शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
8
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
9
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
10
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
11
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
12
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
13
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
14
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
15
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
16
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
18
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
19
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
20
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील निम्म्या धरणांतील साठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 01:51 IST

जिल्ह्यातील नाशिकसह येवला, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ या तालुक्यांत बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावल्याने निम्म्या धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, अद्यापही अन्य तालुक्यांमध्ये पावसाने ओढ दिलेली असल्याने ग्रामस्थांवर पाणीटंचाईसह बळीराजावरही दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

ठळक मुद्दे२५ टक्के पाणीसाठा : काही तालुक्यांत पावसाची प्रतीक्षा

नाशिक : जिल्ह्यातील नाशिकसह येवला, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ या तालुक्यांत बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावल्याने निम्म्या धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, अद्यापही अन्य तालुक्यांमध्ये पावसाने ओढ दिलेली असल्याने ग्रामस्थांवर पाणीटंचाईसह बळीराजावरही दुबार पेरणीचेसंकट ओढवले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३६.८४ टक्के पावसाची नोंद झाली असून, धरणांतील पाणीसाठा २५ टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे.जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात नाशिक, इगतपुरी, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, सिन्नर आणि येवला या तालुक्यात बºयापैकी पावसाची नोंद झालेली आहे. विशेष म्हणजे कायम दुष्काळी असलेल्या येवला तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक २५० मि.मी. म्हणजे ५७.६७ टक्के पावसाची नोंद झालेली आहे. त्याखालोखाल नाशिक (६५.४० टक्के), इगतपुरी (४५.४७ टक्के), दिंडोरी (३४.३४ टक्के), पेठ (४१.५५ टक्के), त्र्यंबकेश्वर (४४.५३ टक्के), सुरगाणा (३१.०७ टक्के), निफाड (५७.६७ टक्के) याप्रमाणे पाऊस पडलेला आहे. तर मालेगाव (२७ टक्के), नांदगाव (११.५६ टक्के), चांदवड (१३.७० टक्के), कळवण (७.२३ टक्के), बागलाण (२५.७६ टक्के), देवळा (९.०२ टक्के), निफाड (२९.६२ टक्के) या तालुक्यांत पावसाची प्रतीक्षा कायम आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ३६.८४ टक्के पावसाची नोंद झालेली असून, मागील वर्षी याच कालावधीत ४७ टक्के पाऊस झालेला होता. जिल्ह्यात कळवण आणि देवळा तालुक्यात भीषण परिस्थिती आहे. तेथे पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणीचे मोठे संकट येऊन ठेपले आहे. जिल्ह्यात काही तालुक्यात बºयापैकी पावसाची नोंद झाल्याने धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. मात्र, करंजवण, वाघाड, ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव, भोजापूर, चणकापूर, हरणबारी, केळझर, नागासाक्या, गिरणा, पुनंद आणि माणिकपुंज या धरणातील पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे या भागातील पाणीटंचाई अधिक तीव्र बनत चालली आहे.नांदूरमधमेश्वरमध्ये सर्वाधिक साठाजिल्ह्यातील निम्म्या धरणांतील पाणीसाठ्यात बºयापैकी वाढ झालेली आहे. त्यात नांदूरमधमेश्वर प्रकल्प ९८ टक्के भरले आहे. त्याखालोखाल भावली (८० टक्के), दारणा (७१ टक्के), वालदेवी (५७ टक्के), गंगापूर (५४ टक्के), कडवा (५२ टक्के), गौतमी गोदावरी (३७ टक्के), काश्यपी (३५ टक्के), आळंदी (३० टक्के), मुकणे (२३ टक्के) याप्रमाणे पाणीसाठा वाढला आहे. पुणेगाव, तिसगाव, भोजापूर, चणकापूर, केळझर, माणिकपुंज हे प्रकल्प अद्यापही कोरडेठाक पडलेले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी