शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

औद्योगिक क्षेत्रातील अपघातांना बसला आळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 01:40 IST

औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कारखान्यांनी नियमित मानकांचे पालन करून सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात यासाठी कार्यरत असलेल्या यंत्रणाच्या माध्यमातून कारखान्यातील कामगारांची सुरक्षा जपली जात आहेच शिवाय आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे अपघातांचे प्रमाण देखील कमी झाल्याचे दिसून आले आहे.

नाशिक : औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कारखान्यांनी नियमित मानकांचे पालन करून सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात यासाठी कार्यरत असलेल्या यंत्रणाच्या माध्यमातून कारखान्यातील कामगारांची सुरक्षा जपली जात आहेच शिवाय आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे अपघातांचे प्रमाण देखील कमी झाल्याचे दिसून आले आहे.नाशिक विभागात गेल्या काही वर्षांपासून औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने घेतल्या जाणाºया काळजीमुळे अपघातांच्या संख्येत व मृत्यूच्या संख्येत घट झाल्याचे दिसत आहे. नवीन येणारे उद्योग व तेथील स्वयंचलित यंत्रांमुळे या संख्येत घट झाल्याचे मत सुरक्षा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. ज्या अपघातांमुळे कामगारांना झालेल्या जखमा काही काळानंतर बºया होतात तर काही अपघातात गंभीर जखमा होऊन कामगारांना कायमचे अपंगत्व अथवा मृत्यू येतो ते कायमस्वरूपी अपघात असतात. हे प्रमाण आता अत्यंत कमी झाले आहे.औद्योगिक अपघातात ‘किरकोळ अपघाताचे प्रमाण’ आणि ‘गंभीर अपघाताचे प्रमाण’ अशा दोन प्रकारांनी मोजतात. अपघातांचे प्रमाण हंगामी रोजगार, कारखान्याबाहेरील काम, कामाची बदलती जागा, अतिरिक्त शारीरिक श्रम, अपुरी जागा आदी कारणांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असते. कोणत्याही उद्योगधंद्यात सुरक्षितता उपायांचे कठोर अवलंबन करणे हाच अपघाताचे प्रमाण कमी करण्याचा महत्त्वाचा तोडगा असल्याचे सुरक्षा अधिकारी सांगत आहे.  मात्र मागील काही वर्षांपासून नाशिक विभागातील औद्योगिक क्षेत्रात किरकोळ अपघातांचे व अपघातातील मृत्यूचे प्रमाण घटल्याचे सकारात्मक चित्र आहे.अशी घ्यायला हवी काळजीहंगामी कामगार भरताना कंत्राटदाराकडून कामगारांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी साहित्य उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी बूट, हातमोजे, हेल्मेट, कोट, चष्मा आदी साहित्यांची पूर्तता कामगारांसाठी करणे आवश्यक आहे. कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षेकरिता वापरली जाणारी साधनसामग्री आणि ती वापरण्यास कामगार व कर्मचाºयांना योग्य माहिती देणे बंधनकारक करणे आवश्यक आहे.ही आहेत अपघाताची प्रमुख कारणेअपघात अनेक कारणांनी होतात. कारखान्यांत मोठमोठ्या वस्तू हलविताना होणाºया अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्याची कारणे वस्तू हलविण्याचा रस्ता चांगला नसणे, अवजड वस्तू हालविताना कामगारांत सांघिक दूरदृष्टीचा अभाव असणे, वस्तूंच्या वजनाचा अंदाज नसणे अशा अनेक कारणांमुळे अपघात घडून येतात. याव्यतिरिक्त यांत्रिक अवजारे हाताळताना किंवा अवजड वस्तू कामगारांच्या अंगावर पडून अपघात होतात.अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रथम कंत्राटी कामगारांना सुरक्षेबाबत प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्या कंत्राटदारालाही याबाबत प्रशिक्षण देणे महत्त्वाचे ठरते. तसेच प्रत्येक कारखान्याने आस्थापनेपासूनच तेथे सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कामगारांना कामावर घेण्याआधी कामाबाबत संपूर्ण माहिती पुरविणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून त्याला कामात कुठलाही अडथळा येणार नाही.- देवीदास गोरे,  सहसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग

टॅग्स :MIDCएमआयडीसीNashikनाशिक