शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
2
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
3
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
4
नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
5
Stock Markets News: फार्मावर १००% टॅरिफ, सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार घसरला; निफ्टी २४,८०० च्या खाली, फार्मा शेअर्स आपटले
6
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
7
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
8
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...
9
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
10
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
11
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
12
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
13
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
14
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
15
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
16
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
17
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
18
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
19
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
20
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश

गैरसोयीमुळे कर्मचाऱ्यांची नसते निवडणुकीसाठी उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 21:53 IST

देशाचे सरकार ठरविणाऱ्या मतदान प्रक्रियेत निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. परंतु, निवडणूक सेवेत असताना मतदान केंद्रांवर निवडणूक कर्मचाºयांना पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था आणि स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधांची गैरसोय होत असल्याने ही जबाबदारी स्वीकारण्यास अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता दिसून येत नाही.

ठळक मुद्देनिवडणूक कर्मचाऱ्यांची होते गैरसोयगैरसोयीमुळे कर्मचारी जबाबादारी घेण्यात अनुत्सूक

नाशिक : देशाचे सरकार ठरविणाऱ्या मतदान प्रक्रियेत निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. परंतु, निवडणूक सेवेत असताना मतदान केंद्रांवर निवडणूक कर्मचाºयांना पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था आणि स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधांची गैरसोय होत असल्याने ही जबाबदारी स्वीकारण्यास अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता दिसून येत नाही.ग्रामीण भागात पूर्वी स्थानिक पोलीसपाटील, कोतवाल, तलाठी, कर्मचाºयांची आपुलकीने विचारपूस करून आवश्यक सोयी उपलब्ध करून देत असे. परंतु, अलीकडच्या काळात परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे गैरसोय वाढल्याने कर्मचारी निवडणुकीची जबाबदारी टाळण्याचे प्रयत्न करीत असल्याचे काही निवृत्त कर्मचाऱ्यांनी सांगितले. लोकशाही प्रधान असलेल्या आपल्या देशात स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभेसह जिल्हा बँका, मार्केट कमिट्या अशा विविध संस्थांच्या मिळून वर्षात किमान दोन तरी निवडणुका होतात. या निवडणुका यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी गावपातळीपासून ते दिल्लीतील निवडणूक आयोगापर्यंत अनेक कर्मचारी कार्यरत असतात. यात प्रामुख्याने शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांचा मोठा समावेश असतो. परंतु हा वर्ग नेहमीच निवडणुकीच्या जबाबदारीपासून दूर राहण्यासाठी प्रयत्न करतो. कारण अनेकदा निवडणुकीची जबाबदारी मिळालेल्या मतदान केंद्रावर या कर्मचाऱ्यांची निवासाची व्यवस्थाच नसते. पावसाळ्यात डासांमुळे तर हिवाळ्यात थंडीने कर्मचारी त्रस्त होतात. सोबतच पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था आणि स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सोयीसुविधांसोबत स्नानगृहाचीही गैरसोय आणि हरवत चाललेल्या संवेदनशीलतेमुळे निवडणूक प्रक्रि येदरम्यानची वाढलेली आक्रमकता असे प्रकार टाळण्यासाठी कर्मचारी निवडणुकीची जबाबदारी स्वीकारण्यास उत्सुक नसतात. त्याचप्रमाणे या समस्यांचा सामना करून प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मतदान पेट्या जमा करताना करावी लागणारी प्रतीक्षा आणि ऐनवेळी पूर्ण कराव्या लागणाऱ्या प्रक्रिया यामुळे कर्मचारी त्रस्त होत असल्याने निवडणुकीची जबाबदारीच नको, अशी भावना बळावत असल्याचे मत निवृत्त कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकElectionनिवडणूकpoll of pollsमहापोल