शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्यात दंगलीच्या घटना - पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 08:34 IST

काही राजकीय पक्षांकडून शांततेला धक्का लावण्याचे षड‌्यंत्र

ठळक मुद्देदेशात मोदी यांना पर्याय नाही, असे नाही. १९७५ ते ७७ या काळात कोणी सक्षम नेता नव्हता, त्यानंतर मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. त्या कालखंडात मोरारजीभाईंनी नेतृत्व करावे, असे कोणाच्या डोक्यात विचारही नव्हते.

नाशिक : त्रिपुरात जे काही घडले त्याचे महाराष्ट्रात पडसाद उमटण्याचा काही संबंध नाही. परंतु काही अशा संघटना आहेत त्या निमित्त शोधून रस्त्यावर येतात. अशा लोकांबाबत प्रत्येकाने विचार करायला हवा. उत्तर प्रदेशसह तीन राज्यांच्या निवडणुका लवकरच होतील, ते डोळ्यांसमोर ठेवून दंगली घडविण्याच्या घटना घडत आहेत. राज्य शांततेत वाटचाल करीत असताना त्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्षांकडून केला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे नाव न घेता माध्यमांशी बोलताना केला. 

अभिनेते विक्रम गोखले यांच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता, पवार यांनी अशा वक्तव्याची नोंद घेण्याचीही गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्रिपुराच्या निमित्ताने एका राजकीय पक्षाने अमरावती बंदचा निर्णय घेतला. याचाच अर्थ नैराश्येतून शांततेला धक्का लावण्याचे काम केले जात असून, हे सारे प्रकार जाणीवपूर्वक केले जात आहेत. चार राज्यांच्या व त्यातही उत्तर प्रदेशातील निवडणूक दिशा देणारी निवडणूक आहे. त्यामुळे निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून काही प्रकरणे मुद्दाम उकरून काढली जात असल्याचेही ते म्हणाले. 

देशात मोदी यांना पर्याय नाही, असे नाही. १९७५ ते ७७ या काळात कोणी सक्षम नेता नव्हता, त्यानंतर मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. त्या कालखंडात मोरारजीभाईंनी नेतृत्व करावे, असे कोणाच्या डोक्यात विचारही नव्हते. पर्याय नाही असे नाही, तर पर्याय असतो तो काढावा लागतो, असे सांगून पवार यांनी मोदी यांना देशात सक्षम पर्याय उभा राहू शकतो, असे संकेत दिले. 

अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्रास देण्याचा प्रयत्न काही ठराविक विचारांच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून मंत्री, पदाधिकाऱ्यांना चौकशी, धाडी टाकून त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता हे नित्याचेच झाले आहे. त्याची चिंता आम्ही फारशी करीत नाही. देशाची सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांना काही गोष्टींची पूर्तता करता आली नाही. ते लक्ष विचलित करण्यासाठी असे प्रयत्न करीत असल्याचा आरोपही पवार यांनी केला. ईडी, सीबीआयच्या अधिकाऱ्यांची कालमर्यादा वाढविण्याचा निर्णय हा त्याचाच भाग असल्याचेही ते म्हणाले.

अमरावतीसह राज्यात परिस्थिती नियंत्रणात 

संवेदनशील शहरात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. अमरावतीसह राज्यात सर्वत्र परिस्थिती नियंत्रणात आहे, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील नागपूर येथे सांगितले. राज्यातील काही शहरांमध्ये जो कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला याची सखोल चौकशी केली जाईल. यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, नागपुरात जमावबंदी असतानाही भाजपने काढलेल्या मोर्चावर पोलीस कायद्यानुसार कारवाई करतील. 

नियम सर्वांनीच पाळायचे असतात. जमावबंदीमध्ये मोर्चे काढणे योग्य नाही, असेही वळसे पाटील म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा