शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

नाशिकच्या ५० हून अधिक अनाथ बालकांची जबाबदारी स्वीकारली भारतीय जैन संघटनेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:11 IST

नाशिक : कोविडमुळे अनाथ झालेल्या किंवा एक पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. तसेच हे विद्यार्थी प्रचंड ...

नाशिक : कोविडमुळे अनाथ झालेल्या किंवा एक पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. तसेच हे विद्यार्थी प्रचंड तणावाखाली जीवन जगत आहेत. त्यांना दैनंदिन शिक्षणाबरोबरच मानसिक तणावातून बाहेर काढून मुख्य प्रवाहात आणत त्यांचा आत्मविश्वास वाढविणे, त्यांच्या स्वप्नांना साकारण्यासाठी सक्षम करण्याचे ध्येय निश्चित करून ७०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी भारतीय जैन संघटनेने स्वीकारली आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील ५० हून अधिक दुर्दैवी विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात येणार आहे.

भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) लातूर भूकंपातील १२०० भूकंपग्रस्त विद्यार्थी, मेळघाट व ठाण्यातील ११०० आदिवासी विद्यार्थी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे ७०० विद्यार्थी असे मागील ३० वर्षात एकूण ३००० विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून बाहेर काढून त्यांचे शैक्षणिक पुनर्वसन पूर्ण करून त्यांना एक कर्तबगार, जबाबदार व संवेदनशील नागरिक बनविण्याचे कार्य यशस्वीपणे केले आहे. आता भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील कोविडमुळे आई-वडिलांचे किंवा वडिलांचे किंवा आईचे छत्र हरपलेल्या इ. ५ वी ते १२ वीपर्यंत मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यममध्ये शिक्षण घेत असणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांची यादी घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या घरी जाऊन त्यांना पुणे येथे त्यांना शिक्षणासाठी पाठविण्याकरिता पालकांची संमती घेऊन जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेण्यात येणार आहे. बीजेएसच्या वाघोली, पुणे येथील शैक्षणिक संकुलातील मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये इ ५ वी ते ११ वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास प्रवेश देण्यात येणार असून त्याच संकुलात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, नाश्ता, भोजन, खेळ, अधिकचा अभ्यास, आरोग्य सेवा, मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला, विविध प्रकारच्या स्पर्धा इत्यादी सर्व बाबींची व्यवस्था उपलब्ध राहणार आहे. राज्यशासनाने शाळा व वसतिगृह सुरू केल्या नंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने पुढील शिक्षणासाठी त्यांना वाघोली पुणे येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती बीजेएसचे राज्य प्रभारी नंदकिशोर साखला, प्रकल्प प्रमुख दीपक चोपडा यांनी दिली. सदर प्रकल्पासाठी बीजेएस संस्थापक शांतीलाल मुथ्था, राज्य अध्यक्ष हस्तीमल बंब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रफुल्ल पारख, यतिश डुंगरवाल, ललित सुराणा, अभय ब्रह्मेचा, गोटू चोरडिया, अमित बोरा, गौतम हिरण, रोशन टाटीया, संदीप ललवाणी, रवी चोपडा, अतुल आचलिया, पंकज साखला, लोकेश कटारिया, मनीष शहा, संतोष चोरडिया आदी कार्यरत आहेत. अधिक माहिती साठी ८८३०७४२८०८ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

----------------------

इन्फो

जिल्ह्यात १४ बालकांनी गमावले दोन्ही पालक

जिल्ह्यात एकूण १४ बालकांनी दोन्ही पालक गमावले असून, १ ते १८ वयोगटातील एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या २८९ आहे. त्या २८९ मधील २७४ बालकांना पितृशोक तर १५ बालकांना मातृशोक सहन करावा लागला. त्यामुळे दोन्ही पालक गमावलेली बहुतांश मुले तसेच एक पालक गमावलेल्या बालकांमधून वाघोलीला राहून शिक्षणासाठी तयार असलेल्या एकूण सुमारे ५० मुलांना नाशिकहून पाठवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. आतापर्यंत ६ बालकांच्या कुटुंबीयांनी होकार दर्शवला असून, संबंधितांच्या घरांपर्यंत पोहोचून त्यांच्या परवानगीनंतर बालकांची अत्यंत चांगल्या दर्जाची शैक्षणिक आणि निवासासह सर्व जीवनावश्यक बाबींची सोय केली जाणार आहे.

नंदकिशोर सांखला, राज्य प्रभारी, बीजेएस

---------

फोटो

१९नंदकिशोर सांखला