शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

कांदा चाळीचे पंचनामे करून अनुदान वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 10:28 PM

कळवण : शरद पवारांसह उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांचे साकडेकळवण : बाजारभाव मिळेल या अपेक्षेने चाळीत साठवून ठेवलेला कांदा आता कोंब फुटून सडू लागल्याने जिल्ह्यातील कांदा चाळींच्या सद्यस्थितीचे कृषी व महसूल विभागाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी तसेच शासनाने जाहीर केलेल्या कांदा अनुदानाची मुदत व अनुदानाची रक्कम वाढवून द्यावी, अशी सूचना शासनाला करावी, याकरिता राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साकडे घालण्यात आले आहे.

ठळक मुद्देकांद्याचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात

कळवण : शरद पवारांसह उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांचे साकडेकळवण : बाजारभाव मिळेल या अपेक्षेने चाळीत साठवून ठेवलेला कांदा आता कोंब फुटून सडू लागल्याने जिल्ह्यातील कांदा चाळींच्या सद्यस्थितीचे कृषी व महसूल विभागाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी तसेच शासनाने जाहीर केलेल्या कांदा अनुदानाची मुदत व अनुदानाची रक्कम वाढवून द्यावी, अशी सूचना शासनाला करावी, याकरिता राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साकडे घालण्यात आले आहे.माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, प्रशांत गायकवाड यांनी, तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी कांदाप्रश्नी लक्ष घालण्याची मागणी केली आहे. पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दुष्काळी स्थितीत शेतकºयांनी कांद्याचे उत्पादन घेतले. प्रसंगी टँकरच्या पाण्यावर पीक जगवले. मात्र कांद्याचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.यादरम्यान दिवाळी व इतर सण, उत्सव असल्याने अनेक बाजार समित्या काही दिवस बंद होत्या. शेतकºयांनीही कमी प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला होता. कांद्याचा एकरी उत्पादन खर्च ४० हजार रुपयांपर्यंत येतो. सध्या बाजारात कांद्याला मिळणारे दर पाहता शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघू शकत नाही. भाव मिळत नसल्याने शेतकºयांनी तो चाळींमध्ये साठवून ठेवला आहे.हवामानातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात कांदा खराब झाला आहे. त्यामुळे योग्य दर मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेले व चाळीत कांदा साठवून ठेवलेले शेतकरी या अनुदानापासून वंचित राहू शकतात. कांद्याला अनुदान जाहीर केल्यानंतर कांद्याचे दर आणखी गडगडले आहेत. त्यामुळे सरकारने फेब्रुवारी २०१९पर्यंत विक्री केल्या जाणाºया कांद्याला किमान पाच रु पये प्रतिकिलो अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. उन्हाळी कांदा संपेपर्यंत अनुदान द्या; सरकारकडून तुटपुंजे अनुदान जाहीर झाल्याने संताप कळवण तालुक्यातील गेल्या वर्षी पिकवलेला उन्हाळी (गावठी) कांदा शेतकºयांकडील संपत नाही तोपर्यंत शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ठाकरे यांच्याकडे लवकरच शेतकºयांचीकैफियत मांडण्यात येणार असल्याचे कळवण बाजार समितीचे संचालक शीतलकुमार अहिरे यांनी सांगितले.कांदा उत्पादक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी सरकारने१ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान कांदा विक्री केलेल्या शेतकºयांना तुटपुंजे असे २ रु पये प्रतिकिलो अनुदान जाहीर केले आहे. या अनुदानातून शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघू शकत नाही. कांदाविक्री केल्याचा कालावधी अतिशय कमी आहे.