शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

इंदिरानगर परिसरात  कमी दाबाने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:31 IST

पावसाळा असूनदेखील परिसरात पाणीकपातीच्या नावाने अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करून पाणीपुरवठा विभाग वेठीस धरीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

इंदिरानगर : पावसाळा असूनदेखील परिसरात पाणीकपातीच्या नावाने अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करून पाणीपुरवठा विभाग वेठीस धरीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.गंगापूर धरणातील जलसाठा निम्मा असून, जुलै महिना संपत आला तरी अद्यापपर्यंत मुबलक पाऊस झाला नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाच्या वतीने पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. गेल्या महिन्यापासून पाणीकपातच्या नावाने परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाटील गार्डन, आत्मविश्वास सोसायटी, महारुद्र कॉलनी, अरुणोदय सोसायटी, मानस कॉलनी, जिल्हा परिषद, कॉलनी देवदत्त सोसायटी, देवेंद्र सोसायटी, शास्त्रीनगर, कमोदनगर एलआयसी कॉलनी, आदर्श सोसायटी आदीसह परिसरात गेल्या दहा दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी भरले जात नाही, तर वापराचे पाणी आणायची कुठून? असा प्रश्न महिलावर्गाला पडला आहे. इंदिरानगर भागात तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.नागरिकांमध्ये नाराजीनासर्डी ते पाथर्डी या परिसरात मुकणे धरणाचा पाणीपुरवठा सुरू झाला आहे. मात्र पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनाअभावी परिसरात कृत्रिम पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत असल्याची तक्र ार करण्यात येत आहे. पाणीकपात, कमी दाबाने पाणीपुरवठा करणे का सुरू आहे. पाणीकपात म्हणजे काय याचा खुलासा महापालिकेने करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा करून पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व व्हॉल्व्हमन नागरिकांना वेठीस धरीत आहे. त्यामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक वेळा तक्र ार करूनदेखील परिस्थिती ‘जैसे थे’च आहे.- रमाकांत अलई

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाwater shortageपाणीकपात