शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
3
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
4
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
5
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
6
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
8
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
9
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
10
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
11
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
12
गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
13
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
14
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
15
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
16
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
17
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
18
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
19
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
20
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्यात दंगलीच्या घटना - पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 08:34 IST

काही राजकीय पक्षांकडून शांततेला धक्का लावण्याचे षड‌्यंत्र

ठळक मुद्देदेशात मोदी यांना पर्याय नाही, असे नाही. १९७५ ते ७७ या काळात कोणी सक्षम नेता नव्हता, त्यानंतर मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. त्या कालखंडात मोरारजीभाईंनी नेतृत्व करावे, असे कोणाच्या डोक्यात विचारही नव्हते.

नाशिक : त्रिपुरात जे काही घडले त्याचे महाराष्ट्रात पडसाद उमटण्याचा काही संबंध नाही. परंतु काही अशा संघटना आहेत त्या निमित्त शोधून रस्त्यावर येतात. अशा लोकांबाबत प्रत्येकाने विचार करायला हवा. उत्तर प्रदेशसह तीन राज्यांच्या निवडणुका लवकरच होतील, ते डोळ्यांसमोर ठेवून दंगली घडविण्याच्या घटना घडत आहेत. राज्य शांततेत वाटचाल करीत असताना त्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्षांकडून केला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे नाव न घेता माध्यमांशी बोलताना केला. 

अभिनेते विक्रम गोखले यांच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता, पवार यांनी अशा वक्तव्याची नोंद घेण्याचीही गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्रिपुराच्या निमित्ताने एका राजकीय पक्षाने अमरावती बंदचा निर्णय घेतला. याचाच अर्थ नैराश्येतून शांततेला धक्का लावण्याचे काम केले जात असून, हे सारे प्रकार जाणीवपूर्वक केले जात आहेत. चार राज्यांच्या व त्यातही उत्तर प्रदेशातील निवडणूक दिशा देणारी निवडणूक आहे. त्यामुळे निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून काही प्रकरणे मुद्दाम उकरून काढली जात असल्याचेही ते म्हणाले. 

देशात मोदी यांना पर्याय नाही, असे नाही. १९७५ ते ७७ या काळात कोणी सक्षम नेता नव्हता, त्यानंतर मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. त्या कालखंडात मोरारजीभाईंनी नेतृत्व करावे, असे कोणाच्या डोक्यात विचारही नव्हते. पर्याय नाही असे नाही, तर पर्याय असतो तो काढावा लागतो, असे सांगून पवार यांनी मोदी यांना देशात सक्षम पर्याय उभा राहू शकतो, असे संकेत दिले. 

अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्रास देण्याचा प्रयत्न काही ठराविक विचारांच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून मंत्री, पदाधिकाऱ्यांना चौकशी, धाडी टाकून त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता हे नित्याचेच झाले आहे. त्याची चिंता आम्ही फारशी करीत नाही. देशाची सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांना काही गोष्टींची पूर्तता करता आली नाही. ते लक्ष विचलित करण्यासाठी असे प्रयत्न करीत असल्याचा आरोपही पवार यांनी केला. ईडी, सीबीआयच्या अधिकाऱ्यांची कालमर्यादा वाढविण्याचा निर्णय हा त्याचाच भाग असल्याचेही ते म्हणाले.

अमरावतीसह राज्यात परिस्थिती नियंत्रणात 

संवेदनशील शहरात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. अमरावतीसह राज्यात सर्वत्र परिस्थिती नियंत्रणात आहे, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील नागपूर येथे सांगितले. राज्यातील काही शहरांमध्ये जो कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला याची सखोल चौकशी केली जाईल. यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, नागपुरात जमावबंदी असतानाही भाजपने काढलेल्या मोर्चावर पोलीस कायद्यानुसार कारवाई करतील. 

नियम सर्वांनीच पाळायचे असतात. जमावबंदीमध्ये मोर्चे काढणे योग्य नाही, असेही वळसे पाटील म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा