शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
3
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
4
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
5
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
6
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
7
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!
8
Viral Video: हत्तीला पाहून सिंह मंडळींची 'हवा टाइट'... झाडाखाली बसले असताना काय घडलं, पाहा
9
थेट मंत्र्यांच्या ताफ्यालाच पाठलाग करून अडवले, वादावादी, कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न, कारण काय?
10
Powai Hostage: रोहित आर्या प्रकरणातील नवी माहिती, मुलांसोबत ऑडिशनसाठी गेलेले पालक म्हणाले...
11
Abhishek Sharma Record Breaking Fifty : जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं अभिषेक शर्माची विक्रमी खेळी
12
Rohit Arya: रोहित आर्याला मी वेगळे पैसे दिलेले, सरकारी बिलाशी संबंध नाही; दीपक केसरकरांची सारवासारव
13
प्रेयसीचा शो पाहण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे सरकारी विमान वापरलं; काश पटेल वादाच्या भोवऱ्यात
14
कंडोम बनवणाऱ्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; 2 महिन्यातच दिला बंपर परतावा!
15
तेलंगणामध्ये मोंथा वादळाचा कहर, १२ जणांचा मृत्यू; मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी, रस्तेही बंद
16
कोणता झेंडा घेऊ हाती अशी मनसैनिकांची अवस्था, राज ठाकरे कन्फ्यूज नेते; शिंदेसेनेची बोचरी टीका
17
Lenskart IPO: महागडा आहे का लेन्सकार्टचा आयपीओ? व्हॅल्यूएशनवरुन उपस्थित होताहेत प्रश्न, एक्सपर्ट म्हणाले...
18
अँड्रॉइड की अ‍ॅपल, मोबाईल घोटाळे रोखण्यात कोणती सिस्टीम चांगली? गुगलने केला धक्कादायक खुलासा
19
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
20
सौदी अरेबिया फिफा विश्वचषकासाठी बांधणार 'स्काय स्टेडियम'; व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा?

धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 18:31 IST

गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने सुरूवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून दुबार पेरणीचे संकट टळले आहे. जिल्ह्यातील धरणसाठ्यांमध्ये वाढ होत आहे. दिंडोरी तालुक्यात धरणांचे पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने तीन धरणे पूर्ण क्षमतेने भरले असून उर्वरीत तीन धरणांमध्ये समाधानकारक साठा झाला आहे.

ठळक मुद्देवाघाड ओव्हरफ्लो : करंजवण फुल्ल तर पुणेगाव नव्वदी पार

दिंडोरी : गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने सुरूवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून दुबार पेरणीचे संकट टळले आहे. जिल्ह्यातील धरणसाठ्यांमध्ये वाढ होत आहे. दिंडोरी तालुक्यात धरणांचे पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने तीन धरणे पूर्ण क्षमतेने भरले असून उर्वरीत तीन धरणांमध्ये समाधानकारक साठा झाला आहे.दिंडोरी तालुक्यातील पुणेगाव व करंजवण हे तीन धरणं ९० टक्के पेक्षा जास्त भरले असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. वाघाड ओवरफ्लो झाले असून त्यातून सुमारे १४७७ क्यूसेस पुर पाण्याचा प्रवाह सुरू आहे. करंजवन धरण ९५ टक्के भरले असून १६०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग कादवा नदीद्वारे पालखेड धरणात सोडले आहे. पुणेगाव ८८ टक्के भरले असून त्यातून ८५० क्यूसेस उनंदा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.तर ओझरखेड ८८ टक्के भरले आहे तिसगाव ४४ टक्के भरले आहे तर पालखेड धरणात ६१ टक्के झाला असून कादवा नदी व डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. धरणसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पावसाचा जोर वाढल्यास परिस्थिती नुरूप विविध धरणातून पााण्याचा विसर्ग करावा लागणार असल्याने,नदी काठच्या नागरिकांनी पाण्याच्या प्रवाहात जावू नये व सतर्क रहावे असे आवाहन तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी केले आहे.बागलाण तालुक्यात समाधानकारक पाऊस, शेतकºयांमध्ये समाधानबागलाण तालुक्यातील ग्रामीण भागात पहिल्यादांच दोन माहिन्यानंतर समाधान कारक पाऊस होऊन आरम नदीला पुर आला. मात्र मुंजवाड गांवाजवळील हया पुलावर कठडे नसल्याने अद्याप बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असुन रात्री बेरात्री पाण्यामुळे मोठा धोका होण्याची शक्यता असुनह्या विभागाने पुलावरील मजबुत कठडे बांधुन दुरर्स्ती करावी अशी मागणी माजी उपसरपंच हरिकांत सुर्यवंशी यांनी केली आहे.ोथील परिसरात पहिल्यादांच समाधान कारक पाऊस झाला, अन्यथा पिके वाया जान्याची भिती होती. मात्र हा पुल हा सुमारे वर्षापासुनचा असुन पुर्ण जीर्ण अवस्थेत आहे. पुलाचे दोन्ही बाजुकडील सिमेटचे व लोखंडी पाईपचे कठडे तुटले असुन पुलाची दुरावस्था झााली आहे. येथील पुलावरु न वाहनाची मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. आदिवासी भागातील सुमारे ३८ खेड्यांना जोडणारा हा पुलावरील रस्ता आहे. सटाणा डांगसौदाणेकडून जाणाºया व येणारे वाहने या पुलावरु न येतात हा पुल सुमारे १९६९ मध्ये बांधण्यात आला आहे परंतु सुमारे ४७ वर्षानंतर हा पुल धोकादायक होत असुन पंधरा दिवसापुर्वी चोरट्यानी सिमेंटचे कठडे तोडले.

टॅग्स :RainपाऊसIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प