शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
2
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
3
Video - 'ते' आले अन् धारदार शस्त्रांनी केला हल्ला; हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येचे CCTV फुटेज
4
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
5
पाक क्रिकेटर बलात्कार प्रकरणात अडकला; पोलिसांनी मॅच सुरु असतानाच ठोकल्या बेड्या
6
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
7
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
8
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
9
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
10
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!
11
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
12
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
13
आरोग्याचा विषय जास्त महत्त्वाचा; पण कबुतरांबाबतही जाणिवा दाखवा : मंत्री लोढा
14
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
15
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
16
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
17
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
18
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
19
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
20
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम

जिल्ह्यातील निम्म्या धरणांतील साठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 01:51 IST

जिल्ह्यातील नाशिकसह येवला, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ या तालुक्यांत बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावल्याने निम्म्या धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, अद्यापही अन्य तालुक्यांमध्ये पावसाने ओढ दिलेली असल्याने ग्रामस्थांवर पाणीटंचाईसह बळीराजावरही दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

ठळक मुद्दे२५ टक्के पाणीसाठा : काही तालुक्यांत पावसाची प्रतीक्षा

नाशिक : जिल्ह्यातील नाशिकसह येवला, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ या तालुक्यांत बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावल्याने निम्म्या धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, अद्यापही अन्य तालुक्यांमध्ये पावसाने ओढ दिलेली असल्याने ग्रामस्थांवर पाणीटंचाईसह बळीराजावरही दुबार पेरणीचेसंकट ओढवले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३६.८४ टक्के पावसाची नोंद झाली असून, धरणांतील पाणीसाठा २५ टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे.जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात नाशिक, इगतपुरी, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, सिन्नर आणि येवला या तालुक्यात बºयापैकी पावसाची नोंद झालेली आहे. विशेष म्हणजे कायम दुष्काळी असलेल्या येवला तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक २५० मि.मी. म्हणजे ५७.६७ टक्के पावसाची नोंद झालेली आहे. त्याखालोखाल नाशिक (६५.४० टक्के), इगतपुरी (४५.४७ टक्के), दिंडोरी (३४.३४ टक्के), पेठ (४१.५५ टक्के), त्र्यंबकेश्वर (४४.५३ टक्के), सुरगाणा (३१.०७ टक्के), निफाड (५७.६७ टक्के) याप्रमाणे पाऊस पडलेला आहे. तर मालेगाव (२७ टक्के), नांदगाव (११.५६ टक्के), चांदवड (१३.७० टक्के), कळवण (७.२३ टक्के), बागलाण (२५.७६ टक्के), देवळा (९.०२ टक्के), निफाड (२९.६२ टक्के) या तालुक्यांत पावसाची प्रतीक्षा कायम आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ३६.८४ टक्के पावसाची नोंद झालेली असून, मागील वर्षी याच कालावधीत ४७ टक्के पाऊस झालेला होता. जिल्ह्यात कळवण आणि देवळा तालुक्यात भीषण परिस्थिती आहे. तेथे पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणीचे मोठे संकट येऊन ठेपले आहे. जिल्ह्यात काही तालुक्यात बºयापैकी पावसाची नोंद झाल्याने धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. मात्र, करंजवण, वाघाड, ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव, भोजापूर, चणकापूर, हरणबारी, केळझर, नागासाक्या, गिरणा, पुनंद आणि माणिकपुंज या धरणातील पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे या भागातील पाणीटंचाई अधिक तीव्र बनत चालली आहे.नांदूरमधमेश्वरमध्ये सर्वाधिक साठाजिल्ह्यातील निम्म्या धरणांतील पाणीसाठ्यात बºयापैकी वाढ झालेली आहे. त्यात नांदूरमधमेश्वर प्रकल्प ९८ टक्के भरले आहे. त्याखालोखाल भावली (८० टक्के), दारणा (७१ टक्के), वालदेवी (५७ टक्के), गंगापूर (५४ टक्के), कडवा (५२ टक्के), गौतमी गोदावरी (३७ टक्के), काश्यपी (३५ टक्के), आळंदी (३० टक्के), मुकणे (२३ टक्के) याप्रमाणे पाणीसाठा वाढला आहे. पुणेगाव, तिसगाव, भोजापूर, चणकापूर, केळझर, माणिकपुंज हे प्रकल्प अद्यापही कोरडेठाक पडलेले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी