज्ञात अळीच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र या पश्चिम पट्यात ज्या ज्या ठिकाणी ही सागाची झाडे आहेत, त्याठिकाणी पाने काळ्या रंगाचा अळीने खाल्यामुळे येथील डोंगरावर ठीक ठिकाणी पांढरे भुरकट पट्टे निर्माण झाले आहेत, व सागाच्या झाडावर आलेली हिरवीगार मोठमोठी पाने नष्ट होत आहे. त्यामुळे सागाच्या झाडाच्या वाढीवर परिणाम देखील होऊ शकतो. त्यामुळे निसर्ग व पर्यावरणाचे अस्तित्व या भागात धोक्यात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.वेळीच या अळीवर उपाय योजना न केल्यास इतर झाडे, वनस्पती व डोंगर उताºयावर असलेल्या शेतीत याअळीने शिरकाव केल्यास आदिवासी शेतकऱ्यांचे शेत पिकांचे प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे संबंधित वनविभागाने याकडे वेळीच लक्ष घालून उपाय योजना कराव्यात अशी मागणी डॉ. कुवर यांनी केली आह.ेकळवण तालुक्यातील डोंगरांवरील काळ्या अळीचा सागावरील प्रादुर्भाव वाढतच गेला तर शेजारील गुजरात राज्यात असलेल्या सापुतारा परिसरातील मोठ्या प्रमाणावर असलेल्या सागाच्या जंगलात शिरकाव झाल्यास शेत पिकांबरोबर जंगल संपत्तीचे परिणामी निसर्ग व पर्यावरनाचे नुकसान होईल.त्यासाठी वनविभागाने याबाबत वनस्पतीशास्त्र तज्ज्ञांचे मत जाणून घेऊन योग्य ती उपाय योजना करावी.- डॉ. किशोर कुवर, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र निसर्ग आणि पर्यावरण विकास.

टॅग्स :forestजंगलFarmerशेतकरी