शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा UNGA मध्ये मोठा आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
4
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
5
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
6
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
7
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
8
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
9
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
10
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
11
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
12
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
13
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
14
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
15
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
16
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
17
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
18
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
20
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका

जिल्ह्यातील निम्म्या धरणांतील साठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 01:51 IST

जिल्ह्यातील नाशिकसह येवला, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ या तालुक्यांत बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावल्याने निम्म्या धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, अद्यापही अन्य तालुक्यांमध्ये पावसाने ओढ दिलेली असल्याने ग्रामस्थांवर पाणीटंचाईसह बळीराजावरही दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

ठळक मुद्दे२५ टक्के पाणीसाठा : काही तालुक्यांत पावसाची प्रतीक्षा

नाशिक : जिल्ह्यातील नाशिकसह येवला, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ या तालुक्यांत बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावल्याने निम्म्या धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, अद्यापही अन्य तालुक्यांमध्ये पावसाने ओढ दिलेली असल्याने ग्रामस्थांवर पाणीटंचाईसह बळीराजावरही दुबार पेरणीचेसंकट ओढवले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३६.८४ टक्के पावसाची नोंद झाली असून, धरणांतील पाणीसाठा २५ टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे.जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात नाशिक, इगतपुरी, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, सिन्नर आणि येवला या तालुक्यात बºयापैकी पावसाची नोंद झालेली आहे. विशेष म्हणजे कायम दुष्काळी असलेल्या येवला तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक २५० मि.मी. म्हणजे ५७.६७ टक्के पावसाची नोंद झालेली आहे. त्याखालोखाल नाशिक (६५.४० टक्के), इगतपुरी (४५.४७ टक्के), दिंडोरी (३४.३४ टक्के), पेठ (४१.५५ टक्के), त्र्यंबकेश्वर (४४.५३ टक्के), सुरगाणा (३१.०७ टक्के), निफाड (५७.६७ टक्के) याप्रमाणे पाऊस पडलेला आहे. तर मालेगाव (२७ टक्के), नांदगाव (११.५६ टक्के), चांदवड (१३.७० टक्के), कळवण (७.२३ टक्के), बागलाण (२५.७६ टक्के), देवळा (९.०२ टक्के), निफाड (२९.६२ टक्के) या तालुक्यांत पावसाची प्रतीक्षा कायम आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ३६.८४ टक्के पावसाची नोंद झालेली असून, मागील वर्षी याच कालावधीत ४७ टक्के पाऊस झालेला होता. जिल्ह्यात कळवण आणि देवळा तालुक्यात भीषण परिस्थिती आहे. तेथे पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणीचे मोठे संकट येऊन ठेपले आहे. जिल्ह्यात काही तालुक्यात बºयापैकी पावसाची नोंद झाल्याने धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. मात्र, करंजवण, वाघाड, ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव, भोजापूर, चणकापूर, हरणबारी, केळझर, नागासाक्या, गिरणा, पुनंद आणि माणिकपुंज या धरणातील पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे या भागातील पाणीटंचाई अधिक तीव्र बनत चालली आहे.नांदूरमधमेश्वरमध्ये सर्वाधिक साठाजिल्ह्यातील निम्म्या धरणांतील पाणीसाठ्यात बºयापैकी वाढ झालेली आहे. त्यात नांदूरमधमेश्वर प्रकल्प ९८ टक्के भरले आहे. त्याखालोखाल भावली (८० टक्के), दारणा (७१ टक्के), वालदेवी (५७ टक्के), गंगापूर (५४ टक्के), कडवा (५२ टक्के), गौतमी गोदावरी (३७ टक्के), काश्यपी (३५ टक्के), आळंदी (३० टक्के), मुकणे (२३ टक्के) याप्रमाणे पाणीसाठा वाढला आहे. पुणेगाव, तिसगाव, भोजापूर, चणकापूर, केळझर, माणिकपुंज हे प्रकल्प अद्यापही कोरडेठाक पडलेले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी