शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

इंदिरानगर परिसरात  कमी दाबाने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:31 IST

पावसाळा असूनदेखील परिसरात पाणीकपातीच्या नावाने अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करून पाणीपुरवठा विभाग वेठीस धरीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

इंदिरानगर : पावसाळा असूनदेखील परिसरात पाणीकपातीच्या नावाने अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करून पाणीपुरवठा विभाग वेठीस धरीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.गंगापूर धरणातील जलसाठा निम्मा असून, जुलै महिना संपत आला तरी अद्यापपर्यंत मुबलक पाऊस झाला नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाच्या वतीने पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. गेल्या महिन्यापासून पाणीकपातच्या नावाने परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाटील गार्डन, आत्मविश्वास सोसायटी, महारुद्र कॉलनी, अरुणोदय सोसायटी, मानस कॉलनी, जिल्हा परिषद, कॉलनी देवदत्त सोसायटी, देवेंद्र सोसायटी, शास्त्रीनगर, कमोदनगर एलआयसी कॉलनी, आदर्श सोसायटी आदीसह परिसरात गेल्या दहा दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी भरले जात नाही, तर वापराचे पाणी आणायची कुठून? असा प्रश्न महिलावर्गाला पडला आहे. इंदिरानगर भागात तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.नागरिकांमध्ये नाराजीनासर्डी ते पाथर्डी या परिसरात मुकणे धरणाचा पाणीपुरवठा सुरू झाला आहे. मात्र पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनाअभावी परिसरात कृत्रिम पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत असल्याची तक्र ार करण्यात येत आहे. पाणीकपात, कमी दाबाने पाणीपुरवठा करणे का सुरू आहे. पाणीकपात म्हणजे काय याचा खुलासा महापालिकेने करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा करून पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व व्हॉल्व्हमन नागरिकांना वेठीस धरीत आहे. त्यामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक वेळा तक्र ार करूनदेखील परिस्थिती ‘जैसे थे’च आहे.- रमाकांत अलई

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाwater shortageपाणीकपात