शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

पत्र्यांच्या घरांना अचानकपणे आग लागल्याची घटना

By admin | Updated: January 28, 2015 02:14 IST

पत्र्यांच्या घरांना अचानकपणे आग लागल्याची घटना

वडाळागाव : येथील सावित्रीबाई फुले झोपडपट्टीमधील मांगीरबाबा चौकामध्ये मंगळवारी पहाटेच्या सुमारास झोपडीवजा दोन पत्र्यांच्या घरांना अचानकपणे आग लागल्याची घटना घडली. परिसरातील सराईत चोरट्यांनी दोन्ही घरे कुलूपबंद असल्याचा फायदा घेत कुलूप तोडून घरामध्ये लूट केली व त्यानंतर पत्र्याची झोपडीवजा घरे पेटवून दिल्याची चर्चा परिसरात दिवसभर सुरू होती. आगीत भस्मसात झालेल्या घरांमध्ये गोरगरीब मजुरांचा संसार बेचिराख झाल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.वडाळागावातील सावित्रीबाई फुले झोपडपट्टीमधील चौकात कापसे कुटुंबीयांची घरे आहेत. त्यापैकी सुशीला एकनाथ कापसे व नवनाथ एकनाथ कापसे यांची घरे कुलूपबंद होती. क ारण नवनाथ यांच्या पत्नीला प्रसूतीसाठी रात्रीच्या सुमारास एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामुळे रात्री घरांमध्ये कोणीही नव्हते. याचाच फायदा घेत चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून कुलूप तोडले. दवाखान्याच्या खर्चासाठी लागणारे सात हजार रुपये कपाटातून चोरांनी हातोहात लंपास केले तसेच मंगळसूत्र व पायातले चांदीचे जोडवेदेखील पळवले. मात्र यावरदेखील चोरट्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी थेट या गोरगरिबांच्या संसाराला लक्ष्य करत घरांना आग लावल्याचे कापसे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली घरे जळत असल्याचे पाहून काही नागरिकांनी तत्काळ अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच सिडको अग्निशामक केंद्राचे दोन बंब व मुख्यालयाचा एक असे एकूण तीन बंब घटनास्थळी पोहचले. अग्निशाामक दलाच्या जवानांनी अवघ्या पंधरा मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळविले; मात्र तोपर्यंत घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू, कपडे आगीत भस्मसात झाले होते. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात घटनेची नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर)