शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

गैरसोयीमुळे कर्मचाऱ्यांची नसते निवडणुकीसाठी उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 21:53 IST

देशाचे सरकार ठरविणाऱ्या मतदान प्रक्रियेत निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. परंतु, निवडणूक सेवेत असताना मतदान केंद्रांवर निवडणूक कर्मचाºयांना पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था आणि स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधांची गैरसोय होत असल्याने ही जबाबदारी स्वीकारण्यास अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता दिसून येत नाही.

ठळक मुद्देनिवडणूक कर्मचाऱ्यांची होते गैरसोयगैरसोयीमुळे कर्मचारी जबाबादारी घेण्यात अनुत्सूक

नाशिक : देशाचे सरकार ठरविणाऱ्या मतदान प्रक्रियेत निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. परंतु, निवडणूक सेवेत असताना मतदान केंद्रांवर निवडणूक कर्मचाºयांना पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था आणि स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधांची गैरसोय होत असल्याने ही जबाबदारी स्वीकारण्यास अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता दिसून येत नाही.ग्रामीण भागात पूर्वी स्थानिक पोलीसपाटील, कोतवाल, तलाठी, कर्मचाºयांची आपुलकीने विचारपूस करून आवश्यक सोयी उपलब्ध करून देत असे. परंतु, अलीकडच्या काळात परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे गैरसोय वाढल्याने कर्मचारी निवडणुकीची जबाबदारी टाळण्याचे प्रयत्न करीत असल्याचे काही निवृत्त कर्मचाऱ्यांनी सांगितले. लोकशाही प्रधान असलेल्या आपल्या देशात स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभेसह जिल्हा बँका, मार्केट कमिट्या अशा विविध संस्थांच्या मिळून वर्षात किमान दोन तरी निवडणुका होतात. या निवडणुका यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी गावपातळीपासून ते दिल्लीतील निवडणूक आयोगापर्यंत अनेक कर्मचारी कार्यरत असतात. यात प्रामुख्याने शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांचा मोठा समावेश असतो. परंतु हा वर्ग नेहमीच निवडणुकीच्या जबाबदारीपासून दूर राहण्यासाठी प्रयत्न करतो. कारण अनेकदा निवडणुकीची जबाबदारी मिळालेल्या मतदान केंद्रावर या कर्मचाऱ्यांची निवासाची व्यवस्थाच नसते. पावसाळ्यात डासांमुळे तर हिवाळ्यात थंडीने कर्मचारी त्रस्त होतात. सोबतच पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था आणि स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सोयीसुविधांसोबत स्नानगृहाचीही गैरसोय आणि हरवत चाललेल्या संवेदनशीलतेमुळे निवडणूक प्रक्रि येदरम्यानची वाढलेली आक्रमकता असे प्रकार टाळण्यासाठी कर्मचारी निवडणुकीची जबाबदारी स्वीकारण्यास उत्सुक नसतात. त्याचप्रमाणे या समस्यांचा सामना करून प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मतदान पेट्या जमा करताना करावी लागणारी प्रतीक्षा आणि ऐनवेळी पूर्ण कराव्या लागणाऱ्या प्रक्रिया यामुळे कर्मचारी त्रस्त होत असल्याने निवडणुकीची जबाबदारीच नको, अशी भावना बळावत असल्याचे मत निवृत्त कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकElectionनिवडणूकpoll of pollsमहापोल