शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याचा वाढला भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 00:49 IST

नाशिक : सततच्या पावसामुळे दक्षिण भारतात कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने महाराष्टÑातील कांद्याला मागणी वाढली असून, मागील दहा ते १५ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर वाढले आहेत. मंगळवारी लासलगाव बाजार समितीत कांद्याला २५५६ रुपये सर्वाधिक, तर सरासरी दोन हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. डिसेंबरपर्यंत कांदा दराची ही स्थिती कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्दे दक्षिणेतील राज्यात नुकसान : नवीन पीक येईपर्यंत स्थिती कायम राहाणार

संजय दुनबळे।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सततच्या पावसामुळे दक्षिण भारतात कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने महाराष्टÑातील कांद्याला मागणी वाढली असून, मागील दहा ते १५ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर वाढले आहेत. मंगळवारी लासलगाव बाजार समितीत कांद्याला २५५६ रुपये सर्वाधिक, तर सरासरी दोन हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. डिसेंबरपर्यंत कांदा दराची ही स्थिती कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.मागील काही दिवसांपासून दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे दक्षिण भारतात सुमारे ४२ टक्के कांदा पिकाचे नुकसान झाले असून, तेथून होणारी आवक कमी झाली आहे. याशिवाय यावर्षी कांदा सडण्याचे प्रमाणही वाढले आहे. ज्या शेतकऱ्यांनी कांदा साठवणूक केली आहे तोही आता सडू लागला आहे.पोळ कांद्याची ज्या प्रमाणात लागवड होणे अपेक्षित होते त्या प्रमाणात झालेली नाही. महाराष्टÑात कांदा साठवणुकीची परंपरा असल्यामुळे सध्या महाराष्टÑातील शेतकऱ्यांकडे उन्हाळ कांदा शिल्लक आहे. मागणी आणि पुरवठा यातील तफावतीमुळे कांद्याचे दर वाढले असून, यामुळे शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.नवीन कांदा बाजारात येईपर्यंत कांदा दराची ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. कोरोना नसता तर कांद्याचे दर किमान तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत गेले असते, मात्र कोरोनामुळे दर काहीसे कमी आहेत. महाराष्टÑ आणि मध्य प्रदेशातील दोन ते तीन जिल्ह्यांमध्येच कांदा साठवणुकीची परंपरा असल्याने सध्या येथील शेतकºयांकडेच कांदा उपलब्ध आहे. नवीन माल येण्यासाठी किमान पाच ते साडेपाच महिन्यांचा कालावधी लागणार आहे.- नानासाहेब पाटील, संचालक, नाफेडपावसामुळे आंध्र, कर्नाटकमधील मालाचे नुकसान झाले आहे. याशिवाय आपल्याकडेही लागवडीवर परिणाम झाला आहे. यामुळे कांदा दरात वाढ झाली आहे. परतीचा पाऊस पडला तर कांदा दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.- ओमप्रकाश राका,निर्यातदार, लासलगावपंधरा दिवसांपासून कांद्याचे दर वाढले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. अर्ली लाल कांदा संपल्यामुळे दरवाढ झाली आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे यावर्षी व्यापाºयांकडेही कांद्याचा साठा नाही. जो काही कांदा आहे तो शेतकºयांकडेच उपलब्ध असल्याने दरवाढीचा शेतकºयांना थेट फायदा होणार आहे.- मनोज जैन, कांदा व्यापारी, लासलगाव

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डonionकांदा