शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या ५० हून अधिक अनाथ बालकांची जबाबदारी स्वीकारली भारतीय जैन संघटनेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:11 IST

नाशिक : कोविडमुळे अनाथ झालेल्या किंवा एक पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. तसेच हे विद्यार्थी प्रचंड ...

नाशिक : कोविडमुळे अनाथ झालेल्या किंवा एक पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. तसेच हे विद्यार्थी प्रचंड तणावाखाली जीवन जगत आहेत. त्यांना दैनंदिन शिक्षणाबरोबरच मानसिक तणावातून बाहेर काढून मुख्य प्रवाहात आणत त्यांचा आत्मविश्वास वाढविणे, त्यांच्या स्वप्नांना साकारण्यासाठी सक्षम करण्याचे ध्येय निश्चित करून ७०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी भारतीय जैन संघटनेने स्वीकारली आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील ५० हून अधिक दुर्दैवी विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात येणार आहे.

भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) लातूर भूकंपातील १२०० भूकंपग्रस्त विद्यार्थी, मेळघाट व ठाण्यातील ११०० आदिवासी विद्यार्थी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे ७०० विद्यार्थी असे मागील ३० वर्षात एकूण ३००० विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून बाहेर काढून त्यांचे शैक्षणिक पुनर्वसन पूर्ण करून त्यांना एक कर्तबगार, जबाबदार व संवेदनशील नागरिक बनविण्याचे कार्य यशस्वीपणे केले आहे. आता भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील कोविडमुळे आई-वडिलांचे किंवा वडिलांचे किंवा आईचे छत्र हरपलेल्या इ. ५ वी ते १२ वीपर्यंत मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यममध्ये शिक्षण घेत असणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांची यादी घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या घरी जाऊन त्यांना पुणे येथे त्यांना शिक्षणासाठी पाठविण्याकरिता पालकांची संमती घेऊन जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेण्यात येणार आहे. बीजेएसच्या वाघोली, पुणे येथील शैक्षणिक संकुलातील मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये इ ५ वी ते ११ वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास प्रवेश देण्यात येणार असून त्याच संकुलात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, नाश्ता, भोजन, खेळ, अधिकचा अभ्यास, आरोग्य सेवा, मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला, विविध प्रकारच्या स्पर्धा इत्यादी सर्व बाबींची व्यवस्था उपलब्ध राहणार आहे. राज्यशासनाने शाळा व वसतिगृह सुरू केल्या नंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने पुढील शिक्षणासाठी त्यांना वाघोली पुणे येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती बीजेएसचे राज्य प्रभारी नंदकिशोर साखला, प्रकल्प प्रमुख दीपक चोपडा यांनी दिली. सदर प्रकल्पासाठी बीजेएस संस्थापक शांतीलाल मुथ्था, राज्य अध्यक्ष हस्तीमल बंब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रफुल्ल पारख, यतिश डुंगरवाल, ललित सुराणा, अभय ब्रह्मेचा, गोटू चोरडिया, अमित बोरा, गौतम हिरण, रोशन टाटीया, संदीप ललवाणी, रवी चोपडा, अतुल आचलिया, पंकज साखला, लोकेश कटारिया, मनीष शहा, संतोष चोरडिया आदी कार्यरत आहेत. अधिक माहिती साठी ८८३०७४२८०८ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

----------------------

इन्फो

जिल्ह्यात १४ बालकांनी गमावले दोन्ही पालक

जिल्ह्यात एकूण १४ बालकांनी दोन्ही पालक गमावले असून, १ ते १८ वयोगटातील एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या २८९ आहे. त्या २८९ मधील २७४ बालकांना पितृशोक तर १५ बालकांना मातृशोक सहन करावा लागला. त्यामुळे दोन्ही पालक गमावलेली बहुतांश मुले तसेच एक पालक गमावलेल्या बालकांमधून वाघोलीला राहून शिक्षणासाठी तयार असलेल्या एकूण सुमारे ५० मुलांना नाशिकहून पाठवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. आतापर्यंत ६ बालकांच्या कुटुंबीयांनी होकार दर्शवला असून, संबंधितांच्या घरांपर्यंत पोहोचून त्यांच्या परवानगीनंतर बालकांची अत्यंत चांगल्या दर्जाची शैक्षणिक आणि निवासासह सर्व जीवनावश्यक बाबींची सोय केली जाणार आहे.

नंदकिशोर सांखला, राज्य प्रभारी, बीजेएस

---------

फोटो

१९नंदकिशोर सांखला