शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

पाण्यासाठी अधिग्रहीत विहिरींच्या मोबदल्यात वाढ

By श्याम बागुल | Updated: December 1, 2018 18:22 IST

दा राज्यात कमी पर्जन्यमान झाल्याने आॅक्टोबर महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली असून, सरकारच्या वतीने टंचाईचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. परंतु टंचाईग्रस्त गावांत पिण्याच्या पाण्याचा स्रोतच नसेल तर अशावेळी गावाच्या लगत असलेल्या खासगी विहिरी अधिग्रहीत करून त्यातील

नाशिक : उन्हाळ्यात भेडसाविणाऱ्या पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी गावोगावच्या खासगी विहिरी अधिग्रहीत करून त्या माध्यमातून ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात असताना त्यासाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या विहिरींच्या मालकांना मोबदला वाढवून देण्यास राज्य सरकारने अनुमती दिली आहे. पूर्वी तीनशे रुपयांपर्यंत असलेल्या मोबदल्यात आता दीडशे ते दोनशे रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

यंदा राज्यात कमी पर्जन्यमान झाल्याने आॅक्टोबर महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली असून, सरकारच्या वतीने टंचाईचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. परंतु टंचाईग्रस्त गावांत पिण्याच्या पाण्याचा स्रोतच नसेल तर अशावेळी गावाच्या लगत असलेल्या खासगी विहिरी अधिग्रहीत करून त्यातील पाणी गावकºयांना पुरविले जात आहे. यासाठी शासनाने यापूर्वीच कायदा करून घेतला असून, प्रसंगी त्याचा वापर केला जातो. खासगी मालकांच्या विहिरी अधिग्रहीत करून त्यातील पाणी वापरण्याच्या मोबदल्यात पैसेही अदा करण्याची तरतूद या कायद्यात आहे. परंतु शासनाकडून पाण्याच्या बदल्यात अल्प मोबदला दिला जात असल्यामुळे ग्रामीण भागातील विहीरमालक पाणी देण्यास नकार देत. त्यावरून वादावादीचे प्रसंग उद्भवत असल्याने विहीरमालकाकडून जादा मोबदल्याची मागणी केली जात होती. सध्या ज्या खासगी विहिरीवर विद्युत पंप, डिझेल पंपाची सोय नसेल त्याला तीनशे रुपये, तर पाणी उपसा करण्यासाठी सर्व प्रकारची सोय उपलब्ध करून देणाºयास चारशे रुपये प्रतिदिन मोबदला दिला जातो. यंदा उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे आत्तापासूनच दिसू लागले आहे. अशा परिस्थितीत मिळेल त्या ठिकाणाहून पाण्याची व्यवस्था करण्याला सरकारने प्राधान्य दिले आहे. त्यामुळे खासगी विहिरी अधिग्रहीत करण्यावरही भर दिला जाणार असल्याने विहीरमालकांना राजी करण्यासाठी मोबदला वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या विहिरीवर विद्युत पंप वा डिझेल पंप नसेल तर त्यासाठी ४५० रुपये व सोय असेल, तर ६०० रुपये प्रतिदिन देण्यात येणार आहे. या संदर्भात शासनाने आदेश जारी केले आहेत.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक