शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

पाण्यासाठी अधिग्रहीत विहिरींच्या मोबदल्यात वाढ

By श्याम बागुल | Updated: December 1, 2018 18:22 IST

दा राज्यात कमी पर्जन्यमान झाल्याने आॅक्टोबर महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली असून, सरकारच्या वतीने टंचाईचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. परंतु टंचाईग्रस्त गावांत पिण्याच्या पाण्याचा स्रोतच नसेल तर अशावेळी गावाच्या लगत असलेल्या खासगी विहिरी अधिग्रहीत करून त्यातील

नाशिक : उन्हाळ्यात भेडसाविणाऱ्या पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी गावोगावच्या खासगी विहिरी अधिग्रहीत करून त्या माध्यमातून ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात असताना त्यासाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या विहिरींच्या मालकांना मोबदला वाढवून देण्यास राज्य सरकारने अनुमती दिली आहे. पूर्वी तीनशे रुपयांपर्यंत असलेल्या मोबदल्यात आता दीडशे ते दोनशे रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

यंदा राज्यात कमी पर्जन्यमान झाल्याने आॅक्टोबर महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली असून, सरकारच्या वतीने टंचाईचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. परंतु टंचाईग्रस्त गावांत पिण्याच्या पाण्याचा स्रोतच नसेल तर अशावेळी गावाच्या लगत असलेल्या खासगी विहिरी अधिग्रहीत करून त्यातील पाणी गावकºयांना पुरविले जात आहे. यासाठी शासनाने यापूर्वीच कायदा करून घेतला असून, प्रसंगी त्याचा वापर केला जातो. खासगी मालकांच्या विहिरी अधिग्रहीत करून त्यातील पाणी वापरण्याच्या मोबदल्यात पैसेही अदा करण्याची तरतूद या कायद्यात आहे. परंतु शासनाकडून पाण्याच्या बदल्यात अल्प मोबदला दिला जात असल्यामुळे ग्रामीण भागातील विहीरमालक पाणी देण्यास नकार देत. त्यावरून वादावादीचे प्रसंग उद्भवत असल्याने विहीरमालकाकडून जादा मोबदल्याची मागणी केली जात होती. सध्या ज्या खासगी विहिरीवर विद्युत पंप, डिझेल पंपाची सोय नसेल त्याला तीनशे रुपये, तर पाणी उपसा करण्यासाठी सर्व प्रकारची सोय उपलब्ध करून देणाºयास चारशे रुपये प्रतिदिन मोबदला दिला जातो. यंदा उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे आत्तापासूनच दिसू लागले आहे. अशा परिस्थितीत मिळेल त्या ठिकाणाहून पाण्याची व्यवस्था करण्याला सरकारने प्राधान्य दिले आहे. त्यामुळे खासगी विहिरी अधिग्रहीत करण्यावरही भर दिला जाणार असल्याने विहीरमालकांना राजी करण्यासाठी मोबदला वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या विहिरीवर विद्युत पंप वा डिझेल पंप नसेल तर त्यासाठी ४५० रुपये व सोय असेल, तर ६०० रुपये प्रतिदिन देण्यात येणार आहे. या संदर्भात शासनाने आदेश जारी केले आहेत.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक