शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
3
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
4
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
5
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
6
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
7
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
8
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
9
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
10
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
11
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
12
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
13
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
14
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
15
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
16
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
18
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
19
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
20
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!

युतीच्या इच्छुकांची वाढली घालमेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 00:52 IST

विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन नामांकन दाखल करण्यास अवघे पाच दिवस शिल्लक असतानाही भाजप-सेनेच्या युतीची अधिकृत घोषणा व त्याचबरोबर जागावाटपाची बोलणी पूर्ण होत नसल्याने दोन्ही पक्षांच्या इच्छुकांची घालमेल वाढली आहे.

नाशिक : विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन नामांकन दाखल करण्यास अवघे पाच दिवस शिल्लक असतानाही भाजप-सेनेच्या युतीची अधिकृत घोषणा व त्याचबरोबर जागावाटपाची बोलणी पूर्ण होत नसल्याने दोन्ही पक्षांच्या इच्छुकांची घालमेल वाढली आहे. जागा वाटपानंतरही ज्या मतदारसंघांमध्ये फेरबदलाची शक्यता आहे अशा मतदारसंघातील इच्छुकांना तर युती झाल्यास बरे, नाही झाले तर आणखी बरे असे वाटू लागले आहे.लोकसभा निवडणूक एकत्रित लढलेल्या भाजप-सेनेत लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राजकीय तणाव निर्माण झाला होता. परंतु अखेरच्या क्षणी युतीची घोषणा करून भाजप मोठा भाऊ, तर सेना लहान भाऊ म्हणून एकमेकांच्या साथीने निवडणुकीला सामोरे गेले. या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपला सेनेपेक्षाही अधिक यश मिळाल्याने प्रत्यक्ष केंद्रीय मंत्रिमंडळात सेनेच्या वाट्याला एकच मंत्रिपद मिळाल्याने सेनेत नाराजी व्यक्त केली. अशा परिस्थिती विधानसभा निवडणुकीत युती होते किंवा नाही अशी चर्चा गेल्या तीन महिन्यांपासून झडत असून, दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते मात्र युती होणारच असा दावा करीत असताना दुसरीकडे मात्र एकमेकांना अटी, शर्ती घालत आहेत. त्यामुळे अधून मधून युतीत ठिणग्या उडू लागल्या आहेत. सेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी जनआशीर्वाद यात्रा काढून राज्यातील जनतेकडे ‘मला आशीर्वाद देणार का’ असा सवाल करून आगामी राजकीय वाटचालीचे संकेत दिलेले तर जागोजागी त्यांच्या नावे ‘महाराष्टÑाचे भावी मुख्यमंत्री’ म्हणून पोस्टर्सही लावले गेले आहेत. अशा परिस्थितीत निवडणुकीची घोषणा होवूनही युतीची घोषणा व जागावाटप होत नसल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे. दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले तर अनेकांना संधी मिळू शकते मात्र युती झाली तर अनेकांना आहे तेथेच थांबावे लागणार आहे. नाशिक जिल्ह्यात २००९च्या जागावाटपात सेना मोठ्या भावाच्या भूमिकेत वावरल्याने जागावाटपात त्यांना दहा जागा, तर भाजप लहान असल्यामुळे त्यांना पाचच जागा देण्यात आल्या. गेल्या निवडणुकीत मात्र युती नसल्याने दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले चालू निवडणुकीत नेमके कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे अद्याप स्पष्ट होत नाही. भाजपने जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघातील सुमारे १७५ इच्छुकांच्या मुलाखती यापूर्वीच घेतल्या असून, सेनेनेही सर्वच मतदारसंघाचा आढावा घेऊन राजकीय गणिते तपासून पाहिली आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही पक्षांनी युती न झाल्यास लढण्याची तयारी केली असली तरी, अजूनही युती होईलच अशी दोन्ही पक्षांच्या इच्छुकांना वाटत आहे. विद्यमान परिस्थितीत पक्षाच्या आमदाराचे मतदारसंघ त्या पक्षाला सुटण्याची शक्यता असली तरी, नाशिक पश्चिम, नांदगाव, कळवण या तीन मतदारसंघाबाबत दोन्ही पक्षांकडून आग्रह आहे.अर्ज भरण्यास अवघे पाच दिवसनिवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा करून निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार शुक्रवार, दि. २७ सप्टेंबरपासून अर्ज दाखल केले जाणार आहेत. म्हणजेच पाचच दिवस शिल्लक असून, अशा परिस्थितीत युती व जागांची घोेषणा झाल्यास इच्छुकांना नामांकनासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यास कमी अवधी मिळणार आहे. परंतु हातावर हात ठेवण्यापलीकडे कोणताही पर्याय शिल्लक दिसत नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा