शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

साथीच्या आजारांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 23:04 IST

इगतपुरी : तालुक्यातील बहुतांश भागात विविध आजाराचे प्रमाण वाढले आहे. इगतपुरी, घोटी शहर आणि महामार्गावरील अनेक गावांत तुंबलेल्या गटारी, हॉटेलांतील खरकटे अन्न आणि कचऱ्याच्या ढिगांमुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे रोगराईत वाढ झाली आहे. नागरिकही आरोग्याबाबत उदासीन असल्याने खासगी दवाखाने, सरकारी दवाखान्यांत रुग्णसंख्या वाढली आहे.

ठळक मुद्दे दवाखान्यांमध्ये गर्दी : इगतपुरी, पेठ तालुक्यात उघडिपीनंतर वाढले रु ग्ण

इगतपुरी : तालुक्यातील बहुतांश भागात विविध आजाराचे प्रमाण वाढले आहे. इगतपुरी, घोटी शहर आणि महामार्गावरील अनेक गावांत तुंबलेल्या गटारी, हॉटेलांतील खरकटे अन्न आणि कचऱ्याच्या ढिगांमुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे रोगराईत वाढ झाली आहे. नागरिकही आरोग्याबाबत उदासीन असल्याने खासगी दवाखाने, सरकारी दवाखान्यांत रुग्णसंख्या वाढली आहे.घोटी शहरातील कचरा महामार्गालगत फेकला जातो. या कचºयाची प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. ओला-सुका कचरा आणून टाकला जात असून, परिसरात दुर्गंधीने नागरिक हैराण झाले आहेत. यासह डासांचे प्रमाणही चिंताजनक वाढले आहे.नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, हवेतील संसर्गजन्य आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ग्रामीण भागातही विविध रुग्णांची संख्या वाढल्याने त्यामुळे भीती व्यक्त होत आहे.कचºयाच्या ठिकाणी भटकी कुत्रीही गोळा होतात.त्यामुळे त्यांचाही येणाºया - जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.अनेकवेळा कुत्री मागेही लागतात. त्यामुळे त्यांच्याकडेमोठा धोका आहे. मासळी मार्केट ठिकाणी गलिच्छ जागेत आणि गटारावर डास वाढले असून, दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर रूप धारण करण्याची शक्यता आहे.तुंबलेल्या पाण्यामुळे संसर्गजन्य ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, त्वचाविकार यांनी नागरिकांना घेरले आहे. पाणी तुंबलेल्या भागात संसर्गजन्य तापाचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे.पावसानंतर थंडीताप,अतिसार, मलेरिया, टायफॉइड तसेच रक्तातील पेशींचे कमी अधिक प्रमाण यामुळे सगळीकडे समाज आजारी आहे.पावसानंतर आता सूर्यनारायण दर्शन देत असून, शेतीची कामे प्रगतिपथावर आहेत. त्यातच आजारपणामुळे खतांसाठी पैसे कमवायचे की औषधासाठी पैसे द्यायचे, हा पेचप्रसंग सामान्य शेतकºयांना पडला आहे.पावसानंतर आरोग्य व्यवस्थेसमोर यामुळे आव्हानउभे राहिले आहे. रोगराई निर्मूलनासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीने कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.थंडीताप, सर्दीच्या रुग्णसंख्येत वाढपेठ : तालुक्यात झालेल्या पावसाच्या उघडिपीनंतर बदललेल्या हवामानामुळे साथीच्या रोगांनी डोके वर काढले असून, थंडीतापाच्या रु ग्णांत मोठी वाढ झाली आहे. पेठ येथे ग्रामीण रु ग्णालय असून, तालुक्यात एकच ग्रामीण रुग्णालय असल्याने मोठ्या प्रमाणावर रुग्णांच्या दाखल होत आहेत. त्यात वैद्यकीय अधिकाºयांची पदे रिक्त असल्याने यंत्रणेवर ताण पडत असून, ग्रामीण रुग्णालयात रांगा लागत आहेत. थंडीताप, डेंग्यूसारखे आजार वाढत आहेत.नागरिकांनी थंडी-तापासारखी लक्षणे आढळल्यास आपल्या फॅमिली डॉक्टरांना दाखवून घ्यावे. जेणेकरून मलेरिया-टायफॉइडसारखे आजार टाळता येतील. पाणी उकळून प्यावे अथवा पाण्यात निर्जंतुकीकरण करणारे ड्रॉप वापरावे. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.- पंढरीनाथ काळे,ग्रामस्थ, पिंपळगाव मोरइगतपुरी तालुक्यात आजारांचे प्रमाण वाढलेले नाही. नियमित स्वरूपातील रु ग्णांची संख्या स्थिर आहे. स्वच्छता आणि पाणी याची काळजी घेतल्यास आजारांवर नियंत्रण मिळविता येते. तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सतर्कअसून, औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. आरोग्य कर्मचारी सतर्क आहे.- डॉ. एम.बी. देशमुख,आरोग्य अधिकारी, इगतपुरीआजाराच्या प्रतिबंधासाठी घ्यावयाची काळजीकचरा शक्यतो उघड्यावर टाकू नये.निकामी टायर, बाटल्या, करवंट्या, भंगार निकाली काढा.पाण्याच्या टाक्यांना झाकणे लावा.गच्चीवर साचलेले पाणी काढा, परिसरातील डबकी बुजवा.जनावरांच्या गोठ्याशेजारी धूर करावा.