शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

साथीच्या आजारांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 23:04 IST

इगतपुरी : तालुक्यातील बहुतांश भागात विविध आजाराचे प्रमाण वाढले आहे. इगतपुरी, घोटी शहर आणि महामार्गावरील अनेक गावांत तुंबलेल्या गटारी, हॉटेलांतील खरकटे अन्न आणि कचऱ्याच्या ढिगांमुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे रोगराईत वाढ झाली आहे. नागरिकही आरोग्याबाबत उदासीन असल्याने खासगी दवाखाने, सरकारी दवाखान्यांत रुग्णसंख्या वाढली आहे.

ठळक मुद्दे दवाखान्यांमध्ये गर्दी : इगतपुरी, पेठ तालुक्यात उघडिपीनंतर वाढले रु ग्ण

इगतपुरी : तालुक्यातील बहुतांश भागात विविध आजाराचे प्रमाण वाढले आहे. इगतपुरी, घोटी शहर आणि महामार्गावरील अनेक गावांत तुंबलेल्या गटारी, हॉटेलांतील खरकटे अन्न आणि कचऱ्याच्या ढिगांमुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे रोगराईत वाढ झाली आहे. नागरिकही आरोग्याबाबत उदासीन असल्याने खासगी दवाखाने, सरकारी दवाखान्यांत रुग्णसंख्या वाढली आहे.घोटी शहरातील कचरा महामार्गालगत फेकला जातो. या कचºयाची प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. ओला-सुका कचरा आणून टाकला जात असून, परिसरात दुर्गंधीने नागरिक हैराण झाले आहेत. यासह डासांचे प्रमाणही चिंताजनक वाढले आहे.नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, हवेतील संसर्गजन्य आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ग्रामीण भागातही विविध रुग्णांची संख्या वाढल्याने त्यामुळे भीती व्यक्त होत आहे.कचºयाच्या ठिकाणी भटकी कुत्रीही गोळा होतात.त्यामुळे त्यांचाही येणाºया - जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.अनेकवेळा कुत्री मागेही लागतात. त्यामुळे त्यांच्याकडेमोठा धोका आहे. मासळी मार्केट ठिकाणी गलिच्छ जागेत आणि गटारावर डास वाढले असून, दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर रूप धारण करण्याची शक्यता आहे.तुंबलेल्या पाण्यामुळे संसर्गजन्य ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, त्वचाविकार यांनी नागरिकांना घेरले आहे. पाणी तुंबलेल्या भागात संसर्गजन्य तापाचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे.पावसानंतर थंडीताप,अतिसार, मलेरिया, टायफॉइड तसेच रक्तातील पेशींचे कमी अधिक प्रमाण यामुळे सगळीकडे समाज आजारी आहे.पावसानंतर आता सूर्यनारायण दर्शन देत असून, शेतीची कामे प्रगतिपथावर आहेत. त्यातच आजारपणामुळे खतांसाठी पैसे कमवायचे की औषधासाठी पैसे द्यायचे, हा पेचप्रसंग सामान्य शेतकºयांना पडला आहे.पावसानंतर आरोग्य व्यवस्थेसमोर यामुळे आव्हानउभे राहिले आहे. रोगराई निर्मूलनासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीने कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.थंडीताप, सर्दीच्या रुग्णसंख्येत वाढपेठ : तालुक्यात झालेल्या पावसाच्या उघडिपीनंतर बदललेल्या हवामानामुळे साथीच्या रोगांनी डोके वर काढले असून, थंडीतापाच्या रु ग्णांत मोठी वाढ झाली आहे. पेठ येथे ग्रामीण रु ग्णालय असून, तालुक्यात एकच ग्रामीण रुग्णालय असल्याने मोठ्या प्रमाणावर रुग्णांच्या दाखल होत आहेत. त्यात वैद्यकीय अधिकाºयांची पदे रिक्त असल्याने यंत्रणेवर ताण पडत असून, ग्रामीण रुग्णालयात रांगा लागत आहेत. थंडीताप, डेंग्यूसारखे आजार वाढत आहेत.नागरिकांनी थंडी-तापासारखी लक्षणे आढळल्यास आपल्या फॅमिली डॉक्टरांना दाखवून घ्यावे. जेणेकरून मलेरिया-टायफॉइडसारखे आजार टाळता येतील. पाणी उकळून प्यावे अथवा पाण्यात निर्जंतुकीकरण करणारे ड्रॉप वापरावे. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.- पंढरीनाथ काळे,ग्रामस्थ, पिंपळगाव मोरइगतपुरी तालुक्यात आजारांचे प्रमाण वाढलेले नाही. नियमित स्वरूपातील रु ग्णांची संख्या स्थिर आहे. स्वच्छता आणि पाणी याची काळजी घेतल्यास आजारांवर नियंत्रण मिळविता येते. तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सतर्कअसून, औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. आरोग्य कर्मचारी सतर्क आहे.- डॉ. एम.बी. देशमुख,आरोग्य अधिकारी, इगतपुरीआजाराच्या प्रतिबंधासाठी घ्यावयाची काळजीकचरा शक्यतो उघड्यावर टाकू नये.निकामी टायर, बाटल्या, करवंट्या, भंगार निकाली काढा.पाण्याच्या टाक्यांना झाकणे लावा.गच्चीवर साचलेले पाणी काढा, परिसरातील डबकी बुजवा.जनावरांच्या गोठ्याशेजारी धूर करावा.