शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

काळ्या अळीचा सागाच्या झाडांवर प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 17:39 IST

कळवण : तालुक्यातील पश्चिम भागात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून एका काळ्या अळीने जंगलातील सागाच्या झाडाच्या पानास आपले भक्ष बनवीत आहे. त्यामुळे परिसरातील किमती सागाच्या झाडाची वाढ खुंटून त्याचे अस्तित्व नष्ट होते की काय ? अशी भिती या भागातील ज्येष्ठआदिवासी शेतकरी व्यक्त करीत असून, प्रथमच काळ्या अळीचा सागावर झालेला प्रादुर्भाव अनुभवला असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देउपाययोजनेसाठी निसर्ग अन्पर्यावरण संस्थेचे वनविभागास निवेदन

कळवण : तालुक्यातील पश्चिम भागात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून एका काळ्या अळीने जंगलातील सागाच्या झाडाच्या पानास आपले भक्ष बनवीत आहे. त्यामुळे परिसरातील किमती सागाच्या झाडाची वाढ खुंटून त्याचे अस्तित्व नष्ट होते की काय ? अशी भिती या भागातील ज्येष्ठआदिवासी शेतकरी व्यक्त करीत असून, प्रथमच काळ्या अळीचा सागावर झालेला प्रादुर्भाव अनुभवला असल्याचे त्यांनी सांगितले. याकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र निसर्ग आणि पर्यावरण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किशोर कुवर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी कळवण (प्रादेशिक) यांना याबाबत योग्य उपाय योजना कराव्यात यासाठी सोमवारी निवेदन दिले.कळवण तालुक्यातील जिरवाडे, जामले, दरेगाव, कोसुरडे, भाकुरडे, करंमभेळ, कुंमसाडी आदी भागातील वनविभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या डोंगरावर विविध प्रकारची जंगली झाडे आहेत. मात्र अज्ञात अळीच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र या पश्चिम पट्यात ज्या ज्या ठिकाणी ही सागाची झाडे आहेत, त्याठिकाणी पाने काळ्या रंगाचा अळीने खाल्यामुळे येथील डोंगरावर ठीक ठिकाणी पांढरे भुरकट पट्टे निर्माण झाले आहेत, व सागाच्या झाडावर आलेली हिरवीगार मोठमोठी पाने नष्ट होत आहे. त्यामुळे सागाच्या झाडाच्या वाढीवर परिणाम देखील होऊ शकतो. त्यामुळे निसर्ग व पर्यावरणाचे अस्तित्व या भागात धोक्यात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.वेळीच या अळीवर उपाय योजना न केल्यास इतर झाडे, वनस्पती व डोंगर उताºयावर असलेल्या शेतीत याअळीने शिरकाव केल्यास आदिवासी शेतकऱ्यांचे शेत पिकांचे प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे संबंधित वनविभागाने याकडे वेळीच लक्ष घालून उपाय योजना कराव्यात अशी मागणी डॉ. कुवर यांनी केली आह.ेकळवण तालुक्यातील डोंगरांवरील काळ्या अळीचा सागावरील प्रादुर्भाव वाढतच गेला तर शेजारील गुजरात राज्यात असलेल्या सापुतारा परिसरातील मोठ्या प्रमाणावर असलेल्या सागाच्या जंगलात शिरकाव झाल्यास शेत पिकांबरोबर जंगल संपत्तीचे परिणामी निसर्ग व पर्यावरनाचे नुकसान होईल.त्यासाठी वनविभागाने याबाबत वनस्पतीशास्त्र तज्ज्ञांचे मत जाणून घेऊन योग्य ती उपाय योजना करावी.- डॉ. किशोर कुवर, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र निसर्ग आणि पर्यावरण विकास.

टॅग्स :forestजंगलFarmerशेतकरी